शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
5
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
6
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
7
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
8
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
9
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
10
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
11
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
12
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
13
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
14
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
15
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
16
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
17
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
18
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
19
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
20
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!

साताऱ्यात ५९ झाडांच्या प्रत्यारोपणासाठी पालिकेचे प्रयत्न

By प्रगती पाटील | Updated: April 3, 2024 19:30 IST

सातारा : रस्त्याच्या कामात अडथळा ठरणाऱ्या ५९ झाडांपैकी सुयोग्य झाडांचे प्रत्यारोपण करण्याची धडपड सातारा पालिकेने सुरू केली आहे. पहिल्या ...

सातारा : रस्त्याच्या कामात अडथळा ठरणाऱ्या ५९ झाडांपैकी सुयोग्य झाडांचे प्रत्यारोपण करण्याची धडपड सातारा पालिकेने सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात यातील पाच झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले. ‘हरित सातारा’च्या सहकार्याने टप्प्याटप्प्याने उर्वरित झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहेत.सुभाषचंद्र बोस चौक ते जुना आरटीओ ऑफिस चौक या रस्त्यावर पावसाळी पाणी साचत असल्याने हा डांबरी रस्ता वारंवार खराब होतो. शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यांपैकी हा रस्ता आहे. त्यामुळे पालिकेने या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला. काँक्रिटीकरण व दोन्ही बाजूला ड्रेनेज या कामासाठी शासनाकडून सुमारे अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. काँक्रिटीकरण होणारा सातारा शहरातील हा पहिलाच वाहतुकीचा रस्ता आहे. सुमारे ५०० मीटर अंतराचा हा रस्ता आहे. या कामामुळे रस्त्याच्या दुतर्फा ५९ झाडे काढावी लागणार आहेत. झाड तोडण्या ऐवजी त्याचे पुनर्रोपण करण्याचा निर्णय सातारा पालिकेने घेतला. या कामी हरित सातारा ग्रुपने सहकार्याचा हात पुढे केला.

रस्त्याच्या कामात अडथळा ठरणाऱ्या झाडांपैकी पहिल्या टप्प्यात पाच झाडांचे यशस्वी पुनर्रोपण हुतात्मा स्मारक येथे करण्यात आले. टप्प्याटप्प्याने उर्वरित झाडांपैकी सुयोग्य झाडांचे पुनर्रोपण करून ती वाचवण्यात येणार असल्याचे पालिकेचे वृक्ष विभाग प्रमुख, अभियंता सुधीर चव्हाण यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. ही सर्व झाडे हुतात्मा स्मारक परिसर तसेच जुना आरटीओ ऑफिस चौक परिसरात पुनर्स्थापित करण्यात येणार आहेत. 

पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या साताऱ्यातील हरित सातारा ग्रुपने या कामी सातारा नगरपालिकेबरोबर सहकार्याचा हात पुढे केला आहे. या ग्रुपचे मार्गदर्शक कन्हैयालाल राजपुरोहित म्हणाले, ‘वर्दळीच्या रस्त्यावरील प्रदूषणाची पातळी कमी करून ऑक्सिजन निर्मिती वाढवण्यासाठी झाडे मदतगार ठरतात. शिवाय विविध जीवांना आश्रय मिळण्याबरोबरच मातीची धूप आणि सुपीकता नियंत्रण हे फायदे होणार आहेत.’ शहरीकरणाच्या लाटेत वृक्षतोड होण्यापासून वाचवणे हा हरित सातारा चा मुख्य विचार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

५० किलो हळद मीठ अन् ३० किलो बटाटे!हुतात्मा उद्यानात झाडांचे पुर्नरोपण करण्यात आले. ज्या खड्ड्यांमध्ये या झाडांचे रोपण करण्यात आले त्या खड्ड्यात ५० किलो मीठ, ५० किलो हळद, प्रत्येक झाडाला ३० किलो बटाटा या खड्ड्यात टाकण्यात आले होते. 

रस्त्याच्या कामात अडथळा ठरणारी ही झाडे सुमारे दहा ते पंधरा वर्षांची आहेत. जमिनीपासून १२ फुटांवर झाडाची छाटणी करून झाडाच्या बुंध्याचे पुनरोपण सेंद्रिय पद्धतीने आम्ही करत आहोत. त्याची योग्य निगा राखल्यास नवी पालवी फुटून ही झाडे पुन्हा एकदा नव्या जागेत बहरतील. - श्रीधर थोरात, बिजांकुर फाऊंडेशन

टॅग्स :Satara areaसातारा परिसर