शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडचं जागावाटप ठरलं, महाराष्ट्राचं कधी?; NDA मध्ये भाजपा लढणार सर्वाधिक जागा
2
आरोपीचा पक्ष कोणता हे पाहू नका, त्याला अटक करा; ठाणे प्रकरणावर राज ठाकरे संतापले
3
खुर्चीवर विराजमान होताच मुख्यमंत्री सैनी यांचा मोठा निर्णय; 'या' रुग्णांना मिळणार मोफत उपचार!
4
अस्सल मुंबईकर! फिल्डिंगमध्ये चेंडू लागल्याने मैदानाबाहेर गेला; बॅटिंगला मात्र वेळेत हजर झाला!
5
तरुणीच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी सापळा रचला, लॉरेन्स बिश्नोई टोळीचा शूटर हनीट्रॅपमुळे सापडला
6
IND vs NZ : रचिनची सेंच्युरी अन् साउदीची फिफ्टी; न्यूझीलंडचा पहिला डाव ४०० पार
7
“४ नोव्हेंबरला मोठा स्फोट होणार, मविआ-महायुतीचे एन्काउंटर करणार”; परिवर्तन महाशक्तीचा दावा
8
विक्रोळीत भाजी विक्रेत्यांकडून माजी महापौरांना धक्काबुक्की; दत्ता दळवींचे वॉर्ड ऑफिसवर आरोप
9
राज ठाकरेंचं पुत्र अमित ठाकरेंसाठी उद्धव ठाकरे गट माहिम मतदारसंघ सोडणार?
10
“भाजपाची बिष्णोई गँग त्रास देते, कसे लढायचे आम्हाला चांगले माहिती आहे”; संजय राऊतांची टीका
11
Diwali 2024: दिवाळीच्या दिवसात कशी ओळखावी खाद्यपदार्थातली भेसळ? करा 'हे' सोपे प्रयोग
12
Sharad Pawar News सिद्दिकींच्या हत्येनंतर केंद्रीय यंत्रणा सज्ज! शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा घेण्यासाठी केंद्राचा आग्रह
13
"विराट कोचला सांगू शकला असता, पण त्याने तसं केलं नाही"; ४६ All Out नंतर दिनेश कार्तिकचा दावा
14
Manappuram Finance Shares: RBI च्या कारवाईनंतर 'या' शेअरमध्ये हाहाकार, गुंतवणूकदारांकडून विक्री; ₹१४७ वर आला भाव, एक्सपर्ट म्हणाले...
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येवेळी सिक्योरिटी गार्ड काहीच का करू शकले नाहीत?, चौकशीदरम्यान खुलासा
16
शोएब अख्तरचा अंदाज ठरला खोटा; इंग्लंड विरुद्ध पाक संघानं विजय मिळवला मोठा
17
Ratan Tata : रतन टाटांचे चार विश्वासू शिलेदार; त्यांच्याकडेच दिलेत संपत्तीच्या वाटणीचे अधिकार! जाणून घ्या कोण आहेत ते?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : रोहित पाटील यांच्याविरोधात अजितदादांची खेळी? संजयकाकांनी घेतली अजित पवारांची भेट, चर्चांना उधाण
19
“तिढा सोडवण्यास राज्यातील काँग्रेस नेते सक्षम नाहीत, राहुल गांधींशी चर्चा करणार”: संजय राऊत
20
नरेंद्र भोंडेकर मुख्यमंत्र्यांची साथ सोडणार? अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम

Satara: अन्यायकारकपणे टोलवसुली बंद करा, उंब्रजसह परिसरातील नागरिकांचे तासवडे टोलनाक्यावर आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2024 1:56 PM

..तर टोल नाही टोले देऊ !

उंब्रज : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे टोलनाक्यावर स्थानिक वाहनधारकांकडून अन्यायकारकपणे टोलवसुली केली जात आहे. याच्या विरोधात उंब्रजसह परिसरातील नागरिकांनी रविवारी शेकडो चारचाकी प्रवासी, मालवाहतूक व खासगी वाहनांसह टोलनाक्याची सातारा ते कऱ्हाडला जाणारी वाहतूक रोखून आंदोलन केले.उंब्रजसह परिसरातील शेकडो नागरिकांनी चारचाकी प्रवासी, मालवाहतूक व खासगी वाहनांसह रविवारी सकाळी अकराच्या सुमारास तासवडे टोल नाक्याची सातारा-कऱ्हाड वाहतूक रोखली. टोल प्रशासनाला स्थानिकांना टोल नाक्याच्या स्थापनेपासून सुरू असणारी टोलमाफी कायम ठेवावी या मागणीचे निवेदन दिले. टोल आजपर्यंत दिला नाही, पुढेही टोल देणार अशी घोषणाबाजी आंदोलकांनी केली. टोल प्रशासनाच्या वतीने व्यवस्थापक थोरात यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी कऱ्हाड पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर उपस्थित होते. परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.तासवडे टोल नाक्यावर मागील आठ ते दहा दिवसांपासून स्थानिक नागरिकांच्या फास्ट टॅगमधून वाहनाने टोल परिससरात ये-जा केल्यानंतर आपोआप पैसे कापले जात होते. यामध्ये फास्ट टॅग घरी असला तरी काहींना मेसेज आल्याने स्थानिकांत नाहक भुर्दंड बसू लागल्याने रोष निर्माण होऊ लागला होता. याबाबत ३० जून रोजी उद्धवसेनेचे कऱ्हाड उत्तर तालुका प्रमुख संजय भोसले यांनी निवेदन दिले होते. तरीही टोल प्रशासनाने स्थानिकांची टोल वसुली सुरूच ठेवल्याने वाहनांसह मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. यानुसार रविवारी सकाळी अकरा वाजता परिसरातील आंदोलक वाहनांसह एकत्र जमा होऊन तासवडे टोलनाका परिसरात मार्गस्थ झाले.यावेळी उंब्रजचे सरपंच योगराज जाधव, मार्केट कमिटी संचालक सोमनाथ जाधव, उंब्रज ग्रामपंचायत सदस्य सुधाकर जाधव, संजय भोसले तसेच ग्रामस्थांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. ‘न्हाय’च्या कोल्हापूर कार्यालयास माहिती देऊन शासनाने मानवरहित टोल ही संकल्पना अवलंबली असल्याने नवीन पद्धतीने केली जाणारी टोल वसुली यंत्रणा अवलंबल्याने स्थानिकांचा टोल कापला जात आहे. वरिष्ठ कार्यालयाशी चर्चा करून समन्वय काढून अडचणीतून मार्ग काढणार आहे, अशी माहिती थोरात यांनी दिली.

..तर टोल नाही टोले देऊ !आजी-माजी स्थानिक लोकप्रतिनिधी शांत आहेत. नागरिकांच्या अडचणी त्यांना समजत नाहीत का? टोल नाक्यावर ये-जा करीत असताना स्थानिक नागरिकांचे वाहन सोडले जाते. गाडी टोल पास करून पुढे आल्यानंतर टोल कटिंग मेसेज येतो. हा वाहनधारकांच्या खिशावर दरोडा आहे. हे त्वरित न थांबल्यास टोल नाहीच पण टोले दिले जातील, असा इशारा उंब्रजचे सरपंच योगराज जाधव यांनी दिला.

टोलनाका स्थापनेपासून टोल दिला नाही व यापुढेही देणार नाही. स्थानिकांना दैनंदिन गोष्टीसाठी टोलनाक्यावरून ये-जा करावी लागते. वाहनधारकांच्या नकळत त्यांचे टोल कट होत आहेत, हा अन्याय स्थानिक कदापि सहन करणार नाहीत. - सोमनाथ जाधव, संचालक, शेती उत्पन्न बाजार समिती कऱ्हाड.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरhighwayमहामार्गtollplazaटोलनाकाagitationआंदोलन