शहरं
Join us  
Trending Stories
1
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
2
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
3
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
4
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
5
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
6
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
7
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
8
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
9
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
10
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
11
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
12
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
13
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
14
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
15
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
16
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
17
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
18
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
20
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच

अनुभवातूनच माणूस समृध्द

By admin | Published: December 13, 2015 10:49 PM

आ. ह. साळुंखे : रहिमतपूर पंचक्रोशी साहित्य संमेलनात प्रतिपादन

रहिमतपूर : कोणताही साहित्यिक सभोवतालच्या परिस्थितीतून घडत असतो. त्यामुळे त्याचे नाते समाजाशी असले पाहिजे. समाजाच्या सुख-दु:खाशी त्यांना समरस होता आले पाहिजे. साहित्यिकांसाठी अनुभव, चिंंतन व अभिव्यक्ती या तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात. माणूस अनुभवातूनच श्रीमंत व समृध्द होतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत व रहिमतपूर पंचक्रोशी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. आ.ह. साळुंखे यांनी केले.रहिमतपूर, ता. कोरेगाव येथे रसिक साहित्य परिवार व महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती शाखा रहिमतपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंचक्रोशी साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी ज्येष्ठ विवेकवादी विचारवंत डॉ. शरद अभ्यंकर, स्वातंत्र्यसैनिक सोपानराव घोरपडे, स्वागताध्यक्ष मधुकर माने, प्रा. हिंंदुराव पवार, चंद्रहार माने, शंकरराव कणसे, केतन जाधव यासह विविध मान्यवर उपस्थित होते. साळुंखे म्हणाले की, बुध्दी ही माणसाला लाभलेली अनमोल देणगी आहे. विचार करण्याची शक्ती फक्त माणसाकडेच आहे. हे विचार एकमेकांना देता येतात. त्यामुळे संस्कृतीचा, भाषेचा विकास झाला आहे. असे सांगून ते पुढे म्हणाले की, निसर्गाने आपणाला केवढे वैभव दिले आहे. त्याचाही स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे. पशु-पक्ष्यांकडूनही आपण बरेच काही शिकू शकतो, पण त्यासाठी दृष्टी हवी. प्रारंभी ग्रंथदिंडी काढण्यात आली. या ग्रंथदिंडीत साहित्यिक, विद्यार्थी, नागरिक, रसिक सहभागी झाले होते. डॉ. शरद अभ्यंकर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संमेलनाचे दीपप्रज्वलन करुन उद्घाटन करण्यात आले.स्वागताध्यक्ष मधुकर माने यांनी प्रास्ताविक केले. प्रा. हिंंदुराव पवार यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. केशवराव माने यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी माधवराव माने, प्रा. प्रकाश बोधे, अरुण माने, धैर्यशील माने, अनंतराव माने, भरत शहा, सर्जेराव जाधव, सीताराम माने, रामदास निकम, शिवाजी शिंदे, संजय लोहार यासह कवी, साहित्यिक, नागरिक विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)वाचनाबरोबर लिखाणही करावेडॉ. शरद अभ्यंकर म्हणाले की, वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी घरोघरी उत्कृष्ट ग्रंथसंपदा असली पाहिजे. या आवडीतूनच काय वाचावे, याचे निश्चित असे भान येईल. वाचनाबरोबर थोडे लिखाणही करता आले पाहिजे. यातूनच उद्याचे कवी, साहित्यिक निर्माण होण्यास मदत होईल. अलिकडे वाचन संस्कृतीचा ऱ्हास होत आहे अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.