शहरं
Join us  
Trending Stories
1
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
2
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
4
उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार
5
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
6
"जुन्नरमध्ये पुन्हा घड्याळ" राष्ट्रवादीच्या रॅलीत स्टार प्रचारक सयाजी शिंदेंचा उत्साह शिगेला
7
नात्याला काळीमा! ८ कोटी न दिल्याने बायकोने काढला नवऱ्याचा काटा; मर्सिडीजने उघड झालं रहस्य
8
लोकसभेचं गणित विधानसभेला जुळत नसल्याने महाविकास आघाडीला ४० जागांवर बसणार फटका?
9
वक्फ बोर्डासाठी आयोजित JPC च्या बैठकीत पुन्हा राडा; विरोधकांचा वॉक आऊट
10
ही दोस्ती तुटायची नाय! पराभवानंतर रोहित टीकाकारांच्या निशाण्यावर; धवननं मात्र मन जिंकलं
11
गौतम गंभीर नाही! वरिष्ठ खेळाडूच भारताच्या पराभवाला जबाबदार; माजी खेळाडूंचे रोखठोक मत
12
J&K: अखनूरमध्ये सैन्याच्या ताफ्यावर हल्ला; चकमकीत 3 दहशतवादी ठार
13
“आमच्या नादी लागू नका, मर्द होता मग पळून कशाला गेला?”; थोरातांचा सुजय विखेंना सवाल
14
बॉलिवूड निर्मात्याच्या लेकाचा बॅक टू बॅक हिट शो! Ranji Trophyत झळकावलं सलग दुसरं द्विशतक
15
"कधी न चालणारा माणूस..."; अमित ठाकरेंच्या दाव्यावर सदा सरवणकरांचा खोचक टोला
16
पुण्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व पणाला; दोन्ही पवारांचे पक्ष किती जागांवर लढवतायत निवडणूक?
17
अभिनेत्रीचा पती होण्यापेक्षा नवाब मलिकांची मुलगी होणे केव्हाही चांगले; सना मलिकांनी स्वरा भास्करला सुनावले
18
वडील मजूर, बहिणीच्या लग्नानंतर कर्जाचा डोंगर; शाळेबाहेर भुईमुगाच्या शेंगा विकते विद्यार्थिनी
19
अखेर भाजपला उमेदवार मिळाला, नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 'हा' नेता मैदानात...
20
महिलांसाठी विशेष स्कीम, गुंतवणूकीवर मिळतोय जबरदस्त रिटर्न; पाहा संपूर्ण डिटेल 

खासदार श्रीनिवास पाटील चचेगावातील शेतकऱ्यांच्या बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 4:42 AM

नुकसानग्रस्त केळीच्या बागांची पाहणी पंचनामे करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : चचेगावसह परिसरात चक्रीवादळासह पावसाने चांगलेच थैमान ...

नुकसानग्रस्त केळीच्या बागांची पाहणी

पंचनामे करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क

मलकापूर : चचेगावसह परिसरात चक्रीवादळासह पावसाने चांगलेच थैमान घातले होते. हातातोंडाशी आलेल्या केळीच्या बागा भुईसपाट झाल्याने तीन शेतकऱ्यांचे सुमारे वीस लाखांवर नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त बागांची खासदार श्रीनिवास पाटील आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी तातडीने पंचनामे करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

रविवारी जोरदार चक्रीवादळासह संततधार पावसाने हजेरी लावली होती. यावेळी आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे चचेगावातील केळीच्या बागांना चांगलाच फटका बसला होता. येथील विलास भीमराव पवार, साहेबराव नाना पवार, हनुमंत दाजी हुलवान यांची सात एकरमध्ये केळीची बाग आहे. पंधरा ते वीस दिवसांत ती केळी विक्रीयोग्य होणार होती. मात्र, रविवारच्या वादळी वाऱ्याने या केळीच्या बागांचे मोठे नुकसान केले आहे. हातातोंडाशी आलेल्या बागेतील केळीची झाडे वादळी वाऱ्याने मोडून पडली आहेत. या बागा उद्ध्वस्त झाल्यामुळे किमान २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त बागांची बुधवारी खासदार श्रीनिवास पाटील यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर हजेरी लावत, केळीच्या पडलेल्या बागेत जाऊन पाहणी केली. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहून तातडीने पंचनामे करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना खासदार पाटील यांनी दिले. यावेळी पंचायत समिती सदस्य उत्तमराव पाटोल, तहसीलदार अमरदीप वाकडे, मंडल अधिकारी पंडित पाटील, तलाठी महादू राऊत, यांच्यासह अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

चौकट

खतांसह कीटकनाशकांच्या वाढत्या किमती चिंतेची बाब

खते, बी-बियाणे, कीटकनाशकांसह शेतीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढून उत्पन्नात घट होते. उत्पादनवाढीसाठी मोकळ्या हाताने कमी किमतीत खते व कीटकनाशके द्यावीत. शीतगृह उभारावीत. शेतकऱ्यांच्या मालाचा उठाव होईल अशा योग्य बाजारपेठा उपलब्ध कराव्यात. योग्य साधने उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, असे मत खासदार पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

कोट

शेतकरी हीच एक मोठी बाजारपेठ आणि शेतकरीच सर्वांत मोठा ग्राहक आहे. अशी दुहेरी भूमिका बजावणाऱ्यांच्या खिशात पैसा आला तरच इतर सर्व उद्योग व्यवसाय चालतात आणि अर्थव्यवस्था हालती राहते. शेतकऱ्यांचे नुकसान झाले की बाजारपेठेचेही नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची गरज आहे.

श्रीनिवास पाटील

खासदार, सातारा

===Photopath===

190521\img-20210519-wa0030.jpg

===Caption===

फोटो कॕप्शन

चचेगांव ता. कराड येथील नुकसानग्रस्त केळीच्या बांगाची खासदार श्रीनिवास पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पहाणी केली. ( छाया- माणिक डोंगरे)

फोटो कॕप्शन

चचेगांव ता. कराड येथील नुकसानग्रस्त केळीच्या बांगाची खासदार श्रीनिवास पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पहाणी केली. ( छाया- माणिक डोंगरे)