शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

कुणी राधा घ्या, कुणी सीता घ्या...; साताऱ्यात ७० हून अधिक मुलींचं एकाच वेळी नामकरण, जगातील पहिलंच सामूहिक बारसं

By दीपक देशमुख | Published: March 08, 2023 4:07 PM

महिला दिनाचे औचित्य साधून आर्थिकदृष्ट्या दुर्बल परिवारातील ७० हून अधिक मुलींच्या बारशाचा सोहळा पार पडला

सातारा : सामूहिक विवाह सोहळ्याबाबत ऐकले होते; पण सामूहिक बारसे पहिल्यांदाच ऐकले. सातारा शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलींच्या सामूहिक बारशाचा आजचा उपक्रम राज्याला नक्कीच दिशा देणारा आहे. असा उपक्रम महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात प्रथम होत असेल, असे गौरवोद्गार भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी काढले.सातारा येथील राधिका संकुलात महिला दिनाचे औचित्य साधून आर्थिकदृष्ट्या दुर्बल परिवारातील ७० हून अधिक मुलींच्या बारशाचा कार्यक्रम भाजप महिला मोर्चाच्या वतीने उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. सुनिशा शहा, सुरभी भोसले, सुवर्णा पाटील, माजी नगरसेवक विकास भोसले, विठ्ठल बलशेटवार आदींची उपस्थिती होती.याप्रसंगी चित्रा वाघ म्हणाल्या, महिला एक दिवस संपावर गेल्यातर काय होईल, याची कुणी कल्पना करू शकत नाही. महिलांना देवत्व देऊ नका; पण माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मात्र नक्की द्या. आजची महिला कुठेच कमी नाही. तिला आर्थिक बळ मिळणे गरजेचे आहे. आगामी काळात महिला आर्थिक स्वावलंबी कशी होईल, यासाठी महिला माेर्चा काम करेल. महिला जोपर्यंत आर्थिक सक्षम होत नाही तोपर्यंत तिचे सक्षमीकरण होऊ शकत नाही. केंद्र सरकारच्या माध्यमातून सातारा महिलांतील कर्तृत्वाला वाव देणार आहे.लहान मुलांचे बारसे करताना एक ते दोन वर्षांच्या नामकरण न झालेल्या मुलींचेही बारसे झाले. ५१ मुलींचे बारशाचे नियोजन होते; पण ७० हून अधिक मुलींची बारशी झाली. या उपक्रमामुळे मनस्वी आनंद होत असल्याचे उद्गगार वाघ यांनी काढले.यानंतर वाघ यांनी स्वत: काही मुलींचे नामकरण केले. यावेळी नवजात मुलींना भेटवस्तू, पालकांना पोशाख करण्यात आले. हळदी-कुंकू व वाणवाटप सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत मुलींच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली.नैराश्यातून विरोधकांची वक्तव्येकार्यक्रमानंतर चित्रा वाघ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राजघराण्याचा भाजपत सन्मान नसल्याचे विरोधकांचे आरोप असल्याचे पत्रकारांशी सांगितले असता वाघ म्हणाल्या, हातातोंडाशी असलेला घास गेल्यामुळे विरोधक नैराश्यवस्थेत आहेत. त्यामुळे ते वाट्टेल ते बोलत आहेत. त्यांची वक्तव्ये गांभिर्याने घेण्याची गरज नाही. तसेच महिलांच्या सुरक्षितेला सरकार प्राधान्य देत आहे. शक्ती कायदा झाला तर त्याचे स्वागत आहे. तरीही सध्याचे कायदे सक्षम असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या. गेल्या सात महिन्यात महिला अत्याचारप्रकरणी कसूर केलेल्या दोन डझन पोलिसांना निलंबीत केले आहे. बारा वर्षांच्या आतील मुलीवर अत्याचार झाल्यास फाशीची तरतूद करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. महिलांना सुरक्षा हे आमचे प्राधान्य आहेच; पण समाजाने अशा विकृती हटवण्यासाठी सहभाग घेण्याची व जनजागृतीची गरज आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWomen's Day Specialजागतिक महिला दिनBJPभाजपा