शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

औंधसह १३ गावांतील वीजजोडणी तोडली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2021 4:26 AM

औंध : औंधसह परिसरातील १३ गावातील पथदिवे वीजजोडणी व पिण्याच्या पाण्याची तोडलेली वीजजोडणी वीज वितरणने त्वरित जोडावीत, अशी ...

औंध : औंधसह परिसरातील १३ गावातील पथदिवे वीजजोडणी व पिण्याच्या पाण्याची तोडलेली वीजजोडणी वीज वितरणने त्वरित जोडावीत, अशी मागणी औंधसह १३ गावच्या सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी लेखी निवेदनाद्वारे वीज वितरण कंपनीचे उपअभियंता सुभाष घाटोळ यांच्याकडे केली आहे. याबाबत त्वरित ठोस कारवाई करण्याची मागणीही या वेळी सरपंचांच्या शिष्टमंडळाने केली.

मागील आठ ते दहा दिवसांपासून औंधसह परिसरातील अंभेरी, कोकराळे, भोसरे, जायगाव, नांदोशी, येळीव, गोपूज, करांडेवाडी, गणेशवाडी व अन्य गावातील पथदिवे वीजजोडणी व अनेक गावांतील पिण्याच्या पाण्याच्या योजनेची वीज जोडणी वीजवितरण कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कट केली आहेत.

त्याचा परिणाम अनेक गावांमध्ये कोरोना संकटाबरोबरच हे नवीन संकट उभारले आहे. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे तसेच रात्रीच्या रस्त्यावरील अंधारामुळे आजारी रुग्णांचे हाल होऊ लागले आहेत. तसेच ठिकठिकाणी चोरटेही धुमाकूळ घालू लागले आहेत. नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी त्वरित वीजवितरण कंपनीने ही वीजजोडणी जोडावीत, याबाबत जनआंदोलन छेडले गेल्यास यास सर्वस्वी वीजवितरण कंपनी जबाबदार राहील, असा इशारा सरपंचांच्या शिष्टमंडळाने उपअभियंता सुभाष घाटोळ व ज्युनिअर अभियंता रुपेश लादे यांना दिलेल्या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या वेळी औंधचे उपसरपंच दीपक नलवडे, जायगावचे सरपंच नवनाथ देशमुख, येळीवचे सरपंच केशव जाधव, कोकराळे सरपंच भीमराव मदने, अंभेरीचे सरपंच रवींद्र शिंदे, भोसरेचे उपसरपंच सतीश जाधव, गणेश देशमुख, तानाजी इंगळे, चंद्रकांत घार्गे, अॅड. संतोष कमाने, संजय जाधव गावोगावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते.