शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; चंद्रशेखर बावनकुळेंविरोधातील उमेदवार ठरला
2
१०० हून अधिक लढाऊ विमाने... पाच शहरांवर हल्ला... इराणचे किती झाले नुकसान?
3
बाबा सिद्दीकींच्या मतदारसंघातून लॉरेन्स बिश्नोई लढणार? या पक्षाने निवडणूक आयोगाकडे मागितले एबी फॉर्म
4
PAK vs ENG : इंग्लंडची दाणादाण, पाकिस्ताननं रचला इतिहास; अखेर शेजाऱ्यांनी मालिका जिंकली
5
धक्कादायक! बनावट ईडीच्या पथकाचा व्यावसायिकाच्या घरावर छापा; वकिलाने आयकार्ड मागताच...
6
मविआ जागावाटपावर राहुल गांधी नाराज असल्याच्या चर्चा; वडेट्टीवारांची प्रतिक्रिया, म्हणाले...
7
बाळासाहेब थोरातांच्या कन्येबद्दल वादग्रस्त वक्तव्य; सुजय विखे-पाटील यांना अटक करण्याची मागणी
8
कारखाना, पक्षांतर अन् बंडखोरी...इंदापुरात कोणते मुद्दे वाढवणार हर्षवर्धन पाटलांची डोकेदुखी?
9
Yes Bank च्या शेअरमध्ये मोठी घसरण, यामागचं कारण काय? ५ दिवसांत ९ टक्क्यांनी आपटला
10
सोलापूर जिल्ह्यात इच्छुकांचे टेन्शन वाढले: मविआसह महायुतीतही प्रचंड तिढा; कोणती जागा कोणाला सुटणार?
11
'साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट' सांगणारा 'धर्मवीर २' OTT वर रिलीज! या ठिकाणी घरबसल्या पाहू शकता
12
राज ठाकरेंनी आयात उमेदवार लादला; शिंदेंनी २०१९ ला तिसऱ्या क्रमांकाची मते घेणारा नेता फोडला
13
मनोज जरांगे-उदय सामंतांची पुन्हा भेट! राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण; सामंत म्हणाले...
14
वरळीतून मिलिंद देवरांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध; "आम्हाला स्थानिकच आमदार हवा..." चा नारा
15
न्यूझीलंडनं ५७ धावांत गमावल्या ५ विकेट्स! टीम इंडियासमोर ३५९ धावांचे आव्हान
16
Jio युजर्सना दिवाळी गिफ्ट! 3350 रुपयांचा मोफत लाभ, जाणून घ्या सविस्तर...
17
उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी आली; कणकवलीत नितेश राणेंविरोधात हा दिला उमेदवार
18
"ताईचे पराक्रम..."; जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह विधान, सुजय विखे म्हणतात, "ते ऐकत नसल्याने..."
19
दिवाळीपूर्वी रमा एकादशी: व्रतपूजन कसे करावे? धन-वैभव-समृद्धी लाभ; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
Test Record : घरच्या मैदानात ३००+ धावांचा पाठलाग करताना कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर

कऱ्हाडात राजकीय आघाड्या टिकणार?, राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 11:15 AM

वैचारिक बैठक वेगवेगळी असेल तर त्यांचे मैत्रीपर्व हे किती दिवस चालते हे सत्तानाट्यावरून स्पष्ट झाले आहेच.

प्रमोद सुकरेकराड : राजकारणात कधी काय घडेल हे सांगता येत नाही. राज्यात राजकारणातून त्याचा अनुभव येत आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर हे सरकार पडण्यामागे अनैसर्गिक पद्धतीने झालेली महाविकास आघाडी हेच कारण दिले जात आहे, पण त्यामुळे आता कराड तालुक्यातील आघाड्या नैसर्गिक की अनैसर्गिक अन् त्याच्या भवितव्याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांनी केलेली आघाडी त्यांच्याच पक्षाच्या आमदारांना पचनी पडली नव्हती हे अडीच वर्षांनी बंडाच्या निमित्ताने समोर आले. वैचारिक बैठक वेगवेगळी असेल तर त्यांचे मैत्रीपर्व हे किती दिवस चालते हे सत्तानाट्यावरून स्पष्ट झाले आहेच. सोयीचे राजकारण आणि आघाड्या स्थानिक पातळीवरही होत राहतात. त्याचे भविष्यात काय होणार? याबाबतच्या चर्चा झाल्या नाहीत तर नवलच !

बाळासाहेब- उदयसिहांचं जिल्हा बँकेवरून बिघडलंदिवंगत विलासराव पाटील व माजी आमदार पी. डी. पाटील या दोघांच्यात सुमारे ४० वर्षेे चांगले राजकीय संबंध राहिले. तीच परंपरा बाळासाहेब पाटील व उदयसिंह पाटील पुढे काही वर्षे चालवत होते. मात्र, विलासराव पाटील यांच्या निधनानंतर जिल्हा बँक निवडणुकीत उदयसिंह पाटील यांनी सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली. त्याविरोधात बाळासाहेबांनी दंड थोपटले आणि दोन गटात बिघडलं. या निवडणुकीत उदयसिंह पाटलांच्या पाठीशी काँग्रेस किती उभी राहिली? याबाबतही उलटसुलट चर्चा आहेत.

बाळासाहेब पाटील- अतुल भोसले आघाडीबाळासाहेब पाटील व डॉ. अतुल भोसले या दोन गटांत जयवंत शुगरच्या उभारणीपासूनच सुप्त संघर्ष सुरू झाला होता. सन २००९ साली डॉ. भोसलेंनी राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवीत उत्तरेवर स्वारी केली. त्यामुळे आणखी बिघडले, पण नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या बाळासाहेब पाटील यांना भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. भोसले यांनी पाठिंबा देत त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर केला. डॉ. सुरेश भोसलेंनी तर यापुढे प्रत्येक निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांना आमची मदतच राहील, असे जाहीर करून टाकले आहे, पण राष्ट्रवादीच्या अविनाश मोहिते व भाजपच्या शेखर चरेगावकर, विक्रम पावसकर यांना ही बाब किती रुचली आहे हे कळायला थोडा वेळ जाईल एवढेच!

चव्हाण-उंडाळकर यांचं जुळलं !कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण व विलासराव पाटील या दोन गटांत काँग्रेसअंतर्गत संघर्ष सुमारे ३५ वर्षे पाहिला आहे. २ वर्षांपूर्वी विलासराव पाटील व पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत जाहीर मेळाव्यातून या संघर्षाला पूर्णविराम देण्यात आला, पण दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांची मने आजही जुळलेली दिसत नाहीत आणि डॉ. इंद्रजित मोहिते यांना हे किती पचनी पडले आहे. हे सांगता येत नाही.

कार्यकर्त्यांचा सूर...कराड पालिका निवडणूक पृथ्वीराज चव्हाण व बाळासाहेब पाटील यांच्या गटांनी एकत्रित लढावी; तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक ही बाळासाहेब पाटील व उंडाळकर यांच्या गटाने एकत्रित लढावी; भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरती लढाव्यात अशा भावना इच्छुक उमेदवारांच्या आहेत, पण या भावना नेत्यांपर्यंत पोहोचणार का? पोहोचल्याच तर नेते दखल घेणार का? हे पाहण्यासाठी थोडे थांबावेच लागेल.

महाविकास आघाडी एकत्र लढणार का?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीने एकत्रित लढाव्यात, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे, तर उद्धव ठाकरे यांनीही तीच री ओढलेली आहे. अशा परिस्थितीत कराड तालुक्यातील निवडणुका कशा होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारणcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा