शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराह 'नंबर १'! कसोटी क्रमवारीत विराट, यशस्वीची मोठी झेप; रोहित, पंत, गिलची घसरण
2
"मुलगी जर दिसायला चांगली असेल..."; अजितदादा समर्थक आमदाराचे महिलांबाबत वादग्रस्त विधान
3
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह बड्या नेत्यांचा खात्मा करणार, इराणने प्रसिद्ध केली मोस्ट वाँटेडची यादी
4
“आरक्षण वाचवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीला सत्तेत निवडून द्या”; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन
5
कमी तिथे आम्ही नव्हे, तर भारत म्हणजे 'हमी'! पुतिन यांच्यानंतर अजित डोवाल फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना भेटले; कारण काय?
6
"...मग मनोज जरांगेंनी आधी तिथला उमेदवार जाहीर करावा", लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज काय?
7
बांगलादेशवर मोठा विजय मिळवत 'कॅप्टन' रोहित शर्माचा विक्रम, विराट कोहलीला टाकलं मागे
8
लीड रोड करुनही झाली नाही लोकप्रिय; १० मिनिटांच्या 'त्या' भूमिकेने केलं स्टार, आता म्हणते...
9
'या' चुका तुम्हाला करतील कर्जबाजारी; 5 गोष्टी समजून घ्या
10
Palak Sindhwani: गुडबाय! 'तारक मेहता...' मधील सोनूचा मालिकेला रामराम; शेअर केली भावूक पोस्ट
11
मनोज जरांगेंनी कंबर कसली; दसरा मेळाव्याची सुरु केली तयारी, विविध ठिकाणी देणार भेटी
12
Irani Cup live : कडक सॅल्युट! सर्फराज खानचे अप्रतिम 'द्विशतक', मुंबईचा 'संकटमोचक' लै भारी लढला
13
धक्कादायक! झारखंडमध्ये रेल्वे ट्रॅकला बॉम्बने उडवले; भीषण स्फोटाने परिसर हादरला
14
ऑनलाईन गेमच्या नादात सेल्समन बनला चोर; शोरुममधील ७ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला
15
गोविंदाप्रमाणेच बॉलिवूड अभिनेत्रीच्या पतीलाही स्वत:च्याच बंदुकीतून लागली होती गोळी, लग्नानंतर ११ दिवसांतच उद्ध्वस्त झालेला संसार
16
"काँग्रेसनं लबाडीच्या राजकारणामुळं स्वतःला संपवलं", मनोज तिवारींचा जोरदार हल्लाबोल
17
“मोदी सातत्याने महात्मा गांधींचे नाव घेतात, पण अहिंसेचे पालन करत नाहीत”; काँग्रेसची टीका
18
इस्रायलसोबत युद्ध सुरू असतानाच इराणचं मोठं विधान; म्हणाला- नेतन्याहू या शतकातील 'नवा हिटलर, तर भारत..."
19
“भाजपाने आधीच हार मानली, २०२४ च्या विधानसभेला मविआचेच सरकार येणार”; नाना पटोलेंचा दावा
20
Gold Price Review: सोन्यापेक्षा चांदी अधिक महागली, महिन्याभरात ७१०२ रुपयांनी वाढली किंमत; कारण काय?

मुंबईकर बाधित झाले पण;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2021 4:28 AM

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोनाच्या पहिल्या लाटेत सुरक्षित असलेला ग्रामीण भाग दुसऱ्या लाटेत मात्र असुरक्षित असल्याचे सध्या दिसून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोनाच्या पहिल्या लाटेत सुरक्षित असलेला ग्रामीण भाग दुसऱ्या लाटेत मात्र असुरक्षित असल्याचे सध्या दिसून येत आहे. याचे कारण म्हणजे मुंबई-पुण्याहून लक्झरी बस अक्षरश: प्रवाशांनी तुडुंब भरून रातोरात ग्रामीण भागात येऊ लागल्या आहेत. यातील एकाही प्रवाशाची प्रशासनाकडे नोंद नाही ना त्याची चाचणी केली गेली. त्यामुळे मुंबई- पुण्याहून आलेले प्रवासी बाधित असूनही त्याची आकडेवारी मात्र वेगळी प्रशासनाकडे नसल्यामुळे साराच सावळा गोंधळ आहे.

सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये सध्या मुंबईहून लक्झरी बस गावी येत आहेत. विशेष म्हणजे मुंबईपासून गावी येईपर्यंत त्यांना वाटेत कोणी कसे काय, ई पास मागत नाही की, तुम्हाला परवानगी आहे का, याची विचारणा करत नाही. याचे आश्चर्य गावकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. काही मुंबईकर अगोदरच कोरोनाबाधित असतात. गावी आल्यानंतर ते इकडून तिकडे फिरत असतात. त्यामुळे संसर्ग अधिकच फैलावत आहे. गावातील कोणी त्यांना बोलले तर वादावादीचे प्रसंग उद्भवतात. त्यामुळे त्यांना कोणीही बोलत नाही. गाव पातळीवरील समितीही काही ठिकाणी तोंड पाहून कोरोनाची जनजागृती करत असतात. जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये सध्या ७८९० रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये स्थानिक किती आणि मुंबई पुण्याहून आलेले किती अशी वर्गवारी प्रशासनाने केली नाही. त्यामुळे साराच गोंधळ आहे. आता रात्रीचा पोलीस बंदोबस्त जिल्ह्याच्या सीमेवर वाढवण्यात आला आहे.

गतवर्षी ग्रामीण भागामध्ये कोरोना फारसा नव्हता. यावर्षी कोरोनाची लागण केवळ पुणे- मुंबईहून आलेल्या प्रवाशांमुळे झाली आहे. त्यांना गतवर्षीसारखे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले नव्हते. याचे गंभीर परिणाम आपल्या लोकांना भोगावे लागत असल्याचे उत्तम वाघ (रा. तारळे) यांनी सांगितले.

गतवर्षी गावामध्ये आडवे बांबू लावून वाहतूक अडवण्यात आली होती; पण यंदा असे काहीच करण्यात आले नाही. त्यामुळे पुणे मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त होती, असे संदीप साळुंखे (रा. कडवे बुद्रुक, ता. पाटण) यांनी सांगितले.

आम्ही मुंबईहून येताना कोरोना चाचणी केली होती. त्यामुळे आम्ही गावी आलो आहोत (रा. कडवे बुद्रुक) असे सुधीर कदम सांगतात. तर नागठाणे येथील सर्जेराव माने यांनी सांगितले की, मुंबईहून गावी येणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी कोरोना चाचणी केली पाहिजे. आपण जर चाचणी केली नाही तर घरातील लोकांचा जीव आपण धोक्यात घालत आहोत, हे लक्षात ठेवले पाहिजे.