शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

गुन्हेगारी कारवायामुळे साताऱ्यातील नीरा नदीपात्र बदनाम; आत्महत्या, खूनाच्या घटनेत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 2:21 PM

परस्परांच्या हद्दीत सुरक्षित ठिकाणाची निवड करून गुन्हेगारी कारवाया करण्याचे प्रस्थ वाढल्याने नीरा नदीपात्र अधिक बदनाम झाले.

प्रगती जाधव-पाटीलसातारा : कारागृहात परजिल्ह्यातील गुन्हेगारांच्या परस्परांशी झालेल्या ओळखीचं पर्यवसान पुढे टोळीत होत असल्याने पोलिस यंत्रणासाठी यांना जेरबंद करणे मोठे आव्हान ठरत आहे. परस्परांच्या हद्दीत सुरक्षित ठिकाणाची निवड करून गुन्हेगारी कारवाया करण्याचे प्रस्थ वाढल्याने नीरा नदीपात्र अधिक बदनाम झाले.सातारा जिल्ह्यात नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद यासह पुण्या-मुंबईच्या टोळ्या सक्रिय असतात. या टोळ्यांच्या मध्ये नव्या चेहऱ्यांचा उपयोग कारवायांसाठी केला जातो. गुन्हा पचविण्यासाठी, पुरावा नष्ट करण्यासाठी नीरा नदीचे पात्र सुरक्षित असल्याची रेकी गेल्या काही वर्षांमध्ये गुन्हेगारांनी केली आहे. परिणामी गेल्या वर्षभरामध्ये वीसहून अधिक घटना शिरवळ पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. वास्तुविशारद यांचा खून, सांगलीतील उद्योजकांच्या मुलाचा घातपात व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या आत्महत्येचा समावेश आहे.

पुण्यापेक्षा सातारा सोयीचासातारा जिल्ह्याच्या हद्दीत खून करून निरा नदीपात्रात मृतदेह टाकल्याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील एका संशयिताने पोलीस तपासात धक्कादायक खुलासा केला होता. त्याने पोलिसांजवळ सांगितलं की, ‘पुण्यात गुन्हा दाखल झाला तर कोणाकडे जायचं आणि कुठं कोणाला मॅनेज करायचं, हा मोठा प्रश्न असतो. तिथं होणाऱ्या ‘तडजोडी’ हलक्यात नसतात. पुण्यापेक्षा सातारा कधीही ‘परवडतो’! आता हे परवडणं काय आणि कसं यावर मात्र तो संशयितच अधिक प्रकाश टाकू शकतो.

कारागृहात मिळतेय यंत्रणांना गुंगारा देण्याची शिकवणकारागृहात आठवड्यापेक्षा अधिक वेळ राहिलेल्यांना येथे गुन्हेगार विश्वातील गुरू आणि महागुरू भेटतात.आपापल्या आवडीने कारागृहात टोळीत सहभागी व्हायचं आणि बाहेर पडल्यानंतर काही काम असेल तरच भेटायचं हा निकष अगदी ठरलेला असतो. कारागृहात असताना मात्र, गुन्हा कसा करावा? पुरावा कसा नष्ट करावा? यासह यंत्रणेला गुंगारा देण्याचे एकसेएक किस्से चवीने सांगितले जातात

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीriverनदी