शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
2
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
3
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
4
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
6
IND vs BAN T20 : ऋतुराज गायकवाडला पुन्हा डच्चू! चाहत्यांचा रोष; चांगली कामगिरी असूनही वगळलं
7
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
8
"CSK च्या चाहत्यांसाठी दुःखाची बाब आहे पण...", गंभीरची जागा घेताच ड्वेन ब्राव्हो भावुक
9
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
10
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
11
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
12
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
13
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
14
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
15
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
16
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
17
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
18
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
19
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
20
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार

वाईतील ११७ ग्रामपंचायतींना महावितरणचा झटका!, गलथान कारभाराचा जनतेला फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 2:35 PM

ग्रामपंचायतीचे वीजबिल भरण्याची जबाबदारी ही पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेची असून, त्यांनी ते वेळेत न भरल्याने वाई तालुक्यातील संपूर्ण ग्रामीण भाग अंधारात

वाई : वाई तालुक्यातील सर्व ११७ गावांमधील पथदिव्यांचे कनेक्शन गुरुवार, दि. १६ रोजीपासून महावितरणकडून तोडण्यात आले आहे. ग्रामपंचायतींचे लाखोंचे बिल थकल्याने महावितरणकडून ही कारवाई करण्यात आली आहे. परंतु ग्रामपंचायतीचे वीजबिल भरण्याची जबाबदारी ही पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेची असून, त्यांनी ते वेळेत न भरल्याने वाई तालुक्यातील संपूर्ण ग्रामीण भाग अंधारात आहे, तर गावांतील सर्व पाण्याच्या योजना बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.वाई पंचायत समितीकडून वेळेत लाईट बिल भरले गेले नसल्यामुळे आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पंचायत समिती व महावितरणच्या विरोधात आरपीआय, मराठा आघाडी आक्रमक झाली असून, ११७ ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ सोमवार, दि. २० रोजी धडक मोर्चा काढून प्रशासनाला जाब विचारणार आहे, त्या अनुषंगाने शुक्रवार, दि. १७ रोजी वाई शासकीय विश्रामग्रहात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षातील पदाधिकाऱ्यांची व ग्रामस्थांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सर्वानुमते वाई येथून पंचायत समितीपर्यंत महामोर्चाचे आयोजन केले असून, महावितरणचा झटका बसलेल्या सर्व ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन संबंधितांकडून करण्यात आले आहे. हा मोर्चा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) मराठा आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्रीनिवास घाडगे, उपाध्यक्ष युवक आघाडी महाराष्ट्र स्वप्निल गायकवाड, मराठा आघाडीचे तालुकाध्यक्ष सुनील मांढरे, वाई तालुकाध्यक्ष श्रीकांत निकाळजे, संतोष गायकवाड, काली घाडगे, रुपेश मिसाळ, किरण घाडगे, अनिल सणस, बाजीगर इनामदार, विशाल शिंदे, उमेश गाडे, नीलेश कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मोर्चात ग्रामपंचायतींना सहभागी होण्याचे आवाहन...

वाई तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीचा जमा होणारा महसूल तुटपुंजा आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषदेची जबाबदारी असल्यामुळे ग्रामपंचायतील वीजबिल भरणे शक्य नाही, सध्या तालुक्यातील सर्व गावे अंधारात आहेत. तरी या समस्यांविषयी आवाज उठविण्यासाठी तालुक्यातील ग्रामपंचायतीने या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन आरपीआय, मराठा आघाडीच्यावतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmahavitaranमहावितरण