शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

रत्नागिरी : आंबेनळी अपघातातील त्या मृतांचे साहित्य नातेवाईकांना परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 15:25 IST

दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या ३० कर्मचाऱ्यांचा २८ जुलै २०१८ रोजी महाबळेश्वर - पोलादपूर आंबेनळी घाटात खोल दरीत बस कोसळून मृत्यू झाला होता. अपघातस्थळी त्या ३० कर्मचाऱ्यांचे सापडलेले साहित्य पोलादपूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक तथा या घटनेचे तपासिक अंमलदार प्रकाश पवार यांनी मृतांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केले.

ठळक मुद्देआंबेनळी अपघातातील त्या मृतांचे साहित्य नातेवाईकांना परतसाहित्य घेताना अनेकांचे अश्रू दाटले, दापोली कृषी विद्यापीठात उपस्थिती

दापोली : दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या ३० कर्मचाऱ्यांचा २८ जुलै २०१८ रोजी महाबळेश्वर - पोलादपूर आंबेनळी घाटात खोल दरीत बस कोसळून मृत्यू झाला होता. अपघातस्थळी त्या ३० कर्मचाऱ्यांचे सापडलेले साहित्य पोलादपूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक तथा या घटनेचे तपासिक अंमलदार प्रकाश पवार यांनी मृतांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केले.मोबाईल, बॅग, घड्याळ, एटीएम कार्ड, आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, सोन्याचे दागिने, रोख रक्कम आढळली होती. पंचनाम्यादरम्यान वस्तूंची ओळख पटवून त्यांची यादी तयार करण्यात आली होती. ही यादी पूर्ण झाल्यानंतर गुरुवार, १६ आॅगस्ट रोजी सायंकाळी मृत कर्मचाऱ्यांचे साहित्य, पंचनामे, शवविच्छेदन अहवालाची प्रत नातेवाईकांना देण्यात आली.तपासिक अंमलदार पवार दापोलीत आले होते. दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे प्रशासकीय इमारतीत मृतांच्या पत्नी व नातेवाईकांना बोलावण्यात आले होते. काही पालक विद्यापीठात पोहोचू शकली नाहीत. अशा कर्मचाºयांच्या नातेवाईकांच्या घरी जाऊन वस्तू देण्यात आल्या आहेत. काही मोबाईलच्या माध्यमातून या अपघाताचे गूढ उकलण्याची शक्यता आहे.अपघातस्थळावरून सापडलेल्या काही वस्तू नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. परंतु, सोन्याचे काही दागिने गायब झाले असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. या वस्तूंचाही शोध सुरू आहे. नेमका अपघात कशामुळे झाला व गाडी कोण चालवत होते. याचे गूढ कायम असून, याबाबत तपास सुरु आहे.वस्तू पाहताच आठवणी दाटल्याकर्मचाऱ्यांचे साहित्य घेताना अनेकांनी अश्रूला वाट मोकळी करून दिली. आई, वडील, पत्नी, भाऊ, बहीण जवळच्या नातेवाईकांना बोलावण्यात आले होते. त्या कर्मचाऱ्यांच्या पत्नीने जड अंत:करणाने घटनास्थळी सापडलेल्या वस्तू ताब्यात घेतल्या. परंतु, या वस्तूमुळे आठवणी ताज्या होऊन अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या.घड्याळांची टिक टिक थांबली...घड्याळांची टिक टिक ११ वाजून १७ मिनिटांनी किंवा ११ वाजून १६ मिनिटांनीच बंद पडल्याचे तपासादरम्याने सापडलेल्या घड्याळांवरून दिसत आहे. तपासादरम्याने सापडलेली ही घड्याळे सव्वा अकरानंतर बंद पडल्यामुळे अपघात अंदाजे ११ वाजल्यानंतर झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.अजूनही दु:खाचे सावट कायमआंबेनळी दुर्घटनेला २१ दिवस उलटून गेले असून, मृत कर्मचाऱ्यांची कुटुंब अजूनही धक्क्यातून सावरलेली नाहीत. दापोलीवर अजूनही दु:खाचे सावट असून, या धक्क्यातून ना विद्यापीठ सावरले ना दापोलीकर! परंतु, दापोलीकरांप्रमाणेच विद्यापीठानेही मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. 

टॅग्स :Satara Bus Accidentसातारा बस अपघातRatnagiriरत्नागिरीDapoli Police Thaneदापोली पोलीस ठाणे