शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

कोयना धरण क्षेत्रात पाऊस, विसर्ग सुरु होण्याची शक्यता

By प्रशांत कोळी | Published: October 14, 2022 2:39 PM

जिल्ह्यात मागील सहा दिवसांपासून परतीच्या पावसाची जोरदार हजेरी

सातारा : जिल्ह्यात परतीचा पाऊस सुरुच असून कोयना धरणक्षेत्रातही चांगली हजेरी लावली. त्यामुळे धरणात पाण्याची आवक होत असल्याने कोयनेतून पुन्हा विसर्ग होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात मागील सहा दिवसांपासून परतीचा पाऊस पडत आहे. पूर्व दुष्काळी भागातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तरीही काही भागात मोठ्या पावसाची गरज आहे. तरच पाझर तलावात पाणीसाठा होऊ शकतो. तर पश्चिम भागातही पाऊस पडतोय. त्यामुळे धोम, बलकवडी, कोयना, कण्हेर, तारळी, उरमोडीसारख्या प्रमुख धरणांत पाणी आवक होत आहे. परिणामी धरणांतील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग करावा लागत आहे.शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला २२ मिलीमीटर पाऊस पडला. तर नवजा येथे २३ आणि महाबळेश्वरला १७ मिलीमीटरची नोंद झाली. तर जूनपासून आतापर्यंत कोयनानगर येथे ४६०७, नवजा ५६५० आणि महाबळेश्वरमध्ये ६०६७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर शुक्रवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात १०४.७१ टीएमसी पाणीसाठा झाला होता. तर धरणात २७२६ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. धरण ९९.४९ टक्के भरले असून आणखी पाऊस झाल्यास धरणातून पुन्हा विसर्ग करावा लागणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरण