शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
2
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
3
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
4
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
5
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
6
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
7
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
8
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
9
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
10
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
11
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
12
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
14
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
15
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
16
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
17
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
18
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
19
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
20
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   

..अन्यथा नेत्यांच्या प्रचार सभा उधळून लावणार, शेतकरी संघटनेचे नेते शंकरराव गोडसेंनी दिला इशारा

By संजय पाटील | Updated: October 4, 2024 15:47 IST

कऱ्हाड : गतवर्षी साखर आयुक्तांपुढे झालेल्या बैठकीत ऊसाला ३ हजार १०० रुपये पहिली उचल देण्याचे कारखानदारांनी मान्य केले होते. ...

कऱ्हाड : गतवर्षी साखर आयुक्तांपुढे झालेल्या बैठकीत ऊसाला ३ हजार १०० रुपये पहिली उचल देण्याचे कारखानदारांनी मान्य केले होते. मात्र, जिल्ह्यातील कारखानदारांनी २ हजार ८०० ते ३ हजार १०० रूपयांच्या घरातच शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत. आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी कारखानदारांनी गतवर्षीची शिल्लक रक्कम देण्यासह यंदा गाळप होणाऱ्या उसाला ४ हजार रुपये पहिली उचल जाहीर करावी. अन्यथा कारखानदारांसह नेत्यांच्या सभा उधळून लावणार, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते शंकरराव गोडसे यांनी दिला. कऱ्हाडच्या शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संघटनेचे सातारा, सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.गोडसे म्हणाले, गतवर्षी गळीत झालेल्या उसाला ३ हजार १०० रुपये देण्याचे साखर आयुक्तांकडे झालेल्या बैठकीत कारखानदारांनी मान्य केले होते. साखर आयुक्त व जिल्हाधिकारी यांनीही तसे आदेश काढले होते. मात्र, दुसरा गळीत हंगाम सुरू होण्याची वेळ आली तरी काही कारखानदारांनी अद्यापही गतवर्षी गाळप झालेल्या उसाला ३ हजार १०० रुपये दिलेले नाहीत. जिल्ह्यातील काही कारखान्यांनी २ हजार ८०० ते ३ हजार रुपये दिले आहेत. त्यामुळे उर्वरित रक्कम कारखानदारांनी गाळप हंगामापूर्वीच शेतकºयांना दिली पाहिजे. त्याचबरोबर यंदा गाळप होणाºया उसाला प्रतिटन ४ हजार रुपये पहिली उचल देणे आवश्यक आहे.यंदा वर्षभर साखरेचा दर ४० रूपयाहून अधिक राहिला आहे. कारखानदारांनाही त्यामुळे ४ हजार दर देणे फारसे अवघड नाही. गत काही वर्षात महागाई वाढली असून त्याचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यां चा उत्पादन खर्च वाढला असून शेतकऱ्यांना शेती करणे परवडतच नाही. कारखानदारांनी आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच यंदा गाळप होणाऱ्या उसाला पहिली उचल जाहीर करावी. मगच कारखाने सुरू करावेत, अशी मागणी शंकरराव गोडसे यांनी केली आहे.कारखानदारांना गावात फिरकू देणार नाही!शेतकरी संघटना यंदा रास्तारोको, ट्रॅक्टरचे नुकसान करणे यासारखी रस्त्यावर उतरून आंदोलने करणार नाही. विधानसभा निवडणुकीत बहुतांश उमेदवार कारखान्यांशी निगडीतच आहेत. त्यामुळे संबंधित उमेदवार, कारखान्यांचे अध्यक्ष तसेच संचालकांना गावात फिरू देणार नाही. गावागावात निवडणूक कालावधीत होणाऱ्या सभा उधळून लावणार. प्रचाराच्या गाड्यांना माघारी पाठविले जाणार असल्याचे गोडसे यांनी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखाने