शहरं
Join us  
Trending Stories
1
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
2
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?
3
ही आहेत चार प्रभावशाली कुटुंब, ज्यांच्याकडे आहे तिरुपतीच्या पूजेची जबाबदारी, एवढं मिळतं मानधन, आहे कोट्यवधीची संपत्ती
4
Telegram सीईओ Pavel Durov दबावाला बळी पडले? IP Address, नंबर शेअर करणार!
5
तिरुपती लाडू वाद: मंदिरात सफाई, देवाची माफी मागणार; पवन कल्याण करणार ११ दिवस प्रायश्चित्त
6
“विरोधकांनी राजकारण करायची गरज नाही”; अक्षय शिंदे एन्काउंटरवर रामदास आठवले थेट बोलले
7
Akshay Kumar : "आवाज केला असता तर गोळ्या घातल्या असत्या"; अक्षय कुमारने सांगितला चंबळचा थरारक अनुभव
8
रद्द करण्यात आलेले तीन कृषी कायदे परत आणावेत; कंगना राणौतची मोठी मागणी
9
T20 World Cup 2024 : 'स्वप्न'पूर्तीसाठी टीम इंडिया सज्ज! 'मन' खूप झालं आता 'जग' जिंकण्यासाठी हरमन है तय्यार
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या राजीनामा देणार? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर ठरणार भवितव्य
11
शेअर बाजारावर बॉट्सचा ताबा, FII ट्रेडर्सनं अल्गोरिदममध्ये फेरफार केला; ५९००० कोटींची कमाई : SEBI
12
पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह, अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी ठाकरे गट कोर्टात जाणार
13
"मी शरद पवारांना दैवत मानत आलोय", अजित पवार सुप्रिया सुळेंवर का भडकले?
14
स्वच्छता कर्मचारी गोळ्या कसा झाडेल? अक्षय शिंदे एन्काउंटरवर संजय राऊतांच्या फैरीवर फैरी
15
पाकिस्तान क्रिकेटला लवकरच 'अच्छे दिन'! कोच कर्स्टन यांना विश्वास; खेळाडूंसमोर ठेवल्या ३ अटी
16
KL राहुल मर्जीतला; टीम इंडियात सुरुये Sarfaraz Khan ला रिलीज करण्याचा विचार
17
Monkeypox : टेन्शन वाढलं! ज्याची भीती होती तेच घडलं; भारतात पोहोचला मंकीपॉक्सचा खतरनाक व्हेरिएंट
18
IND vs BAN: "...तर अश्विनला आधीच निवृत्ती घ्यायला लावली असती"; माँटी पानेसारचे मत
19
Munawar Faruqui buys Flat in Mumbai: मुनव्वर फारुकीने मुंबईत खरेदी केला कोट्यवधींचा फ्लॅट, कुठून होते इतकी कमाई?
20
नवीन मोबाईलची खरेदी अन् आयुष्याचा शेवट! मित्रांनीच केला घात, पार्टी न दिल्याने तरुणाची हत्या

सह्याद्री ऊस नव्हे तर माणसे गाळतो : उंडाळकर

By admin | Published: October 30, 2016 1:03 AM

उत्तरेत सक्षम नेतृत्त्व नाही : किवळ येथील कार्यक्रमात बाळासाहेब पाटलांवर कडाडून टीका

मसूर : ‘एकाच घरात सत्तेचा घरोबा करून जनतेचे शोषण करणे हे लोकशाहीला घातक आहे. आमदारकी व सह्याद्रीची सत्ता हे कायम भोगत सामान्य कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी करण्याचे राजकारण करीत सर्व सत्ताचे केंद्रीकरण करून यशवंतराव चव्हाण यांचा सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या विचाराला उत्तरेतील कर्तृत्वहीन नेतृत्व तिलांजली देत आहे. यशवंतराव चव्हाण यांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांचे दिवस संपले आहेत. सह्याद्री ऊस नव्हे तर माणसे गाळतो. उत्तरेत सक्षम नेतृत्व नाही.’ अशी टीका करून मसूर पूर्व भागाचा पाणी प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरलेले माजी मुख्यमंत्री आणि उत्तरेतील लोकप्रतिनिधींचा पराभव असल्याचा आरोप माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांनी केला.किवळ, ता. कऱ्हाड येथे मुंबई महानंदाच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल वसंतराव जगदाळे यांचा व रयत कारखान्याच्या चेअरमनपदी उदयसिंह पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी कस्टम अधिकारी मोहनराव साळुंखे होते. यावेळी कोयना दूध संघाचे अध्यक्ष डॉ. नाना यादव, उपाध्यक्ष बाबूराव धोकटे, कृष्णा कामगार संघटनेचे अध्यक्ष पै. आनंदराव मोहिते, आत्माराम जाधव, कोयना दूध संघाचे माजी अध्यक्ष संपतराव इंगवले, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पतंगराव माने, खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष अनिल मोहिते, संचालक रामकृष्ण वेताळ, धनाजी यांची प्रमुख उपस्थिती होती.पाटील म्हणाले, ‘सत्ता हे समाजसेवेच माध्यम आहे. तथापि उत्तरेतील लोकप्रतिनीधी आमदारकी व सह्याद्रीची सत्ता कायम भोगत आहेत. आम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्याला सत्तेत संधी दिल्या; मात्र इथल्या नेतृत्वाने सक्षम कार्यकर्त्यांना मोडीत काढून सत्तेच घराभोवती कोंडाळ केले. ही सामाजिक विषमता लोकशाहीला घातक आहे. सह्याद्रीचे अध्यक्ष आयत्या पिठावरचे असून, त्यांनी जनतेचे शोषण करून किती प्रापर्टी जमवल्या? याचे उत्तर त्यांच्याकडे नसून त्यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटले आहेत. यावेळी पै. आनंदराव मोहिते, बबनराव साळुंखे यांची भाषणे झाली. सुरुवातीला गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. युवराज पवार यांनी सूत्रसंचालन केले. पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर).. लोकप्रतिनिधींचा पराभवच‘उत्तरेत यशवंतराव चव्हाण यांचा विचार शोधण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. विकासाचे धोरण व इच्छाशक्ती नसल्यानेच उत्तरेतील जनतेला पाणी नाही हा इथल्या लोकप्रतिनिधींचा पराभव आहे. रयत चालवायला दिला. स्लिपिंग पार्टनर म्हणणे हा बौद्धिक बालिशपणा असून, अशा कर्तृत्वहीन नेतृत्वाला बाजूला सारून नव्या नेतृत्वाला संधी द्या. उत्तर-दक्षिणेतील एकाधिकारशाहीची राजवट सुज्ञ मतदारांनी उलथून टाकून परिवर्तनासाठी रयत सहकारच्या पाठीशी राहा,’ असे आवाहन विलासराव पाटील-उंडाळकर यांनी केले.वारसा हक्काने आयत्या सत्ता मिळाल्या : जगदाळेवसंतराव जगदाळे म्हणाले, ‘दिवगंत यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराला तिलांजली देऊन सत्तेचे केंद्रीकरण करणाऱ्या उत्तरेतील नेतृत्वाला वारसा हक्काने आयत्या सत्ता मिळाल्या. त्यांनी फ्लॅट व जमिनी खरेदी करण्याचा सपाटा सुरू केला आहे. मसूर भागात कोणता शाश्वत विकास केला नाही. पूर्व भागाला पाण्यापासून वंचित ठेवण्याचे पाप केले. विलासराव पाटील यांनी तीन डोंगर फोडून पाणी आणले; पण इथल्या नेतृत्वाला धनगरवाडी-हणबरवाडी पाणी योजना झाली नाही. सह्याद्री हे राजकारणाचे व्यासपीठ करून ठेवले आहे.’ तर तालुका दुष्काळाच्या खाईत जाईल : मानेपतंगराव माने म्हणाले, ‘गेली ५० वर्षे एकाच घरात सत्ता असतानाही भिकूनाना किवळकर, बाबासाहेब चोरेकरांच्या भागाचे वाळवण का केले? सत्तेवर अजूनही उपरे नेतृत्व ठेवले तर तालुका दुष्काळाच्या खाईत जाईल. सह्याद्रीला काकांनीच वाचवले, अन्यथा तुम्ही सत्तेवर दिसला नसता. राष्ट्रवादीने लाचारी पत्करू नये. काँग्रेसच्या नेतृत्वाने उत्तरेतील काँग्रेस मातीमोल केली. धैर्यशील कदमांचा बळी दिला. स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी रयत सहकारमध्ये सामील व्हावे, भविष्यात पंचायत समिती ही काकांच्या विचाराची असेल, असा विश्वास माने यांनी व्यक्त केला.