शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

राजीव गांधी विज्ञान-तंत्रज्ञानाचे जनक : जगदाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 4:38 AM

मसूर : ‘भारतातील विज्ञान व तंत्रज्ञानाचे खरे जनक दिवंगत राजीव गांधी आहेत. भारत बलशाली, स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर बनविण्याबरोबरच भारताला ...

मसूर : ‘भारतातील विज्ञान व तंत्रज्ञानाचे खरे जनक दिवंगत राजीव गांधी आहेत. भारत बलशाली, स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर बनविण्याबरोबरच भारताला महासत्ता बनविण्याचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी राजीव गांधी यांनी दिलेले योगदान विसरता येणार नाही,’ असे प्रतिपादन राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार जगदाळे यांनी केले.

मसूर येथे दिवंगत राजीव गांधी यांचा स्मृतिदिन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

जगदाळे म्हणाले, ‘द्वेषाचे राजकारण देश एकसंध बांधू शकत नाही. त्यासाठी राजकारण विसरून समाजकारण करा, असा विधायक सल्ला देणारे तसेच आधुनिकतेची कास धरून भारताला प्रगतिपथावर चालण्याची प्रेरणा देणारे दिवंगत राजीव गांधी यांच्यामुळे संगणक व दूरसंचार क्षेत्रात भारताचे नाव अग्रस्थानी पोहोचले. शेतकरी, कामगार सबल झाला पाहिजे हे त्यांचे स्वप्न होते. अहिंसेचे पालन हे हिंसेपेक्षा कितीतरी धाडसाचे असते हे त्यांचे म्हणणे होते. स्थानिक स्वराज्य संस्थांना जास्तीचा निधी मिळून त्यांचे सबलीकरण व्हावे यासाठी नेहमीच ते प्रयत्नशील होते.’

यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिग्विजयसिंह जगदाळे, सावळाराम कांबळे, माजी उपसरपंच शांताराम मोरे, गणेश मोरे, शकील शेख, काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. सावळाराम कांबळे यांनी प्रास्ताविक केले.