शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराह 'नंबर १'! कसोटी क्रमवारीत विराट, यशस्वीची मोठी झेप; रोहित, पंत, गिलची घसरण
2
"मुलगी जर दिसायला चांगली असेल..."; अजितदादा समर्थक आमदाराचे महिलांबाबत वादग्रस्त विधान
3
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह बड्या नेत्यांचा खात्मा करणार, इराणने प्रसिद्ध केली मोस्ट वाँटेडची यादी
4
“आरक्षण वाचवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीला सत्तेत निवडून द्या”; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन
5
कमी तिथे आम्ही नव्हे, तर भारत म्हणजे 'हमी'! पुतिन यांच्यानंतर अजित डोवाल फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना भेटले; कारण काय?
6
"...मग मनोज जरांगेंनी आधी तिथला उमेदवार जाहीर करावा", लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज काय?
7
बांगलादेशवर मोठा विजय मिळवत 'कॅप्टन' रोहित शर्माचा विक्रम, विराट कोहलीला टाकलं मागे
8
लीड रोड करुनही झाली नाही लोकप्रिय; १० मिनिटांच्या 'त्या' भूमिकेने केलं स्टार, आता म्हणते...
9
'या' चुका तुम्हाला करतील कर्जबाजारी; 5 गोष्टी समजून घ्या
10
Palak Sindhwani: गुडबाय! 'तारक मेहता...' मधील सोनूचा मालिकेला रामराम; शेअर केली भावूक पोस्ट
11
मनोज जरांगेंनी कंबर कसली; दसरा मेळाव्याची सुरु केली तयारी, विविध ठिकाणी देणार भेटी
12
Irani Cup live : कडक सॅल्युट! सर्फराज खानचे अप्रतिम 'द्विशतक', मुंबईचा 'संकटमोचक' लै भारी लढला
13
धक्कादायक! झारखंडमध्ये रेल्वे ट्रॅकला बॉम्बने उडवले; भीषण स्फोटाने परिसर हादरला
14
ऑनलाईन गेमच्या नादात सेल्समन बनला चोर; शोरुममधील ७ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला
15
गोविंदाप्रमाणेच बॉलिवूड अभिनेत्रीच्या पतीलाही स्वत:च्याच बंदुकीतून लागली होती गोळी, लग्नानंतर ११ दिवसांतच उद्ध्वस्त झालेला संसार
16
"काँग्रेसनं लबाडीच्या राजकारणामुळं स्वतःला संपवलं", मनोज तिवारींचा जोरदार हल्लाबोल
17
“मोदी सातत्याने महात्मा गांधींचे नाव घेतात, पण अहिंसेचे पालन करत नाहीत”; काँग्रेसची टीका
18
इस्रायलसोबत युद्ध सुरू असतानाच इराणचं मोठं विधान; म्हणाला- नेतन्याहू या शतकातील 'नवा हिटलर, तर भारत..."
19
“भाजपाने आधीच हार मानली, २०२४ च्या विधानसभेला मविआचेच सरकार येणार”; नाना पटोलेंचा दावा
20
Gold Price Review: सोन्यापेक्षा चांदी अधिक महागली, महिन्याभरात ७१०२ रुपयांनी वाढली किंमत; कारण काय?

पोषण भत्ता उठू शकतो लेकरांच्या जिवावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 4:26 AM

सातारा : जिल्ह्यातील कोविड रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. तिसरी लाट लहानग्यांसाठी घातक असल्याने शासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ...

सातारा : जिल्ह्यातील कोविड रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. तिसरी लाट लहानग्यांसाठी घातक असल्याने शासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे उन्हाळ्यातील शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना देण्यात न आल्याने त्याची रक्कम बँकेत जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे खाते उघडायला पालक मुलांसह बँकेत जाऊन गर्दी करत आहेत. त्यामुळे आहार भत्ता विद्यार्थ्यांच्या जिवावर उठू नये अशी भावना व्यक्त केली जात आहे.

उन्हाळ्यातील शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना देण्यात आला नाही. त्याऐवजी आहाराची तेवढी रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या आदेशाने पालक वर्गात गोंधळ उडाला आहे, कारण १५० रुपयांच्या रकमेसाठी बँक खाते उघडावे लागणार आहे. राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्यासाठी हजार रुपये भरावे लागत आहेत. ही रक्कम खात्यात जमा करण्याऐवजी थेट शाळेतून प्रत्येक विद्यार्थ्याला देण्यात आली असती तर कोविड काळातील पालकांचा हा त्रास वाचला असता.

केंद्राची राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आहे. याअंतर्गत शालेय पोषण आहार योजना राबविली जाते. शाळा सुरू असते तेव्हा विद्यार्थ्यांना तांदळाचे वाटप केले जाते. मात्र १५ एप्रिल ते १५ जून हा उन्हाळ्याच्या सुट्टीचा काळ व लॉकडाऊन यामुळे विद्यार्थी या आहारापासून वंचित राहिले. या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेच्या खर्चाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची घोषणा शासनाने केली आहे.

पोषण आहारांतर्गत पहिली ते पाचवी इयत्तीतील एका विद्यार्थ्याला ४ रुपये ४० पैसेप्रमाणे ३५ दिवसांचे १५६ रुपये ८ पैसे, तर सहावी ते आठवी इयत्तेतील एका विद्यार्थ्याला ६ रुपये ७१ पैसे एका दिवसाचे देण्यात येणार आहेत. म्हणजे २३४ रुपये ८५ पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा होतील. विद्यार्थ्यांच्या नावाने राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्यास हजार रुपये लागतात. यामुळे पालकांसमोर पेच पडला आहे. येणाऱ्या रकमेपेक्षा बँक खाते उघडण्यास जास्त रक्कम द्यावी लागणार आहे. मग बँक खाते उघडावे की नाही, असा प्रश्न पालकांसमोर पडला आहे.

चौकट :

माझी मुलगी पाचवीत शिकते. शालेय पोषण आहाराची रक्कम तिच्या खात्यात १५६ रुपये जमा होणार आहे. राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्यासाठी गेलो तर हजार रुपये लागतील असे सांगण्यात आले. शून्य टक्के रकमेवर आता खाते काढले जात नाही असे उत्तर बँकेने दिले. आता १५६ रुपयांसाठी हजार रुपये भरावेत का? असा प्रश्न आहे.

- आशा महामुलकर, गोडोली

खाते नाही उघडले तर म्हणे शिक्षक जबाबदार!

एकीकडे तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांना कोरोनाचा धोका आहे म्हणून काळजी घ्या म्हणायचे आणि दुसरीकडे बँकेत खाते काढण्यासाठी गर्दीत जाण्यास भाग पाडायचे हे विद्यार्थ्यांना मृत्यूच्या दाढेतून ढकलणाऱ्या अधिकाऱ्यांना काय म्हणायचे? असा प्रश्न पालकांना पडला आहे. शिक्षण विभागातील अधिकारी यांनी सक्त आदेश देत खाती नाही उघडली तर शिक्षक जबाबदार, असे म्हटल्याने पालकांनी खाते उघडावे यासाठी शिक्षकांनी तगादा लावला आहे. यामुळे वैतागलेल्या पालकांनी व्यावहारिकदृष्ट्या हे अयोग्य असल्याचे स्पष्ट केले आहे.