शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर; कुणाकुणाला संधी? पाहा...
2
उमेदवार द्यायचे की पाडायचे? मनोज जरांगे पाटील यांनी घेतला मोठा निर्णय, केली महत्त्वाची घोषणा
3
विधानसभा निवडणुकीपूर्वी CM एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाणार? शिवसेनेचे नेते म्हणाले...
4
अलर्ट! UPI फ्रॉडपासून सावधान; हॅकर्स ओढतात जाळ्यात, एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
उद्धव ठाकरेंच्या रणनीतीला शरद पवारांचा ब्रेक?; सांगोला मतदारसंघावरून होणार वाद
6
मोठा ट्विस्ट! विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या चिन्हात बदल? आयोगाने घेतला निर्णय
7
महागाईचा चटका! आता CNG सामान्यांचा खिसा खाली करणार, कितीने वाढणार?
8
मविआत सारे आलबेल? मातोश्रीवरची बैठक सोडून आदित्य ठाकरे, अनिल परब शरद पवारांच्या भेटीला 
9
आदिवासी महिलेने मोदींना का पाठवले १०० रुपये?; पंतप्रधानांनीच सांगितलं कारण, म्हणाले...
10
निलेश कराळे मास्तर विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक, या दोन मतदारसंघांवर ठोकला दावा
11
Video: आरतीचं ताट, बुके अन् हार; Bigg Boss फेम अरबाज पटेलचं असं झालं छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वागत
12
Supriya Sule : "खुद्द मावळते मुख्यमंत्री आणि त्यांचा पक्ष..."; सुप्रिया सुळे यांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
13
“मनोज जरांगे ज्या मतदारसंघातून निवडणूक लढतील, तिथे आव्हान देणार”; लक्ष्मण हाकेंचा एल्गार
14
“आरक्षण कसे देत नाही ते बघूच, सरकारची वाट लावल्याशिवाय शांत बसणार नाही”; मनोज जरांगे आक्रमक
15
IND vs NZ : "आम्ही प्रयत्न केला पण...", लाजिरवाण्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माची रोखठोक उत्तरं
16
RSS च्या कार्यक्रमात बाप-लेकाचा चाकू हल्ला, 10 जण जखमी; आरोपीच्या घरावर बुलडोझर...
17
उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेणार? मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक; राऊत म्हणाले, 'विषय गंभीर'
18
'भगवा दहशतवाद'वर सुशीलकुमार शिंदेंनी मान्य केली चूक; म्हणाले, 'पक्षाने सांगितले, तेच बोललो'
19
WTC Points Table : टॉपर टीम इंडियाला मोठा धक्का; फायनलचा मार्ग खडतर होण्याची भीती
20
Raigad: हरिहरेश्वर येथे रूम देण्यास नकार देणाऱ्या हॉटेल मालकाच्या बहिणीस मद्यधुंद पर्यटकांनी चिरडले

सातारा जिल्ह्यात मान्सूनची सलामी; दुष्काळी भागात ओढ्यांना पाणी, शेतकऱ्यांमध्ये आनंद

By नितीन काळेल | Published: June 08, 2024 6:54 PM

कोयनेसह सर्वदूर पाऊस : काही ठिकाणी पुलावरुन पाणी 

सातारा : जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाला असून, सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. तरीही शनिवारी साताऱ्यासह पश्चिम भागात अनेक ठिकाणी धुवाॅंधार पाऊस पडला. तर पूर्व दुष्काळी भागातही धो-धो पाऊस झाला. यामुळे ओढे भरुन वाहिले. तसेच पुलावरुन पाणी गेल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला. तर या पावसामुळे बळीराजांत आनंदाचे वातावरण असून खरीप पेरणीला लवकरच सुरुवात होण्याची चिन्हे आहेत.जिल्ह्यात मागील दोन वर्षांत मान्सूनचा पाऊस १० जूननंतर दाखल झाला. त्यानंतरही पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे पेरण्यांना उशीर झाला होता. यंदा मात्र मान्सून वेळेवर दाखल झाला आहे. जिल्ह्यात गुरूवारपासूनच पाऊस पडू लागलाय. पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, महाबळेश्वर, कोयना, नवजा या भागात चांगला होत आहे. तसेच पूर्व भागातील माण, खटाव, फलटण तालुक्यांतीलही अनेक गावांत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. शुक्रवारी रात्री तर सातारा शहरात विजांच्या कडकडाटात पाऊस पडला. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्कील झाले होते. त्यातच शहराच्या अनेक भागातील वीजपुरवठाही खंडित झाला होता. तर शनिवारी दुपारच्या सुमारासही सातारा शहरासह परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे दीड तास पाऊस कोसळत होता. दुपारी साडे तीनच्या सुमारास पाऊस थांबला. पण, त्यानंतरही आभाळ भरुन आले आणि सायंकाळी साडे पाच वाजल्यापासून पुन्हा पावसाला सुरूवात झाली. पावसामुळे शहरातील गटारी भरुन वाहिली. तसेच सर्व रस्त्यावर पाणीच पाणी दिसत होते. सखल भागातही पाणी साचून राहिले.पूर्व भागातील माण, खटाव, फलटण या भागात चांगला पाऊस झाला. माणमधील वरकुटे मलवडी, शेनवडी, कुरणवाडी, काळचाैंडी परिसरात दमदार पाऊस पडला. यामुळे काही ठिकाणी ओढ्याला पाणी आले. तसेच जमिनीतही पाणी साचून राहिले. हा पाऊस खरीप हंगामातील पेरणी करण्यासाठी उपयुक्त असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच तालुक्यातीलच मार्डी, पळशी, मोही परिसरातही पावसाने चांगलेच झोडपले. तासभर झालेल्या पावसामुळे शेतात पाणी साचले होते.फलटण तालुक्यातील आदर्की परिसरात सलग तीन दिवसांपासून पाऊस पडत आहे. शनिवारच्या पावसामुळे आदर्की, हिंगणगाव ओढ्याला पूर आला होता. सावतानगर आणि पठाण वस्तीकडे जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहिल्यामुळे काहीवेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. खंडाळा तालुक्यातही पाऊस झाला. खंबाटकी घाट आणि परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. तर पावसामुळे समोरील काहीच दिसत नसल्याने महामार्गावरील वाहतूक मंदावली होती.

कोयना, नवजाला आतापर्यंत ३७ मिलिमीटर पाऊस..जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगरला १२ आणि नवजा येथे २१ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तर महाबळेश्वरला पाऊस झाला नाही. तर १ जूनपासून आतापर्यंत कोयना आणि नवजा येथे प्रत्येकी ३७ आणि महाबळेश्वरला १२ मिलिमीटर पर्जन्यमान झाले आहे. इतर भागातही पाऊस झाला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसFarmerशेतकरी