शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह' ! महिला सुरक्षेसाठी अजित पवारांचा 'पंचशक्ती' निर्णय
2
"शेतकऱ्यांच्या मुलांची परिस्थिती बिकट, हेच त्यांनी..."; अजितदादांच्या आमदाराने देवेंद्र भुयारांची घेतली बाजू
3
"वृद्धांना तरुण करू"; टाईम मशीनच्या जाळ्यात अडकले हजारो लोक, जोडप्याकडून कोट्यवधींचा गंडा
4
Amitabh Bachchan : "मी दिवसाला २०० सिगारेट ओढायचो, पण आता..."; 'असं' बदललं अमिताभ बच्चन यांचं आयुष्य
5
IPO असावा तर असा, लिस्टिंगच्या दिवशीच पैसा दुप्पट; आता Shares खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
6
Mumbai Metro 3 Ticket Rates: मेट्रो-३ चे तिकीटाचे दर काय? कुठून कुठवर सेवा? कसा होणार फायदा? जाणून घ्या सारंकाही...
7
मविआच्या जागावाटपात संजय राऊतांसोबत वाद?; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं
8
दिवसभर भीक मागायचे अन् रात्री हॉटेलात मुक्काम करायचे; २२ भिकाऱ्यांना पोलिसांनी पकडले
9
२ लाख कॅश, ३०० ग्रॅम सोनं, ११ किलो चांदी, १३ प्लॉट...; IAS अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड
10
Iran Isreal Tension : इस्त्रायलचा मारा सहन करू शकेल का इराण; जाणून घ्या देशाच्या अर्थव्यवस्थेची काय आहे स्थिती?
11
"आज कुछ तुफानी करते है!" Martin Guptill चा कडक सिक्सर; फुटल्या कॉमेंट्री बॉक्सच्या काचा!
12
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला अपहरण करून बेदम मारलं; धारदार शस्त्राने बोटे छाटले, वाद काय?
13
२००० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणाचा सूत्रधार काँग्रेसचा माजी पदाधिकारी; कोकेन प्रकरणात मोठा खुलासा
14
Bigg boss 18 मध्ये येणार 'तारक मेहता...'चा सोढी? महिनाभर बेपत्ता झालेल्या गुरुचरण सिंहचं नाव चर्चेत
15
Iran-Isreal तणावात गुंतवणूकदारांचे ₹५.६२ लाख कोटी स्वाहा, सेन्सेक्सचा एकच शेअर ग्रीन झोनमध्ये; निफ्टीही आपटला
16
ज्योत आणायला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी
17
तेलंगणा मंत्र्याचे समंथा-नागा चैतन्यच्या घटस्फोटावर आक्षेपार्ह विधान, अभिनेत्रीची संतप्त पोस्ट
18
इस्रायल-इराण युद्ध एकतर्फी होणार नाही; जाणून घ्या कुणाची लष्करी ताकद किती?
19
पुणे हेलिकॉप्टर अपघातील मृतांबाबत महत्त्वाची माहिती समोर; भारतासाठी दिलं होतं मोठं योगदान
20
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...

हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्री धावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 10:48 PM

दीपक शिंदे वैयक्तिक स्वार्थापेक्षा देशसेवा महत्त्वाची, असे मनाशी पक्के ठरवत सातारा लोकसभा मतदार संघातून १९६२ मध्ये क्रांतिसिंह नाना पाटील ...

दीपक शिंदेवैयक्तिक स्वार्थापेक्षा देशसेवा महत्त्वाची, असे मनाशी पक्के ठरवत सातारा लोकसभा मतदार संघातून १९६२ मध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांचा पराभव करून निवडून आलेले क्रांतिवीर किसन वीर यांनी आपला मतदारसंघ यशवंतराव चव्हाण यांच्यासाठी सोडला. यशवंतराव चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते; पण चीन आणि पाकिस्तान युद्धामुळे देशाला एका भक्कम संरक्षणमंत्र्यांची गरज होती. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना दिल्लीला बोलावून घेतले. यशवंतराव चव्हाण यांनी संरक्षणमंत्री म्हणून चांगली कामगिरी केली. हिमालयाच्या संरक्षणासाठी सह्याद्री धावला, अशा प्रकारचे कौतुकही झाले; पण १९६७ मध्ये त्यांना पुन्हा दिल्लीला जाण्यासाठी मतदारसंघ नव्हता.राज्यात पुन्हा थांबणे योग्य नव्हते. त्यामुळे यशवंतराव चव्हाण यांनी नाशिकमधून लढण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत किसन वीर यांना कळाल्यानंतर त्यांनी यशवंतराव चव्हाण यांना सातारा मतदार संघातूनच उभे राहण्यासाठी विनंती केली. त्यांच्या प्रचाराची सर्व जबाबदारी किसन वीर यांनी स्वत:वर घेतली. त्यामुळे १९६७ मध्ये सातारा लोकसभा मतदार संघातून यशवंतराव चव्हाण निवडून आले. त्यावेळी कºहाडमधून आनंदराव चव्हाण हे काँग्रेसकडून निवडणूक लढत होते. त्यांना अडचण निर्माण करण्याची यशवंतराव चव्हाण यांची इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी अखेर सातारा मतदार संघातूनच निवडणूक लढविली आणि सुमारे १ लाख २७ हजार ८३६ मतांनी जिंकली.यशवंतराव चव्हाण यांनी १९६७ नंतर १९७१, १९७७, १९८० असे चार वेळा सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्यामुळे देशात सातारा जिल्ह्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली. यशवंतराव चव्हाण यांनी केंद्रात संरक्षणमंत्री, अर्थ व नियोजन, गृहमंत्री त्याबरोबरच परराष्ट्रमंत्री अशी खाती त्यांनी सांभाळली. यशवंतराव चव्हाणांनी राजकारण आणि समाजकारण अशा दोन्ही गोष्टी अत्यंत जबाबदारीने सांभाळल्या. सहकार आणि कृषी यासाठी त्यांनी विशेष योगदान दिले. राज्य आणि देशाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाने सातारा लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले, ही या मतदारसंघ आणि सातारकरांच्या दृष्टीने अभिमानाचीच बाब आहे.