शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

सातारा: 'रयत' कारखाना निवडणुकीतून विरोधकांची माघार; बिनविरोधाची औपचारिकता बाकी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 1:31 PM

अपात्र ठरविलेल्या उमेदवारांनी साखर सहआयुक्त पुणे यांच्याकडे दाद मागितली. मात्र ही याचिका फेटाळण्यात आली

प्रमोद सुकरेकराड : शेवाळवाडी (ता. कराड) येथील रयत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक येत्या 24 जुलै रोजी होऊ घातली आहे. या निवडणुकीसाठी रयत व सहकार या दोन पॅनेलकडून अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र यातील सहकार पॅनेलने निवडणुकीतून माघार घेत असल्याचे आज, सोमवारी जाहीर केल्याने आता कारखाना निवडणूक बिनविरोधची औपचारिक घोषणा बाकी राहिली आहे. कारखान्याचे हित लक्षात घेऊनच आम्ही या निवडणूकीतून माघार घेत असल्याचे सहकार पॅनलचे प्रमुख अॅड. आनंदराव पाटील यांनी सांगितले.रयत सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी विद्यमान अध्यक्ष अॅड उदयसिंह पाटील व त्यांचे चुलत बंधू व कारखान्याचे माजी अध्यक्ष जयसिंगराव पाटील यांचे वारसदार अॅड. आनंदराव पाटील यांनी परस्परविरोधी पॅनेल उभे केले होते. मात्र अर्ज छाननीवेळी आनंदराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनेलचे काही अर्ज अवैध करण्यात आले. त्यामुळे काही ठिकाणी जागा बिनविरोध होणार अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यावर त्या अपात्र ठरविलेल्या उमेदवारांनी साखर सहआयुक्त पुणे यांच्याकडे दाद मागितली. मात्र ही याचिका फेटाळण्यात आली. त्यामुळे आता या निवडणुकीत काय होणार ?याबाबतची उत्सुकता लागून राहिली होती.दरम्यान आज, सोमवारी दुपारी सहकार पॅनलचे प्रमुख अॅड. आनंदराव पाटील व त्यांचे उमेदवारांनी कराड येथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. त्यावेळी त्यांनी आपण या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. अॅड. पाटील म्हणाले, रयत सहकारी साखर कारखान्याची उभारणी माजी मंत्री विलासराव पाटील व ज्येष्ठ नेते जयसिंगराव पाटील या दोन बंधूंनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केली. महाराष्ट्रात उभ्या राहिलेल्या कारखान्यापैकी अल्प खर्चामध्ये उभा राहिलेला रयत हा कारखाना आहे. पण त्यानंतरच्या काळात आलेला लोकरी मावा, गेटकेन ऊस, एफआरपी, आदिंमुळे कारखान्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे या दोन्ही बंधूनी अथणी शुगरला कारखाना चालवण्यास दिला. आज तो कारखाना कर्जमुक्त होण्याच्या मार्गावर आहे.खरंतर या निवडणुकीसाठी आमच्या पॅनेलने दाखल केलेले काही अर्ज बाद झाले. तरीही उर्वरित उमेदवार लढण्यासाठी तयार होते. मात्र ज्येष्ठ नेते जयसिंगराव पाटील यांनी शेतकरी, ऊस उत्पादक, कामगार व कारखान्याची आर्थिक परिस्थिती पाहता कोणतीही अट न घालता अर्ज मागे घेण्याच्या सूचना आम्हाला केल्या आहेत. सद्यस्थितीत कारखाना चालवायला दिला असल्याने निवडणुकीचा आर्थिक भार कारखान्यावर नको. कारखान्याचे हित लक्षात घेऊनच आम्ही या निवडणूकीतून माघार घेत  आहोत.सहकार्याची भूमिका घेऊनव्या संचालक मंडळाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन त्यांच्या उसाचे गाळप वेळेत करावे. मयत सभासदांच्या वारस नोंदी करून घ्याव्यात; कृष्णा नदीवरून करण्यात येणारी जलसिंचन योजना मार्गी लावावी; चांगला ऊस दर द्यावा; रोजगार निर्मितीला प्राधान्य द्यावे; को जनरेशन; वीज प्रकल्प; डिस्टलरी उभी करावी अशी अपेक्षा अँड. आनंदराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केली व यासाठी आपण सहकार्याची भूमिका घेऊ असेही यावेळी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूक