शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीतून मोठी आऊटगोईंग?; प्रश्न विचारताच अजित पवार भडकले, खंबीर असल्याचं सांगत म्हणाले...
2
“आम्ही ठरवले आहे की पुन्हा सत्तेत आल्यास बहि‍णींना ३ हजार देणार”; शिंदे गटातील नेत्याचा शब्द
3
"लाडकी बहीण योजनेला कोणी टच करायला गेला, तर...", मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल
4
Reliance Industries च्या शेअर्समध्ये होतेय घसरण, बोनस शेअर्स देण्यात RIL का करतेय उशीर?
5
"…हे महायुती सरकारचं रिपोर्ट कार्ड नव्हे तर डिपोर्ट कार्ड", आदित्य ठाकरेंचा खोचक टोला
6
“विधानसभा लढवणार, जिंकणार अन् सत्ता आणणार”; राज ठाकरेंचा निर्धार, युतीबाबत म्हणाले...
7
काँग्रेसची शेवटच्या क्षणी माघार; J&K मध्ये ओमर सरकारला बाहेरुन पाठिंबा देणार, कारण काय ?
8
हरमनप्रीत कौरला भारताच्या कर्णधारपदावरुन काढून टाकण्याची हीच ती वेळ? वाचा
9
घसरणीनंतर पुन्हा सोन्याच्या किंमतीत तेजी, चांदीच्या किंमतीत १४०० रुपयांपेक्षा अधिक वाढ; पटापट चेक करा
10
IND vs NZ 1st Test Day 1: पावसामुळे पहिला दिवस गेला वाया; कसर भरून काढण्यासाठी असा ठरलाय दुसऱ्या दिवसाचा प्लान
11
ओमर अब्दुल्लांचे मोठी राजकीय खेळी; जम्मूतील हिंदू आमदाराला बनवले उपमुख्यमंत्री
12
विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी नायब सिंह सैनी; अमित शाहांच्या उपस्थितीत एकमताने निवड!
13
"चाकणकरांच्या बाबतीत तत्परता दाखवली, मग माझ्याबाबतीत का..."; अजित पवार गटातील नेत्याची उघड नाराजी
14
पावडरपासून Cancer होण्याचा आरोप, आता Johnson & Johnson 'या' व्यक्तीला देणार ₹१२६ कोटी; काय आहे प्रकरण?
15
IND vs AUS: "विराट कोहली आता अशा टप्प्यावर आहे की..."; माजी क्रिकेटपटूचा ऑस्ट्रेलियाला इशारा
16
"…हा आमचा फायदा आहे का?’’, मनोज जरांगे पाटलांचा महायुती सरकारला बोचरा सवाल
17
सकाळी उठलो आणि नळाला पाणीच नव्हतं! मराठवाड्यात सिनेमाच्या शूटिंगदरम्यानही 'पाणीबाणी', आदिनाथने सांगितला किस्सा
18
“आम्ही जे बोलतो ते करतो, मराठा आरक्षण...”; CM एकनाथ शिंदेंचा मनोज जरांगेंना सल्ला
19
१७ राज्यात फसवणूक, परदेशात नेटवर्क, २०० FIR...; गँगचा पर्दाफाश, मास्टरमाइंड आठवी पास
20
"सरकारचे पैसे लोकांना फुकट वाटणं..."; लाडकी बहीणबाबत राज ठाकरेचं मोठं विधान

देश महासत्ता बनविण्यासाठी लोकसंख्यावाढ नियंत्रित ठेवणे गरजेचे : घाडगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 4:27 AM

नागठाणे : ‘देशाला महासत्ता बनविण्यासाठी लोकसंख्यावाढ नियंत्रित ठेवणे गरजेचे असून, ती देशातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे’, असे उद्गार सातारा ...

नागठाणे : ‘देशाला महासत्ता बनविण्यासाठी लोकसंख्यावाढ नियंत्रित ठेवणे गरजेचे असून, ती देशातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे’, असे उद्गार सातारा येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे अर्थशास्र विभागाचे प्रा. डाॅ. आर. एम. घाडगे यांनी काढले.

आर्टस अँड काॅमर्स काॅलेज, नागठाणे या महाविद्यालयात अर्थशास्त्र व भूगोल विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकसंख्या पर्यावरण आणि विकास’ या विषयावरील व्याख्यानाप्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

घाडगे म्हणाले, ‘लोकसंख्यावाढ ही देशातील गंभीर समस्या असून, लोकसंख्यावाढीमुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे अन्न, वस्त्र आणि निवारा या गरजाही पूर्ण होत नाहीत. तसेच पर्यावरण आणि लोकसंख्या यांच्यात संतुलन साधण्यासाठी शाश्वत विकासाची गरज आहे.’

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डाॅ. जे. एस. पाटील आपल्या भाषणात म्हणाले, ‘लोकसंख्यावाढ व सामाजिक, आर्थिक व धार्मिक असमानतेमुळे देशात गरीब आणि श्रीमंत ही दरी अधिकच वाढत आहे. त्यामुळे हा समतोल साधण्याची समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. तसेच लोकसंख्यावाढ व सामाजिक विषमता याविषयी संत महात्म्यांनी प्राचीन काळीच भविष्यकालीन स्थितीचे वर्णन केलेले असून, तत्कालीन समाजाला निश्चितच प्रेरणादायी आणि आदर्शवत आहे.’

कार्यक्रमाचे अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. आर. एम. कांबळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. जयमाला उथळे यांनी सूत्रसंचालन केले. भूगोल विभागाचे प्रमुख प्रा. दीपक गुरव यांनी आभार मानले. हा कार्यक्रम झूम ॲपच्या माध्यमातून संपन्न झाला. कार्यक्रमास इतर महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी ऑनलाईन सहभाग नोंदविला. तांत्रिक साहाय्य प्रा. एन. एम. चोबे यांनी केले.