शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

मदत हवीये, पण सांगायला समाजाची लाज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 4:28 AM

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोना विषाणूने गेल्या दीड वर्षात बऱ्याच गोष्टी होत्याच्या नव्हत्या करून टाकल्यात. पहिल्या लाटेत ज्येष्ठांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोना विषाणूने गेल्या दीड वर्षात बऱ्याच गोष्टी होत्याच्या नव्हत्या करून टाकल्यात. पहिल्या लाटेत ज्येष्ठांना त्रास दिल्यानंतर दुसऱ्या लाटेत कोरोनाने कुटुंब प्रमुखालाच गिळंकृत केल्याने अनेक कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. दुर्दैवाने यासाठी कोणाकडेही कसली मदत मागण्याचीही आणि घेण्याचीही लाज वाटू लागल्याने, या बालकांचे भविष्य अंधारमय दिशेकडे जाण्याची चिंता वाटत आहे.

कोविड काळात मृत्युमुखी पडणाऱ्या पालकांच्या मुलांचा गंभीर सामाजिक प्रश्न निर्माण होऊ शकतो, हे लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने या बालकांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी जिल्हास्तरावर कृती दल गठित करण्याचे निर्देश दिले आहेत. कृती दलाचे अध्यक्षपद जिल्हाधिकाऱ्यांकडे असून सदस्य म्हणून जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात मृत्युमुखी पडलेल्या साताऱ्यात कोरोनाचा विळखा चांगलाच घट्ट बसू लागला आहे. कामाच्या आणि व्यवसायाच्या निमित्ताने घराबाहेर पडणाऱ्या पालकांना त्यातही विशेषत: पुरुषांना कोविडची लागण अधिक झाली. एसटीत कार्यरत असणाऱ्या एका वाहकावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींची संख्या ७ आहे. या वाहकाचा मृत्यू झाल्यानंतर कमावता हात गेल्याने या कुटुंबावर संकट कोसळलं आहे. एसटीकडून मिळणाऱ्या पैशातून डोक्यावरचं कर्ज फेडल्यावर, जगायचं कसं? असा प्रश्न त्यांच्या पत्नीला सतावत आहे.

मोती चौकात छोटंसं दुकान असणाऱ्या एका व्यावसायिकाचा छोटा भाऊ आणि त्याची पत्नी कोविडमध्ये गेले. १९ आणि २३ वर्षांची मुलं पोरकी झाली. या मुलांची जबाबदारी काकांनी घेतली असली तरीही, स्वत:चंच भागवायची पंचाईत असताना ही जबाबदारी त्यांनी स्वीकारली. अशी जबाबदारी स्वीकारली तरीही, मुलांना आवश्यक ते शिक्षण देण्यातही अडचण येणार, याची कुटुंबाला खात्री आहे. असं असूनही या दोन्ही कुटुंबांनी मदतीसाठी शासनाकडे संपर्क साधला नाही. त्यामुळे शासकीय यंत्रणेकडे पालक गमावलेल्या मुलांचा आकडा शून्यच आहे. अशा मुलांची जबाबदारी घेण्यासाठी साताऱ्यातील अनेक दानशूर व्यक्ती समोर आल्या आहेत.

लोक काय म्हणतीलची भीती ...!

कोविडने अनेकांना आर्थिक संकटात टाकले आहे. बऱ्याच कुटुंबांमध्ये कोविडने मृत्यूचे थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत शासन मदत द्यायला तयार असताना, त्या यंत्रणेपर्यंत पोहोचतानाही सामान्यांना त्यांचे मन खात आहे. कुटुंबातील व्यक्तीच्या पश्चात त्यांची लेकरं अशी शासनाच्या जिवावर सोडणं त्यांना मान्य नाही, तर दुसरीकडे त्यांची पुरेशी काळजी घेण्याची सक्षमताही दिसत नाही. या पार्श्वभूमीवर ‘सबसे बडा रोग, क्या कहेंगे लोग’ या उक्तीची प्रचिती शासन यंत्रणेतील व्यक्तींना येऊ लागली आहे.

कोट :

कोरोनामुळे आई, बाबा गमावलेल्या कुटुंबातील मुलांची नावे आणि त्यांची माहिती गोपनीय ठेवण्यात येणार आहे. शासन नियमानुसार १८ वर्षांपर्यंत मदत करण्याचा नियम असला तरीही, २३ वर्षांच्या मुलांपर्यंतची काळजी घेण्यास आम्ही सक्षम आहोत. कोणतेही किंतु-परंतु डोक्यात न घेता नातेवाईक आणि परिचितांनी ही नावे शासनाकडे पोहोचवावीत.

- रोहिणी ढवळे, महिला व बालविकास अधिकारी

पॉईंटर

जिल्ह्यातील कोविडचे चित्र...

एकुण नमुने :

एकूण बाधित :

घरी साडलेले रुग्ण :

कोविड मृत्यू :

उपचारार्थ दाखल :