शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

..म्हणूनच चालढकल, आमदार अपात्र सुनावणीवर शशिकांत शिंदेंनी व्यक्त केलं मत  

By नितीन काळेल | Updated: September 21, 2023 18:33 IST

ही बाब न्यायालयानेही गांभीर्याने घेतली

सातारा : आमदार अपात्रता प्रकरणात चालढकल करण्यात येत आहे. हे आमदार अपात्र होणार असल्यानेच असा प्रकार सुरू आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपर्यंतही ही सुनावणी लांबविली जाण्याची शक्यता आहे,’ अशी भीती राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे रमेश उबाळे यांनी उपोषण सुरू केले होते. उपोषणकर्त्यांना भेट दिल्यानंतर आमदार शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, आमदार अपात्रता प्रकरणात दिलेल्या मुदतीत अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. पण, न्यायालयाचा आदेश गांभीर्याने घेतला जात नाही. सत्ताधारी आणि अध्यक्ष सुनावणीला विलंब लावून विनाकारण चालढकल करत आहेत. तसेच ही बाब न्यायालयानेही गांभीर्याने घेतल्यानंतर त्यांनी अध्यक्षांना सूचना केली आहे. आता सरकारमधील आमदार अपात्र होणार हे कायद्याने निश्चित झालेलेच आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही याबाबत निर्णय दिला जात नाही. त्यामुळे आता न्यायालयानेच निर्णय घेण्याची गरज आहे.अध्यक्षांचा अधिकार असूनही चालढकल दिसून येत आहे. आता प्रत्येक आमदाराला स्वतंत्रपणाने बोलवायचे म्हणजे यात दोन-तीन महिन्यांचा कालावधी जाणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत ही सुनावणी लांबवली जाण्याची शक्यता आहे, असेही आमदार शिंदे यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीसंदर्भात आमदार शिंदे यांनी मार्च, एप्रिलपर्यंत लोकसभा निवडणूक आहे. पण, डिसेंबर, जानेवारीपर्यंत म्हणजे मुदतीच्या आत ही निवडणूक घेतली जाईल, असा अंदाजही वर्तविला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारणEknath Shindeएकनाथ शिंदेShashikant Shindeशशिकांत शिंदे