शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

गाळामुळे जलयुक्तचे बंधारे ‘ओव्हरफ्लो’!

By admin | Published: October 15, 2016 11:47 PM

बोडकेवाडी-उरूलवर यावर्षीही टंचाईचे संकट : गाळ काढण्यास शासनाची अनास्था; गवतामुळे जनावरांचा वावर

मल्हारपेठ : जलयुक्त शिवार योजनेतील बोडकेवाडी-उरूल, ता. पाटण गावास दुर्लक्षतेमुळे यावर्षीही भीषण पाणीटंचाईला समोरे जावे लागणार आहे. शासन गाळ काढण्यासाठी फक्त डिझेल तेलास ६० टक्के रक्कम देतो, असे सांगत आहे. त्यामुळे ३५ वर्षांपूर्वी बांधलेल्या ४ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे व ११ मातीचे बंधारे २० फूट गाळाने भरून ओढ्याप्रमाणे वाहत असून, पंधरा दिवसांत कोरडे पडतील. सध्या तेथे गवत असून जनावरांचा वावर आहे. मुबलक पाऊस पडूनसुद्धा चालू वर्षीही भीषण पाणीटंचाईला गावाला समोरे जावे लागणार असल्याचे ग्रामस्थांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. पाटण तालुक्यातील ९ गावे जलयुक्त शिवारसाठी निवडली असून, मल्हारपेठपासून सहा किलोमीटर अंतरावर डोंगराच्या शेजारी ९०० लोकसंख्या असणाऱ्या बोडकेवाडी-पांडवनगर गावाची जलयुक्त शिवार योजनेत निवड झाली आहे. जलयुक्तमुळे गावातील १३२ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार होते. फेब्रुवारी महिन्यात निवड झाल्यानंतर ग्रामस्थांनी फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला. शासनामार्फत बैठका झाल्या. संबंधित अधिकाऱ्यांनी कायमस्वरूपी गाव टंचाई मुक्त होईल, असे सांगितले. कृषी विभागाने अंदाजे ११ लाख रुपये खर्चाचा अहवाल तयार केला. वन विभागामार्फत दोन नवीन बंधारे बांधतो, असे सांगितले. शिवार फेरी व कृषी दिंडी काढली. त्यानंतर वन विभाग फिरकलाही नाही. १५ बंधाऱ्यांतील गाळ काढण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत कृषी विभागाकडे सतत पाठपुरावा केला असता जेसीबी सोडून फक्त ६० टक्के खर्च तोही डिझेल तेलासाठी लागणारा शासन देईल. बाकी लोक वर्गणीतून घालावा लागेल, अशी उत्तरे मिळाल्यामुळे मुबलक पाऊस पडूनही २०फूट भिंंतीपर्यंत भरलेल्या गाळावरून पाणी वाहून जात आहे. मातीचे बंधारे कोरडे पडले असून, त्यामध्ये शेजारी शेतकऱ्यांनी वैरणीसाठी गाळामध्ये उन्हाळी मका पेरली आहे. थोडेसे येणारे पाणी ओढ्याप्रमाणे वाहून जात आहे. शासनाने भिजत घोंगडे ठेवल्यामुळे अजून १५ दिवसांनंतर थेंबभर पाणी उरणार नाही. संपूर्ण बंधारे कोरडे पडतील. काही बंधारे आजही कोरडे पडले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. गेल्या काही वर्षांपासून पाऊसकाळ कमी होत गेल्यामुळे उन्हाळ्यातील दोन महिने बोडकेवाडीत तीव्र पाणीटंचाई निर्माण होते. गावात ३ सार्वजनिक विहिरी असून, १ कूपनलिका आहे. शेती कोरडवाहू असल्याने उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. गतवर्षी ग्रामपंचायतीने शासनाकडे टँकरची मागणी केली होती. तर विहिरी अधिग्रहणावरूनही बराच वाद झाला होता. त्यामुळे शासनाने बोडकेवाडी गाव जलयुक्त शिवारात घातले खरे मात्र शासनाच्या दुर्लक्षतेमुळे चालू वर्षीही उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. चालू वर्षी काम न झाल्याने शेतीला मिळणाऱ्या पाण्याचे स्वप्न भंग पावले आहे. जलयुक्त शिवार योजनेतून बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे काम झाले असते तर गावाचे नंदनवन झाले असते. पाणी प्रश्नही मिटला असता. लोकांनी भात, गहू, उन्हाळी भुईमूग व इतर पिके घेतली असती. गावातील सार्वजनिक व वैयक्तिक मालकीच्या विहिरींना पाणीही वाढले असते. शासनाच्या कचखाऊ धोरणामुळे बोडकेवाडी टंचाईमुक्त होईल का? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. जिल्ह्यात जलयुक्त शिवारमार्फत कोट्यवधी रुपयांची कामे झाली असे सांगणाऱ्या शासकीय यंत्रणेसह जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांनी प्रत्यक्ष येऊन बोडकेवाडीचा प्रश्न पाहावा व गाळ काढण्याबाबत काही तरी निर्णय घ्यावा, असे मत तरुण, महिला, ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. (वार्ताहर) आधी स्वागत, आता संताप ‘जलयुक्त शिवार हा शासनाचा देखावा असून, हातावर देऊन कोपरावर मारण्याचा प्रकार आहे. योजनेचे ग्रामस्थांनी फटाक्या वाजवून स्वागत केले. त्याच ग्रामस्थांच्यातून संताप व्यक्त होत आहे. चालू वर्षी जास्त पाऊस पडूनही असेच ऊन वाढत गेले तर बंधारे १५ दिवसांत कोरडे पडतील. लोकवर्गणीतून अनेक कामे केली असून, १२ लाखांची भारत निर्माणमधून पाणी योजना केली. आता ग्रामस्थ लोकवर्गणी देण्यास तयार नाहीत,’ असे ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील यांनी सांगितले.