शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
2
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
3
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
4
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
5
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
6
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  
7
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
8
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
9
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
10
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
11
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
12
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
13
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
14
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
15
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
16
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
17
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
18
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
19
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
20
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ

लोककलावंतांच्या कार्यक्रमांवर कोरानामुळे संक्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 4:29 AM

कुडाळ: कोरोनामुळे गावोगावच्या यात्रा, जत्रा, उत्सव यावर गतवर्षीच्या मार्च महिन्यापासून निर्बंध घालण्यात आले. यामुळे या काळात यात्रेनिमित्त होणारे तमाशाचे ...

कुडाळ: कोरोनामुळे गावोगावच्या यात्रा, जत्रा, उत्सव यावर गतवर्षीच्या मार्च महिन्यापासून निर्बंध घालण्यात आले. यामुळे या काळात यात्रेनिमित्त होणारे तमाशाचे फड तसेच देव-देवतांचे होणारे गोंधळ, जागरणाचे कार्यक्रम सर्वच बंद झाले आहेत. त्यामुळे या कार्यक्रमातून आपली कला सादर करणाऱ्या लोककलावंतांच्या कलेवर मात्र संक्रांत आली आहे. हे कलावंत आर्थिक विवंचनेत सापडले असून, रोजगाराअभवी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

महाराष्ट्र हे लोककलांचे आगर आहे. यातही याचे खरे वैभव म्हणजे तमाशा. हा लोककलेचा एक प्रकार. अठराव्या शतकात सुरू झालेला तमाशा एकोणिसाव्या शतकापासून ते विसाव्या शतकाच्या मध्यकालापर्यंत बहरत गेला. शाहीर पठ्ठे बापूरावांचा काळ म्हणजे या कलेचा सुवर्णकाळ ठरला. यात्रा, जत्रांमधून मनोरंजन करत सामाजिक प्रबोधन साधण्याचा प्रयत्न यांच्याकडून होत होता. मात्र, कोरोनाच्या परिस्थितीमुळे तमाशाचे कार्यक्रम बंद झाले. त्याचबरोबर गोंधळ, भारुड, जागरण, कीर्तन आदी सर्वच लोककला आज थांबल्या आहेत. आपल्या पोटाची भूक भागवण्यासाठी कला सादर करणारा लोककलावंत मात्र आर्थिक विवंचनेत अडकला आहे.

गतवर्षी मार्च महिन्यात ऐन हंगामात कोरोनाच्या उद्रेकामुळे सर्वच ठप्प झाले. यात्रांचा हंगाम असल्याने याचा मोठा फटका तमाशा कलावंतांना बसला. फडमालकांच्या घेतलेल्या कामाच्या सुपाऱ्याही रद्द झाल्या. गतवर्षाची परिस्थिती आजही काहीशी तशीच आहे. अजूनही यात्रा, जत्रा, उत्सव यांना बंदीच घातलेली आहे. त्यामुळे यावर्षीसुद्धा या तमाशांचे खेळ होणार नाहीत. याचा परिणाम म्हणजे अशा परिस्थितीत फडमालक व तमाशा कलावंत हे मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मुळातच आपल्या कलेच्या सादरीकरणातून मिळालेल्या बिदागीवरच त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. मात्र, कोरोनाने सर्व काही हिरावून घेत त्यांचा रोजगरच नाहीसा केला. यामुळे पुन्हा कधी एकदा आपली कला प्रेक्षकांसमोर येईल आणि आपल्यालाही चांगले दिवस येतील, याचीच वाट पाहत आहेत.

(चौकट)

कार्यक्रमाला बंदी, रोजीरोटीचा प्रश्न..!

आज कोरोनाने सर्वच व्यवसाय ठप्प झाले आहेत. अशातच गेल्या दीड वर्षापासून महाराष्ट्राची लोककलाही याच्या विळख्यात सापडली आहे. यात्रा, जत्रा, उत्सव, धार्मिक कार्यक्रम बंद झाल्याने लोककलावंतांचा रोजगार नाहीसा झाला आहे. यामुळे कलावंत आर्थिक संकटात आहेत. गतवर्षी आणि यंदाही कार्यक्रमाला बंदी असल्याने त्यांच्यापुढे रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे पिढ्यानपिढ्या कलेचा वारसा जपणाऱ्या या कलावंतांना आज मात्र आर्थिक विवंचनेच्या छायेतच जीवन जगावे लागत आहे.