शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

अरे बापरे... एक किलो टोमॅटोची तीन रुपयांनी विक्री अन् वाहतुकीला जाताय चार रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 4:26 AM

दहिवडी : माण तालुक्यात टोमॅटोच्या मोठ्या प्रमाणात उत्पादक गावे असणारे मलवडी, भांडवली, शिंदी खुर्द, गाडेवाडी परिसरातील शेतकऱ्यांना सलग दुसऱ्या ...

दहिवडी : माण तालुक्यात टोमॅटोच्या मोठ्या प्रमाणात उत्पादक गावे असणारे मलवडी, भांडवली, शिंदी खुर्द, गाडेवाडी परिसरातील शेतकऱ्यांना सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचा फटका बसला आहे. बाजार समितीत अवघे तीन रुपये किलो दराने टोमॅटो विक्री होत असताना वाहतुकीचा खर्च मात्र चार रुपये करावे लागतात. त्यामुळे अनेकांनी फड सोडून दिले आहेत.

या भागातील शेतकऱ्यांचे वर्षभराचे अर्थकारण टोमॅटोवर अवलंबून असते. मलवडी, भांडवली, शिंदी खुर्द या गावातील जवळपास पाचशे एकर क्षेत्रावर आयुष्यमान, अनसल, आर्यमान, जवाहर, विजेता या जातीच्या टोमॅटोची दरवर्षी पाडव्याला लागवड होत असते. सोलापूर, बेळगाव, अमरावती, औरंगाबाद, पुणे, मुंबई, कोल्हापूर या बाजारपेठेत टोमॅटो येथून पाठवले जातात. रोज २० ते २५ लहान मोठी गाडी भरून माल जातो. त्यामुळे दरवर्षी जुलै, ऑगस्ट महिन्यात कोट्यवधीची उलाढाल होत असते. या व्यवसायावर मजूर वाहन व्यावसायिक व शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून असते. गेल्यावर्षी अचानक लॉकडाऊन पडल्याने बाजार समिती बंद होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना टोमॅटोचे फड आहे तसे सोडावे लागले होते. त्यानंतर सलग दुसऱ्या वर्षी या लॉकडाऊनचा फटका बसला आहे. बाजारसमिती सुरू असल्या तरी मालाचा उठाव होत नाही. दिल्ली, हैदराबाद या परिसरातील व्यापाऱ्यांनी पाठ फिरवल्याने दराने कंबरडे मोडले आहे. वीस किलोचे कॅरेट ६० रुपयांना आणि वाहतूक खर्च ८० रुपये येतो. त्यामुळे पदरचे पैसे भरण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

गेल्या वर्षीचा तोटा यावर्षी भरून निघेल या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोचे उत्पादन घेतले. कोकणामधून बांबू, तार, सुतळी आणून एकरी एक लाखापेक्षा जास्त खर्च केला. मात्र सलग दुसऱ्या वर्षी शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. परिणामी यावर्षीही बागा जागेवरच सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

चौकट

आम्हाला सलग दुसऱ्या वर्षी टोमॅटोची बाग सोडावी लागली. शासन फळबागाचा विमा उतरवते इतर पिकांचीही भरपाई देते मात्र नाशवंत टोमॅटोसाठी शासनाचे कसलेच धोरण नाही. ज्यांचे नुकसान झाले त्याचे पंचनामे होऊन किमान भरपाई दिली पाहिजे तरच शेतकरी सावरू शकेल अन्यथा कर्जबाजारी होण्याशिवाय पर्याय नाही, अशी भीती मलवडीतील शेतकरी दत्तात्रय मगर यांनी व्यक्त केली.

चौकट

टोमॅटो उत्पादनामुळे वाहतूकदारांना दोन महिने चांगला व्यवसाय मिळतो. यंदा मात्र दर नसल्याने शेतकऱ्यांना फटका बसत आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांने टोमॅटो जागेवरच सोडून दिले आहेत. त्याचा परिणाम वाहतूक व्यवसायावर झाला आहे.

- लालासाहेब घार्गे गाडेवाडी

फोटो १०दहिवडी-टोमॅटो

माण तालुक्यातील मलवडी येथे टोमॅटोला चांगला दर नसल्याने शेतकरी तुकाराम मगर यांनी बाग सोडून दिली आहे.