शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत? 
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "आईनं असं काही भाष्य केलेलं नाही, ते असं का बोलले..."; अजितदादांना श्रीनिवास पवारांचं प्रत्युत्तर
3
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
4
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
5
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
6
Zeeshan Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानला लागली नाही झोप, झिशान म्हणतात, "रोज रात्री मला फोन..."
7
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
8
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
10
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
11
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
13
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार
14
उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार
15
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
16
"जुन्नरमध्ये पुन्हा घड्याळ" राष्ट्रवादीच्या रॅलीत स्टार प्रचारक सयाजी शिंदेंचा उत्साह शिगेला
17
AUS vs IND : किंग कोहलीच्या फॉर्मवर माजी निवडकर्त्यानं मांडल रोखठोक मत
18
नात्याला काळीमा! ८ कोटी न दिल्याने बायकोने काढला नवऱ्याचा काटा; मर्सिडीजने उघड झालं रहस्य
19
वक्फ बोर्डासाठी आयोजित JPC च्या बैठकीत पुन्हा राडा; विरोधकांचा वॉक आऊट
20
ही दोस्ती तुटायची नाय! पराभवानंतर रोहित टीकाकारांच्या निशाण्यावर; धवननं मात्र मन जिंकलं

डोंगरकपारीतील धबधबे ठरतायेत पर्यटनाचे केंद्रबिंदू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 4:26 AM

लोकमत न्यूज नेटवर्क खंडाळा : ‘हिरवा निसर्ग हा संगतीने, जीवन सफर करा गमतीने’ या काव्यपंक्ती वास्तवात उतरविण्यासाठी अलीकडे पर्यटकांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

खंडाळा : ‘हिरवा निसर्ग हा संगतीने, जीवन सफर करा गमतीने’ या काव्यपंक्ती वास्तवात उतरविण्यासाठी अलीकडे पर्यटकांचा कल नैसर्गिक ठिकाणांकडे वाढला आहे. हिरव्यागार निसर्गाची मौज लुटण्यासाठी पावसाळा सुरू झाला की डोंगरमाथ्यावरील ठिकाणे, दऱ्याखोऱ्यातील छोटे-मोठे धबधबे हे पर्यटनाचे केंद्रबिंदू होऊ लागले आहेत. त्यामुळे या नव्या स्थळांचे आकर्षण पर्यटकांमध्ये वाढताना दिसत आहे.

पावसाळा सुरु झाला की निसर्गात रंगांची मुक्त उधळण पाहायला मिळते. आजूबाजूच्या डोंगररांगा हिरवाई नटून जातात. डोंगराच्या उंच कड्यावरून पावसाचे पाणी धबधब्याच्या रूपाने फेसाळत कोसळताना दिसू लागते. हा सर्वच निसर्गरम्य देखावा डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी कौटुंबिक सहलींसह मित्र-मैत्रिणींचा कल अशा ठिकाणांकडे वाढताना पाहायला मिळत आहे.

पर्यटन ही हल्ली हौस बनू लागली आहे. त्यासाठी पूर्वीप्रमाणे धार्मिक आणि पौराणिक स्थळांकडे न जाता नैसर्गिक ठिकाणांकडे ओढा अधिक वाढत आहे. त्यातच प्रमुख पर्यटनस्थळांवर बंदी असल्याने निसर्गातील उंच डोंगर, घनदाट जंगलातील वाटा, फेसाळणारे धबधबे, ऐतिहासिक गड किल्ले, नदीकाठचे प्रदेश, अथांग समुद्रकिनारा याची प्राधान्याने निवड केली जाते.

(चौकट..)

कुटुंबासह पर्यटनस्थळी गर्दी

कोरोनामुळे पडलेल्या लॉकडाऊनमध्ये सध्या शिथिलता दिल्याने गेल्या दीड वर्षात घराबाहेर पडू न शकलेली पर्यटनप्रेमी मोठ्या उत्साहाने पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी कुटुंबातील सदस्यांसह, मित्रांसह पर्यटनाचे नियोजन करीत आहेत. घरात कोंदटलेल्या वातावरणात आणि शहरातील कोरोनाच्या भीतीचे वातावरणापासून दोन दिवस निसर्गाच्या सान्निध्यात जाणे अधिक सोयीस्कर मानले जात आहे. त्यामुळे अशा पर्यटनस्थळी गर्दी वाढताना दिसत आहे .॥

(चौकट)

नैसर्गिक ठिकाणांकडे अधिक आकर्षण..!

सातारा जिल्ह्यात खंडाळ्याची हरेश्वर डोंगररांग, वाईच्या पश्चिम भागातील जोर, जांभळी खोरे, रायरेश्वर, कोळेकर पठार, महाबळेश्वरची सह्याद्री पर्वतरांग, जावळीचे निर्भीड अरण्य, मेरुलिंग, सूळपाणी डोंगर, साताराचे परळी, यवतेश्वर खोरे, जरंडेश्वरचा डोंगर, कास पठार, पाटणमधील कोयना, मोरगिरी खोरे, सडावाघापूर, वाल्मीकी पठार या भागातील नैसर्गिक ठिकाणांकडे अधिक आकर्षण आहे.

(कोट..)

भटकंती हा माणसाचा सहजभाव आहे. नैसर्गिक ठिकाणी झाडाझुडपांच्या आणि पशुपक्ष्यांच्या सहवासात दोन दिवस घालवल्यामुळे मन प्रसन्न होते. पुढील कामासाठी चैतन्य निर्माण होते. त्याचबरोबर डोंगरवाटा चालत राहिल्याने आरोग्य अधिक चांगले राहते. यासाठी धार्मिक स्थळांपेक्षा डोंगरातील नवीन ठिकाणे नेहमी आकर्षित करतात. आम्ही त्याची मौज घेत असतो.

-मिलिंद बच्चेवार, अधीक्षक अभियंता, पर्यटक

........................................

२७खंडाळा

निसर्गरम्य देखावा डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी कौटुंबिक सहलींसह मित्र-मैत्रिणींचा कल अशा ठिकाणांकडे वाढताना पाहायला मिळत आहे.