शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

धोकादायक : पिंपरद-टाकळवाडी गावांना जोडणारा पुलाचा खांब खचला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2021 11:10 AM

हा कालवा ब्रिटिशकालीन असल्याने यास जवळपास शंभर वर्षांचा कार्यकाल झाला आहे. पुलाच्या तळातील दगडी पिलर पाण्याच्या प्रवाहाने खचून दगडी निखळली आहेत.

कोळकी : पिंपरद-टाकळवाडी-गुणवरे या गावांना जोडणारा नीरा उजवा कालव्यावरील पुलाचा पिलर खचला असून, मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे पाटबंधारे विभागाने याची त्वरित दखल घेऊन तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

फलटण तालुक्यातून नीरा उजवा कालवा गेला असून, हा कालवा ब्रिटिशकालीन असल्याने यास जवळपास शंभर वर्षांचा कार्यकाल झाला आहे. यामुळे या कालव्यावरील बांधण्यात अनेक पुलांचे बांधकाम जीर्ण झाले आहे.

पिंपरद-टाकळवाडी-गुणवरे या गावांना जोडणारा नीरा उजवा कालव्यावरील पूल सन १९१८ साली बांधला असल्याचे दगडावर टाकलेल्या सालावरून दिसून येत आहे. पुलास शंभर वर्षे होऊन गेले आहे. पुलाचे दगडी बांधकाम चुनखडीत बांधले आहे. नीरा उजवा कालवा बारा महिने पूर्ण क्षमतेने वाहत असतो. शिवाय पाण्याचा प्रवाह वेग खूप असतो. त्यामुळे या पुलाच्या तळातील दगडी पिलर पाण्याच्या प्रवाहाने खचून दगडी निखळली आहेत.

जीर्ण पुलावर धोक्याची शक्यता...

- पिंपरद-टाकळवाडी-गुणवरे या भागात उसाचे क्षेत्र भरपूर असून, सध्या साखर कारखानाचे गळीत हंगाम सुरू आहे. या कारखान्यास उसाची वाहतूक, ट्रँकर, बैलगाडी ट्रक या अवजड वाहनांची वाहतूक या पुलावरून सध्या सुरू आहे.- त्यामुळे पण मोठी दुर्घटना घडू शकते. नीरा उजवा कालवा ब्रिटिशकालीन बांधकाम असून, यास शंभर वर्षांचा कालावधी होऊन गेला आहे. कालव्यावरील सर्वच पूल कालबाह्य झाले आहेत. या कालव्यामधील मोऱ्यांचे काम सध्या सुरू आहे.- या पद्धतीने पुलाचेदेखील काम करण्यात यावे, असे टाकळवाडी ग्रामपंचायत सरपंच राहुल इवरे यांनी पाटबंधारे विभागास पत्राद्वारे कळविले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर