शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायली नागरिक अचानक भारत सोडून जाऊ लागले; पर्यटनाचे बुकिंग रद्द, विमाने फुल
2
"एकनाथ शिंदे दावोसमध्ये हॉटेलचं बिल न देताच..." जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
3
'सुप्रिया सुळेंना फुकटचं खायची सवय, १५०० दिले तर पवारांच्या...', भाजप आमदाराची टीका
4
Smart SIP Vs Regular SIP : स्मार्ट आणि रेग्युलर SIP मध्ये फरक काय, ५००० रुपयांतून २३ लाखांची होईल अधिक कमाई; कशी?
5
"सिंचन घोटाळा झाल्याचं पंतप्रधान मोदींनीच कबूल केलं"; पृथ्वीराज चव्हाणांनी अजित पवारांना पुन्हा डिवचलं
6
शाळेतून परतणाऱ्या मुलींची छेड काढणाऱ्यांचा 'हाफ एन्काऊंटर'; आरोपींचा पोलिसांवर गोळीबार
7
Suraj Chavan : १४ लाख अन् १० लाखांचा व्हाऊचर आणि..., बिग बॉस जिंकल्यानंतर सूरज चव्हाणला किती रुपये मिळाले?
8
'तो जिंकला अन् १ तासात गाणं तयार केलं', उत्कर्ष शिंदेने बनवलेलं सूरज चव्हाणवरचं धमाकेदार गाणं ऐकाच
9
अमेरिकेच्या अ‍ॅडवायझरीनंतर कराची विमानतळाबाहेर बॉम्बस्फोट; दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू
10
छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन
11
ओलाच्या सर्व्हिसवरून कुणाल कामरा-भाविश अग्रवाल भिडले; लोकांनी मालकाला आरसा दाखविला...
12
"शिवसेना वाढण्यासाठी हजारो शिवसैनिकांच्या हत्या"; रामदास कदमांचे वक्तव्य, म्हणाले "उद्धव ठाकरेंना याची..."
13
आजचे राशीभविष्य ७ ऑक्टोबर २०२४; धनलाभ होईल, येणारी बातमी...
14
“स्मारकाविरोधात कोर्टात जाणारे कोण तेही बघा”; देवेंद्र फडणवीसांचा संभाजीराजेंवर पलटवार
15
'त्या' सगळ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार: ठाकरे, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उद्धवसेनेत
16
“हिऱ्याच्या पोटी गारगोटी, मुलाशी का, बापाशी भिडा”; CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान
17
“लोकसभेची गणिते वेगळी होती, मनसेबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”: श्रीकांत शिंदे
18
मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
चांगल्यांचा सन्मान अन् वाईटांना शिक्षा करीत नाही ते म्हणजे सरकार: नितीन गडकरी
20
चेंबूरमध्ये अग्नितांडव, दुकानातील रॉकेलच्या साठ्याचा भडका; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू

पोवई नाक्यावर हेरलं.. दुचाकीस्वारांना ‘घेरलं’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2021 4:26 AM

सातारा : शनिवार, रविवार लाॅकडाऊनमध्ये विनाकारण बाहेर फिरणाऱ्या वाहनचालकांना पोवई नाक्यावर हेरून पोलिसांनी चारही बाजूंनी घेरलं. यामध्ये संचारबंदीचे उल्लंघन ...

सातारा : शनिवार, रविवार लाॅकडाऊनमध्ये विनाकारण बाहेर फिरणाऱ्या वाहनचालकांना पोवई नाक्यावर हेरून पोलिसांनी चारही बाजूंनी घेरलं. यामध्ये संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ४६ दुचाकीस्वारांवर कडक दंडात्मक कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे यावर देखरेख करण्यासाठी खुद्द पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल हे स्वत: रस्त्यावर उभे होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू केलीय.

जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याच्या मार्गावर असतानाच पुन्हा या लाटेने डोके वर काढलंय. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नव्याने निर्बंध घातले आहेत. शनिवार आणि रविवार हे दोन दिवस सुटीचे असल्यामुळे नागरिक काहीही करणे सांगून घराबाहेर पडतात. हे माहीत असल्यामुळे प्रशासनाने या दोन दिवसांत पूर्णपणे संचारबंदी लागू केली आहे. मात्र, तरीसुद्धा अनेकजण खोटी कारणे सांगून घराबाहेर पडत आहेत. अशा लोकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी शनिवारी पोवई नाक्यावर चारही बाजूने बंदोबस्त लावला. शहरातून बाहेर पडणारे आणि शहरात येणाऱ्या वाहनचालकांना अडविण्यात येत होते. या ठिकाणी खुद्द पोलीस अधीक्षकच हजर असल्याने पोलिसांनीही कोणाचीही गय केली नाही. संयुक्तिक कारण ज्यांचे नव्हते, अशा वाहनचालकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. तर काहीजणांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला.

शहरातील राजवाडा, मोती चाैक, देवी चाैक या ठिकाणी अक्षरश: शुकशुकाट होता. शहरातही नागरिकांची वर्दळ नव्हती. काही दुकाने सुरू होती. त्यामुळे नागरिक दुकानासमोर उभे होते. दुपारी दोननंतर सर्व दुकाने बंद झाली. शनिवारी अचानक निर्बंध वाढविल्यामुळे अनेक व्यावसायिक संभ्रमात पडले. त्यामुळे सकाळी अनेकांनी दुकाने उघडली होती. परंतु पोलिसांनी गस्त घालण्यास सुरुवात केल्यानंतर दुकानांचे शटर खाली घेण्यात आले.

चाैकट :

पोलिसांकडून दुचाकीस्वारांची पोलखोल..

दुचाकीस्वारांना अडविल्यानंतर कुठे गेला होता, असा पोलिसांचा पहिला प्रश्न होता. या प्रश्नावर अनेक वाहनचालकांची पुढील उत्तरे होती. लस घेण्यासाठी गेलो होतो, वडील दवाखान्यात आहेत, मित्राला डबा घेऊन गेलो होतो, मेडिकलमध्ये निघालोय, अशी एक ना एक कारणे वाहनचालक सांगत होते. यातील काहींच्या कारणांची पोलिसांनी खातरजमा केली. त्यावेळी बरेचजण खोटे बोलत असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी अशा वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई तर केलीच, शिवाय आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हाही दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.