शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
2
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
3
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
4
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
5
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
6
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
7
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
9
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
10
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
11
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
12
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
13
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
14
Weightless Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!
15
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
16
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
17
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
18
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
19
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
20
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट

यवतेश्वर घाटातील भेगाळलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2021 4:25 AM

पेट्री : सातारा - कास मार्गावरील यवतेश्वर घाटात सांबरवाडी फाट्यापासून काही अंतरावर साताऱ्याकडे येताना बुधवारी सायंकाळी रस्त्याची डावी बाजू ...

पेट्री : सातारा - कास मार्गावरील यवतेश्वर घाटात सांबरवाडी फाट्यापासून काही अंतरावर साताऱ्याकडे येताना बुधवारी सायंकाळी रस्त्याची डावी बाजू साधारण पाच-सहा मीटरपर्यंत भेगाळल्याने संबंधित विभागाकडून वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी धोक्याची पट्टी बांधण्यात आली होती. गुरुवारी ‘यवतेश्वर घाटातील रस्ता भेगाळला’ या शीर्षकाखाली ‘लोकमत’मध्ये बातमी प्रसिद्ध होताच या वृत्ताची दखल घेऊन बांधकाम विभागाकडून शनिवारपासून याठिकाणी दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केल्याने ग्रामस्थ, पर्यटक, वाहनचालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

यवतेश्वर घाटात सांबरवाडीहून साताऱ्याकडे येताना बुधवारी सायंकाळी रस्त्याची डावी बाजू साधारणत: पाच-सहा मीटर लांबीपर्यंत भेगाळल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली. पावसाचे दिवस असले तरी सध्या थोडीफार पावसाने उघडीप दिली असली तरी काही दिवसात पाऊस सुरू होऊन आणखी रस्ता खचण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. परिसरात काही दिवसांपूर्वी झालेला मुसळधार पाऊस, त्यात जड मालाची सतत वाहतूक यामुळे रस्ता भेगाळल्याची परिस्थिती निर्माण झाल्याने मार्गावरील वाहतूक रामभरोसे झाली होती.

शहराच्या पश्चिमेला नागरिक, पर्यटक, वाहनचालकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ सुरू असल्याने एखादी विपरीत घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याठिकाणी तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थ, पर्यटक, वाहनचालकांतून होत होती. दरम्यान, सुरक्षिततेच्या दृष्टीने याठिकाणी बाजूने धोक्याची पट्टी लावण्यात आली असली तरी भविष्यात होणारा अनर्थ टाळण्यासाठी तत्काळ या ठिकाणची दुरूस्ती होऊन उपाययोजना होणे आवश्यक असल्याची मागणी होत असताना ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच बातमीची दखल घेऊन शनिवारपासून युद्धपातळीवर काम सुरू झाले.

बुधवारी रस्ता भेगाळून नजीकची जुनी संरक्षक भिंत फुगल्याने पावसामुळे रस्ता खचून भिंत कोसळण्याची शक्यता होती. यामुळे सध्या ही जुनी संरक्षक भिंत जेसीबीने हटवून साधारण वीस मीटर लांब व चार मीटर उंच संरक्षक भिंत नव्याने बांधण्याचे काम सुरू आहे. यामुळे वाहनचालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

(चौकट)

दुसऱ्या बाजूला कठड्यांची दुरवस्था...

रस्त्याच्या एका बाजूला पावसाळ्यात कोसळणारी दरड तर दुसऱ्या बाजूला संरक्षक कठड्यांची दुरवस्था त्यात रस्त्याच्या भेगेचे संकट, यामुळे घाट धोकादायक असल्याचे म्हटले जात आहे. ऑक्टोबर २०१७ मध्ये यवतेश्वर घाटातील रस्ता खचून वाहतूक ठप्प होऊन काहीकाळ एकेरी वाहतूक सुरू होती.

०३पेट्री

यवतेश्वर घाटात बांधकाम विभागाकडून शनिवारपासून रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केल्याने पर्यटक, वाहनचालकांतून समाधान व्यक्त होत आहे. (छाया : सागर चव्हाण)