शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

नीरा-देवघरचे पाणी मोर्वेत दाखल

By admin | Published: February 26, 2017 12:32 AM

आनंदोत्सव साजरा : खंडाळा तालुक्यातील ग्रामस्थ, प्रकल्पग्रस्तांकडून पूजन

शिरवळ : चातकाप्रमाणे वाट पाहत बसलेल्या खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. कारण नीरा-देवघर प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आश्वासनाप्रमाणे मोर्वे गावापर्यंत पाणी पोहोचले आहे. हे पाणी पोहोचल्यानंतर मोर्वे ग्रामस्थ व प्रकल्पग्रस्तांच्या वतीने विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये जलपूजन करण्यात आले व आंनदोत्सवही साजरा केला. मोर्वे, ता. खंडाळा याठिकाणी मोर्वे व ११ गावांमधील ग्रामस्थ व प्रकल्पग्रस्तांच्या वतीने सरपंच मीनाक्षी धायगुडे, नंदकुमार धायगुडे, ग्रामस्थ यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी नीरा-देवघरचे कार्यकारी अभियंता शिवाजी बोळभट, खंडाळा पाणी पंचायतीचे अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब बागवान, माजी सभापती प्रा. एस. वाय. पवार, खंडाळा तालुका विकास प्रतिष्ठानचे सचिव डॉ. विजय शिंदे, काँग्रेसचे अजय धायगुडे, मानसिंग धायगुडे, पंडित जगताप, मल्हारी जगताप, धनाजी डेरे, भुजंग पवार, गोरख धायगुडे, आबासाहेब शेटे, शामराव धायगुडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी ग्रामस्थ व प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे नीरा-देवघरच्या कालव्याचे काम कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करत मार्चअखेर वाघोशीपर्यंत पाणी प्रवाहित करण्यात येईल, असे आश्वासन नीरा-देवघरचे कार्यकारी अभियंता शिवाजी बोळभट यांनी दिले.याप्रसंगी अ‍ॅड. बाळासाहेब बागवान, डॉ. विजय शिंदे, प्रा. एस. वाय. पवार, नंदकुमार धायगुडे, मानसिंग धायगुडे, पंडित जगताप आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. विजय शिंदे, नीरा-देवघर प्रकल्पाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांकडून करण्यात आला.शामराव धायगुडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) आंदोलनाचा इशारानीरा-देवघर कालव्याचे काम पूर्ण करुन पाणी वाघोशीपर्यंत सोडण्यासाठी ११ गावांच्या ग्रामस्थांनी निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. तसेच प्रकल्पाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशाराही दिला होता. त्यानंतर प्रशासनाने कालव्याचे काम पूर्ण करीत मोर्वेपर्यंत पाणी आणले आहे.