शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराह 'नंबर १'! कसोटी क्रमवारीत विराट, यशस्वीची मोठी झेप; रोहित, पंत, गिलची घसरण
2
"मुलगी जर दिसायला चांगली असेल..."; अजितदादा समर्थक आमदाराचे महिलांबाबत वादग्रस्त विधान
3
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह बड्या नेत्यांचा खात्मा करणार, इराणने प्रसिद्ध केली मोस्ट वाँटेडची यादी
4
“आरक्षण वाचवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीला सत्तेत निवडून द्या”; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन
5
कमी तिथे आम्ही नव्हे, तर भारत म्हणजे 'हमी'! पुतिन यांच्यानंतर अजित डोवाल फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना भेटले; कारण काय?
6
"...मग मनोज जरांगेंनी आधी तिथला उमेदवार जाहीर करावा", लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज काय?
7
बांगलादेशवर मोठा विजय मिळवत 'कॅप्टन' रोहित शर्माचा विक्रम, विराट कोहलीला टाकलं मागे
8
लीड रोड करुनही झाली नाही लोकप्रिय; १० मिनिटांच्या 'त्या' भूमिकेने केलं स्टार, आता म्हणते...
9
'या' चुका तुम्हाला करतील कर्जबाजारी; 5 गोष्टी समजून घ्या
10
Palak Sindhwani: गुडबाय! 'तारक मेहता...' मधील सोनूचा मालिकेला रामराम; शेअर केली भावूक पोस्ट
11
मनोज जरांगेंनी कंबर कसली; दसरा मेळाव्याची सुरु केली तयारी, विविध ठिकाणी देणार भेटी
12
Irani Cup live : कडक सॅल्युट! सर्फराज खानचे अप्रतिम 'द्विशतक', मुंबईचा 'संकटमोचक' लै भारी लढला
13
धक्कादायक! झारखंडमध्ये रेल्वे ट्रॅकला बॉम्बने उडवले; भीषण स्फोटाने परिसर हादरला
14
ऑनलाईन गेमच्या नादात सेल्समन बनला चोर; शोरुममधील ७ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला
15
गोविंदाप्रमाणेच बॉलिवूड अभिनेत्रीच्या पतीलाही स्वत:च्याच बंदुकीतून लागली होती गोळी, लग्नानंतर ११ दिवसांतच उद्ध्वस्त झालेला संसार
16
"काँग्रेसनं लबाडीच्या राजकारणामुळं स्वतःला संपवलं", मनोज तिवारींचा जोरदार हल्लाबोल
17
“मोदी सातत्याने महात्मा गांधींचे नाव घेतात, पण अहिंसेचे पालन करत नाहीत”; काँग्रेसची टीका
18
इस्रायलसोबत युद्ध सुरू असतानाच इराणचं मोठं विधान; म्हणाला- नेतन्याहू या शतकातील 'नवा हिटलर, तर भारत..."
19
“भाजपाने आधीच हार मानली, २०२४ च्या विधानसभेला मविआचेच सरकार येणार”; नाना पटोलेंचा दावा
20
Gold Price Review: सोन्यापेक्षा चांदी अधिक महागली, महिन्याभरात ७१०२ रुपयांनी वाढली किंमत; कारण काय?

कमानींची दुर्दशा, उरलाय फक्त सांगाडा!--कऱ्हाड फोकस

By admin | Published: December 06, 2015 10:52 PM

शहरातील स्थिती : कमानींच्या डागडुजीकडे पालिकेचे दुर्लक्ष; दिशादर्शक नसल्याने प्रवाशांची दिशाभूल

संतोष गुरव-- कऱ्हाड  शहरात असलेल्या स्वच्छतेवरून तसेच चांगल्या रस्त्यांवरून शहारातील विकास किती प्रमाणात झाला आहे हे समजते. शहरातील सौंदर्याला सध्या अवकळा ठरणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. त्यापैकी एक म्हणजे २००० सालादरम्यान पालिकेकडून शहरात तीन ठिकाणी रस्त्यावर बांधण्यात आलेल्या तीन कमानी होय. अनोळखी प्रवाशांना जाण्यासाठी ठिकाणांच्या दिशांची माहिती देण्यात यावी व शहरातील सौंदर्यात भर पडावी, या उद्देशाने पालिकेतर्फे तीन कमानी बांधण्यात आल्या. या कमानींची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. डागडुजीअभावी या कमानींचा फक्त सांगाडाच उरला आहे. कऱ्हाड शहरात सध्या तहसील कार्यालय इमारत, तालुका पोलीस स्टेशन, दिवंगत यशवंतराव चव्हाण सभागृह, बहुद्देशीय केंद्र आणि स्वागत कमान अशी कामे केली जात आहेत. या कामांमुळे शहराचे नावलौकिक वाढणार असून, सौंदर्यात भरही पडणार आहे, अशी महत्त्वाची कामे सुरू असताना पालिकेकडून मात्र शहरातील तीन आकर्षक कमानींकडे दुर्लक्ष केले जात आहे. पंधरा वर्षांपूर्वी शहरातील शाहू महाराज चौक, बसस्थानक परिसर तसेच पोपटभाई पेट्रोलपंप मार्ग या ठिकाणी बांधण्यात आलेल्या लोखंडी कमानींची सध्या दुरवस्था झाली आहे. कमानींवर लावण्यात आलेले दिशादर्शक, सूचना फलक हे फाटून गेले असून, कमानीला गंज चढला आहे. गंजलेल्या कमानीकडे व फाटलेल्या फलकांकडे पाहिल्यास प्रवाशांतून व नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. पालिकेकडून शहरातील सुशोभीकरणाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने पालिकेच्या कामाबाबत व वाभाडे नागरिकांकडून काढले जात आहेत. शहरातील सुशोभीकरणासाठी पालिकेकडून दरवर्षी वार्षिक अंदाजपत्रकात ठराविक रकमेची तरतूद केली जाते. आकर्षक फुलझाडे, स्वच्छता संदेशाचे फलक तसेच आकर्षक कमानी यांचा समावेश सुशोभीकरणात येतो, अशी विविध कामे पालिकेकडून शहरात करणे अपेक्षित असते; मात्र कऱ्हाड शहरात पालिकेकडून यापैकी एकही गोष्ट वर्षभरात करण्यात आलेली नसल्याने याबाबत नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील शाहू महाराज चौक , बसस्थानक मार्गावरील मुख्य रस्ता व पोपटभाई पेट्रोलपंप परिसरात अशा तीन ठिकाणी तीस फूट उंचीच्या तीन आकर्षक लोखंडी कमानी पालिकेने बांधल्या आहेत. मजबूत व टिकावू अशा लोखंडाचा वापर करून बसविण्यात आलेल्या या कमानीला सुरुवातील आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली होती. तसेच या कमानीवर सोलापूर, पंढरपूर, विटा, सह्याद्री कारखाना, मसूर, कोरेगाव या मार्गाची नावे टाकण्यात आली होती. तसेच स्वच्छतेच्या संदेशाचे सूचना फलकही लावण्यात आले होते. सध्या मात्र, हे सूचना फलक फाटले असून, कमानींनाही गंज चढला आहे. कमानी उभारण्यात आल्यानंतर पंधरा वर्षांत पालिकेकडून कितीवेळा कमानींची डागडुजी व रंगकाम करण्यात आले याचे संशोधन करण्याची गरज आहे. शहरातील दुरवस्थेत असलेल्या कमानींची लवकरात लवकर डागडुजी करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. या ठिकाणी कमानींची आवश्यकताशहरात प्रवेश करण्यासाठी मुख्य तीन मार्ग आहेत. ते म्हणजे कोल्हापूर नाका, कृष्णा नाका आणि कार्वे नाका होय. या ठिकाणांतूनच शहरात प्रवेश केला जातो. सध्या कृष्णा नाका व कार्वे नाका येथे पालिकेकडून आकर्षक कमान उभारणे गरजेचे आहे. मात्र, सध्या कोल्हापूर नाका या ठिकाणी पालिकेने स्वागत कमान उभारली आहे.