शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
IND vs BAN: T20 मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर! २ IPL स्टार संघात, एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

तर लोकप्रतिनिधींच्या गाड्या फोडू: साताऱ्यातील बैठकीत निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 11:11 PM

सातारा : आरक्षण मिळत नाही तोवर आंदोलन सुरू ठेवण्याची मागणी संतप्त युवक आणि माताभगिनींनी केल्यानंतर त्याला बैठकीत एकमुखी पाठिंबा देण्यात आला. बंदमध्ये अनुपस्थित राहणाºया लोकप्रतिनिधींच्या गाड्या फोडण्याची मोहीमही आम्ही हाती घेणार असल्याचा इशारा संतप्त मराठा युवकांनी बैठकीत दिला.मराठा आरक्षणासाठी लढाई आता ‘मराठा क्रांती ठोक मोर्चा’च्या नेतृत्वाखाली सुरू झाली आहे. त्या ...

सातारा : आरक्षण मिळत नाही तोवर आंदोलन सुरू ठेवण्याची मागणी संतप्त युवक आणि माताभगिनींनी केल्यानंतर त्याला बैठकीत एकमुखी पाठिंबा देण्यात आला. बंदमध्ये अनुपस्थित राहणाºया लोकप्रतिनिधींच्या गाड्या फोडण्याची मोहीमही आम्ही हाती घेणार असल्याचा इशारा संतप्त मराठा युवकांनी बैठकीत दिला.मराठा आरक्षणासाठी लढाई आता ‘मराठा क्रांती ठोक मोर्चा’च्या नेतृत्वाखाली सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने मंगळवारी सातारा येथे मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वय समितीची बैठक साताºयात झाली. त्यामध्ये सातारा जिल्हा बंद ठेवण्याचा निर्णय तर घेण्यात आलाच त्याचबरोबर आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन कायम राहणार असल्याचेही नमूद करण्यात आले.जिल्हाभरातून मराठा बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले. महामोर्चा आणि ठिय्या आंदोलना खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरेसवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदींनी सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. मराठा आरक्षणाची लढाई आता थांबवायचीच नाही. काही झालेतरी ही लढाई आपल्याला यशस्वी करून दाखावयची आहे, असा निर्धार सातारा जिल्ह्यातील तरुणाईने केला आहे. बैठकीत असंख्य युवक आक्रमकपणे बोलत होते. सरकारने कशी फसवणूक केली, याचा प्रत्येकजण पाढा वाचत होता. ‘शासनाने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. मुंबई मोर्चावेळी देण्यात आलेल्या एकाही घोषणेची पूर्तता झालेली नाही. कोणत्याच सवलती मराठा समाजाला मिळत नाहीत. पन्नास टक्के शुल्क भरूनही प्रवेश मिळत नाही. अण्णासाहेब पाटील महामंडळातून कर्ज मिळत नाही. त्यातच मेगा भरतीचा घाट घातला असून, त्यातूनही आपल्याला काहीच मिळणार नाही. मराठा आरक्षणासाठी आपली लढाई सुरू असताना सरकारचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. मराठा समाजाची फसवणूक करण्याचे काम मुख्यमंत्र्यांकडून होत आहे. त्यामुळे आता आपल्याला करो या मरोची भूमिका घ्यावी लागणार असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. ठिय्या आंदोलनात दररोज एक तालुका सहभागी होणार आहे.शाळा, महाविद्यालयेही राहणार बंदबुधवारी होणारा सातारा जिल्हा बंद कडकडीत होणार आहे. सातारा जिल्हा बंदची हाक महामोर्चावेळीच दिली जाणार आहे. त्यामुळे व्यापारी, व्यावसायिक, शाळा, महाविद्यालये, एसटी जीप, रिक्षा बंद राहणार आहेत. शाळा महाविद्यालयांसह सर्व संघटनांनी या बंदला पाठिंबा दिला असल्याची माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वयक समितीच्या वतीने देण्यात आली. दरम्यान, सातारा जिल्हा पोलीस दल व समन्वय समिती यांच्यात चर्चा होऊन सातारा जिल्ह्याची शांतता अबाधित ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.शांततेत बंद पाळण्याचे पोलिसांचे आवाहनसाताºयातील मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवला आहे. त्यांनी आंदोलनकर्त्यांना शांततेत बंद पाळून मोर्चा काढावा. हिंसक कृत्य करून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन केले आहे. तसेच शहरात ठिकठिकाणी कडक बंदोबस्त ठेवला आहे. त्यासाठी १ पोलीस उपअधीक्षक, ३ पोलीस निरीक्षक, १७ उपनिरीक्षक, सहायक निरीक्षक, १५० कर्मचारी, ३ सीआरपीची पथके व ५० होमगार्ड यांची नियुक्ती केली आहे.