शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

सुगम-दुर्गम विरोधात उठलेय रान

By admin | Published: April 15, 2017 12:48 PM

शिक्षकांमध्ये नाराजी : जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातूनच विरोध वाढल्याचे चित्र

 

सातारा, दि. १५ : शिक्षकांच्या बदलीच्या अनुषंगाने काही दिवसांपासून जोरदार चर्चा झडत आहे. सुगम-दुर्गम अशा दोन प्रकारांत गावे विभागली गेली. जिल्ह्यातील २ हजार ७१६ शाळांपैकी ५२८ शाळा दुर्गम (अवघड क्षेत्र) भागात नोंदल्या गेल्या आहेत. डोंगर भागात असणाऱ्या शाळा यातून वगळण्यात आल्या तर काही ठिकाणी रस्त्याकडेला असणारी शाळाही दुर्गम भागात नोंदली गेली आहे. 

प्रशासनाच्या वतीने सुगम-दुर्गम शाळांचा सर्व्हे करण्यात आला होता. स्थानिक नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे भीतीपोटी तालुक्यातील स्थानिक प्रशासनाने या गावांच्या नोंदी केल्याचा आरोप शिक्षकांमधून होऊ लागला आहे. शासनाच्या या धोरणामुळे शिक्षकांवर अन्याय होईल, अशीच जोरदार चर्चा सुरू आहे. जे शिक्षक आपल्या सेवेच्या अखेरच्या टप्प्यात आहेत, त्यांची या निर्णयामुळे फरफट होणार आहे. या निर्णयाविरोधात शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही या विरोधात आक्रमक व्हावे, अशी मागणी शिक्षक करू लागले आहेत. काही मंडळी मंत्रालय स्तरावर आपला लढा देत आहेत. ज्या दुर्गम भागावर अन्याय झाला आहे, त्या गावांतूनही शासनाच्या निर्णयाला विरोध होताना पाहायला मिळतो आहे. सातारा तालुक्यातील राजापूर, ठोसेघर परिसरातील गावे तसेच मांडवे, आलवडी ही डोंगरावरील गावेही अवघड क्षेत्रात नोंदली गेलेली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. राजापूर, ठोसेघर या विभागांतील ग्रामस्थांची बैठक नुकतीच झाली. या बैठकीमध्ये या बैठकीतही शासनाच्या निर्णयाला कडाडून विरोध झाला. जिल्ह्याबाहेरील काही शिक्षक संघटना तर न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याच्या तयारीत असल्याचीही माहिती मिळत आहे. शासनाने निर्णयाचा फेरविचार करावा, यासाठी कृती समिती नेमण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. सातारा जिल्ह्यातील सरतेशेवटी ५२८ शाळांची अवघड शाळा म्हणून निवड झाली. जे लोक संघटना, आमदार, खासदार, सभापती, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य यांच्या भरवशावर राहिले, त्यांचा भ्रमनिरास झाला. आता चेंडू शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कोर्टात आहे. आता शिक्षकांना फक्त हरकती सादर करता येणार आहेत. शाळा दुर्गम आहे, हे प्रशासनाला पटवून देण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.हे मुद्दे सध्या आहेत चर्चेत-अवघड शाळा समाविष्ट करण्याबाबत वैयक्तिक अर्ज.- शाळा व्यवस्थापन समिती ठराव.- ग्रामपंचायत दाखला.- वन अधिकारी यांचा जंगली श्वापदे यांनी शेतीचे नुकसान, माणसांवर हल्ला केल्याचा दाखला.- शेती अधिकारी यांचा शेतांचा जंगली प्राणी शेतीचे नुकसान करत असल्याचा दाखला.- पावसाचे प्रमाण जास्त असल्याचा दाखला (संबंधित यंत्रणा)- पावसाळ्यात किंवा इतर वेळी घडलेल्या दुर्घटनांची पेपर मधील कात्रणे.- इतर नैसर्गिक आपत्ती.