शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
2
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
3
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
4
"घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गंमतीदार किस्सा
5
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
6
‘लाडकी बहीण’ योजनेत पुन्हा गैरप्रकार समोर; ६ लाडक्या भावांचे अर्ज, ‘असा’ लागला शोध
7
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
8
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
9
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
10
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
11
इटलीच्या PM मेलोनी यांना डेट करताहेत इलॉन मस्क? चर्चांना उधाण, स्पष्टीकरण देत म्हणाले...  
12
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली
13
“ब्रिजभूषण सिंहचा एन्काउंटर का केला नाही, RSSच्या लोकांना वाचवायला अक्षय शिंदेला संपवले”
14
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
15
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
17
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
18
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
19
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
20
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स

पक्षाच्या ए. बी. फॉर्ममुळे उमेदवार तळ्यात-मळ्यात

By admin | Published: November 02, 2016 11:09 PM

सर्वच पक्षांनी अपक्षांना दिली संधी : वडूजचं राजकारण घडतंय-बिघडतंय, नगरसेवक होण्यासाठी कायपण

वडूज : नगरपंचायतीच्या पहिल्या नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी विक्रमी अर्ज दाखल झाले असून यामध्ये भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सह अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. समोरासमोर लढतीत बहुतांशी प्रभागात सहा पेक्षा अधिक अर्ज दाखल आहेत. प्रत्येक उमेदवाराला आपणच नगरसेवक व्हावे, अशी प्रबळ इच्छाशक्ती आहे. त्यामुळे पक्षाची उमेदवारी मिळाली तरी ठिक अन्यथा अपक्ष म्हणून फडात राहणारच, अशी उर्मी मनात ठेवून प्रत्येक उमेदवार प्रचारात दंग आहेत. त्यामुळे नेत्यांवरील निष्ठा, पक्षनिष्ठा, राजकारणातील तत्त्वांना बगलफाटा देत प्रत्येकाने सोईचे राजकारण केले आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पक्षातर्फेअनेक अपक्षांना ही ए. बी. फॉर्म दिल्यामुळे अनेक उमेदवारांनी आपले पक्ष बदलून अपक्ष ही अर्ज ठेवले आहेत. या अचानक झालेल्या घडामोडींमुळे व पक्षाच्या ए. बी. फॉर्ममुळे उमेदवार सध्यातरी तळ्यात मळ्यात आहेत. काही ठिकाणी कोणताच पक्ष नको अशा स्वरूपाच्या नाट्यमय घडामोडी झाल्याने काहींचे अर्ज अपक्ष म्हणूनच दाखल झाले आहेत. तर नेत्यांच्या अचानक झालेल्या पक्ष प्रवेशामुळे ऐनवेळी पक्ष बदल ही झाले आहेत. काही प्रभागांत पक्षापेक्षा ज्येष्ठ नेत्यांच्या व्यक्तीनिष्ठ राजकारणाला प्राधान्य दिल्याने अपक्ष अर्ज ठेवणेच हिताचे अशा पद्धतीचे राजकारण सध्या वडूज नगरीत पाहावयास मिळत आहे. अपक्षांना पक्षाचे ए. बी. फॉर्म देऊन काही पक्षांनी स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतला असल्यासारखी परिस्थिती झाली आहे. एकाच प्रभागात दोन उमेदवारांना पक्षाचे ए. बी. फॉर्र्म दिल्याने आता अर्ज कोणाचा काढायचा यासाठी ‘डोक्याला हात लावून’ बसलेली नेतेमंडळी पाहावयास मिळत आहेत. तर काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली नाही म्हणून ऐनवेळी भाजपची उमेदवारी घेण्यात धन्यता मानणारे उमेदवार ही मतदार संघात चाचपणी करताना आढळत आहेत. काही ठिकाणी काँग्रेसची उमेदवारी निश्चित असताना अचानक राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने अर्ज दाखल झाल्याने काँग्रेसच्या नेतेमंडळींची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे या ठिकाणी स्वत: नेत्यांनाच रिंगणात उतरावे लागणार असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सेवानिवृत्त होईपर्यंत भाजप पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्यांनीही ऐनवेळी राष्ट्रवादी पक्षातून उमेदवारी केल्याने सर्वच पक्षांची खिचडी झाली आहे. या सर्व प्रकारामुळे वडूजचे राजकारण घडतंय-बिघडतंय असेच म्हणावे लागेल. पहिला ‘नगरसेवक ’ होण्यासाठी अतिउत्साही उमेदवारांची पक्षाच्या अंतर्गत खेळीमुळे फार मोठी राजकीय गोची झाली आहे. हे सर्व प्रकार मतदारराजा नजरेत साठवत असून, अशा उमेदवारांना राजकीय प्रसंगी राजकीय गुदगुल्याही करत आहेत. रणांगणात उतरलेल्या उमेदवारांची आता माघार नाही, याच ब्रीद वाक्याला सामोरे जात राजकीय लढाई लढणे क्रमप्राप्त आहे. उमेदवारांची महाभातातील ‘अभिमन्यू’ सारखी अवस्था झाल्याने हार नाही तर जीत हीच मानसिकता झाली आहे. पक्षाच्या तिकिटावर की अपक्ष उमेदवारी या मन:स्थितीत ‘हसावे की रडावे’ अशी अवस्था काही उमेदवारांची झाली आहे. एकूण काम नगरपंचायतीचा पहिला नगरसेवक होण्याचा मान मिळविण्यासाठी राजकारणात ‘कायपण’ असे म्हणून स्वत:चीच समजूत काढत उमेदवार प्रचारात व्यस्त आहेत. (प्रतिनिधी)