शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे हादरलं! मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
2
भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने काय बदल होतात? नागपूरकरांनी लढलेला दीर्घ लढा अखेर यशस्वी
3
"मला संपवू नका, मीच राहिलो नाही, तर तुम्ही...", अशोक चव्हाणांचे विधान चर्चेत
4
...तर शरद पवारांसोबत चर्चा करू; MIM च्या मविआतील प्रवेशावर ठाकरे गटाची भूमिका
5
खळबळजनक! "तुमची मुलगी एका..."; डिजिटल अरेस्ट, ८ कॉल, 'त्या' फोनने आईला हार्ट अटॅक
6
अभिजात दर्जासाठी पहिली समिती ते आतापर्यंतचा प्रवास... अखेर तेव्हापासूनच्या प्रयत्नांना यश
7
आता GPay युझर्सना मिळणार Gold Loan; 'या' कंपनीसह झाला करार, पाहा डिटेल्स
8
"असं केलं, तर महाराष्ट्रात आरक्षणाचा वाद राहणार नाही", शरद पवारांनी काय सुचवला मार्ग?
9
शेअर बाजार उघडताच पुन्हा विक्री सुरू, सेल ऑन राइजमध्ये अडकला बाजार; BPCL, एशियन पेंट्स आपटला
10
MIM ची मविआत एन्ट्री?, काँग्रेस-राष्ट्रवादीला लेखी प्रस्ताव; २ बैठका सकारात्मक
11
मराठीला 'अभिजात भाषेचा दर्जा'; शरद पवारांनी केंद्राचे केले अभिनंदन, म्हणाले...
12
'गोलीगत' सूरजसाठी सुप्रिया सुळे मैदानात! बिग बॉसचा महाविजेता करण्यासाठी बारामतीकरांना केलं आवाहन
13
करामती Rashid Khan 'ते' वचन विसरला! क्रिकेटरनं ३ भावांसह एकाच मांडवात उरकलं लग्न
14
मोदी सरकारची नवी स्कीम, १ कोटी तरुणांना महिन्याला ₹५००० मिळणार; कधी, केव्हा, कसा कराल अर्ज?
15
मराठी भाषेला अभिजात दर्जा, राज ठाकरेंनी केलं स्वागत; या निर्णयाचा फायदा सांगितला
16
Bigg Boss 18: बॉलिवूड सुंदरी घेणार घरात एन्ट्री, ९० च्या दशकातील ही 'सेन्सेशनल क्वीन' कोण?
17
इस्त्रायलची मोठी कारवाई! बेरुतही स्फोटांनी हादरला, हिजबुल्लाहचा नवा चीफ सफीद्दीन टारगेटवर
18
संपादकीय: इराणने का उडी घेतली? पडसाद अमेरिकेतील निवडणुकीत
19
मोठी बातमी! मंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात, चालक गंभीर, पिकअपला दिली धडक
20
सत्तार दोन तास उशिरा आले, कार्यक्रम सोडून गेले! बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत गदारोळ

पश्चिम घाटातील पडीक जमिनीवर वृक्ष लागवडीची गरज : पाटणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 4:30 AM

विक्रमसिंह पाटणकर म्हणाले, ‘वाढते प्रदूषण, पर्यावरणाचा बिघडलेला समतोल, ग्लोबल वाॅर्मिंग, आदी बाबींचा विचार करता आयुष्यात वन मोठे की धन ...

विक्रमसिंह पाटणकर म्हणाले, ‘वाढते प्रदूषण, पर्यावरणाचा बिघडलेला समतोल, ग्लोबल वाॅर्मिंग, आदी बाबींचा विचार करता आयुष्यात वन मोठे की धन मोठे याचा विचार प्रत्येकाने करण्याची वेळ आली आहे. पैसा आणि संपत्ती ऑक्सिजन विकत घेऊ शकत नाही. निसर्गामधून फुकट मिळणाऱ्या ऑक्सिजनची किंमत आपणाला कधी कळणार म्हणून भविष्यात जगण्यासाठी धनापेक्षा वनसंपत्ती महत्त्वाची आहे.’

आता शंभर कोटी झाडे लावण्याचे फसवे कार्यक्रम थांबवू या आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहत असलेल्या आणि निसर्गाचे संगोपन करणाऱ्या पश्चिम घाटातील गरीब इमानदार शेतकऱ्यांना झाडे लावून जगविण्याची जबाबदारी देऊया. ते या वृक्षांची आपल्या मुलांप्रमाणे काळजी घेतील. महाराष्ट्रतील पश्चिम घाटातील कोट्यवधी पडीक जमिनीवर औषधी वनस्पती, सुगंधी वनस्पती, मसाल्याच्या वनस्पती लावून त्यांचे संगोपन केले तर आयुष्यभर स्थानिकांना उत्त्पन्न मिळेल. डोंगरावर वृक्षारोपण करण्यासाठी लागणारी पाण्याची गरज ही डोंगरावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याची साठवण करण्यासाठी मोठ्या साईट आहेत त्या ठिकाणी शेततळी काढून त्यामध्ये साठवण केली तर वृक्षारोपणासाठी ग्रॅव्हिटीने झाडांना विना इंधन पाणी मिळेल. डोंगर उतारावर पडीक जमिनीवर नैसर्गिक पाण्यावर झाडे लावून ग्रीन कव्हर वाढवता येईल. शासनाच्या वतीने झाडे लावण्याच्या योजना पुष्कळ आहेत; पण त्या दुर्गम भागात असलेल्या प्रत्येक गावात पोहोचण्यासाठी यंत्रणा अपुरी पडत आहेत. ही पश्चिम घाटातील दुर्गम डोंगराळ भागात पोहोचविण्यासाठी समाजसेवा संस्था पुढे आल्या पाहिजेत. त्याच्या माध्यमातून अर्धशिक्षित डोंगराळ भागातील शेतकऱ्यांपर्यंत या वृक्षारोपणच्या योजना पोहोचल्या पाहिजेत, असे मत माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी व्यक्त केले.