शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
3
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
4
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
5
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
6
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
7
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
8
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
9
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
11
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
12
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
13
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
14
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
15
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
16
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
18
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
19
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
20
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)

सातारा पूर: जिल्ह्याचा पाऊस करणार २००५ ची पुनरावृत्ती !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2019 12:29 PM

अजून दोन महिने बाकी : आतापर्यंत सरासरी ११०० मिलीमीटर पाऊस  

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने थैमान घातले असून आतापर्यंत वार्षिक सरासरी ओलांडून ११००  मिलीमीटरचा टप्पही पार केला आहे. त्यामुळे पावाळ्याचे अजून पावणे दोन महिने पाहता पावसाची वाटचाल ही २००५ च्या पर्जन्यमानाकडे सुरू असल्याचे दिसत आहे. कारण, त्यावेळी तब्बल २ हजार ८७ मिलीमीटर पाऊस झालेला. 

जिल्ह्यातील पावसाची जून ते सप्टेंबर दरम्यानच्या चार महिन्यातील पावसाची सरासरी  ८३४ मिलीमीटर आहे. त्या तुलनेत दरवर्षी कमी अधिक पाऊस पडत असतो. पण, यंदा या पावसाने वार्षिक सरासरी केव्हाच ओलांडलीय.  ५ ऑगस्टपर्यंत पाऊस ९३६ मिलीमीटर होऊन ११२ टक्के सरासरी राहिलीय. तर ८ ऑगस्टच्या सकाळपर्यंत सरासरी १०९५ मिलीमीटर पाऊस पडलाय. यातील अधिक करुन पाऊस हा गेल्या दहा दिवसांतीलच आहे. 

सध्याचे प्रमाण पाहता पावसाची वाटचाल २००५ या वर्षाकडे सुरू असल्याचे दिसते. कारण, त्यावेळी पावसाळ्यात तब्बल २ हजार ८७ मिलीमीटर पाऊस झालेला. सातारा तालुक्यात १८२१ मिलीमीटर, जावळी २७०२, कोरेगाव १३९५, कºहाड ११८४, पाटण ३२८९, फलटण ४४९, माण ५४२, खटाव ६०५, वाई १५३७, महाबळेश्वरला ८६३९ तर खंडाळा तालुक्यात ७७८ मिलीमीटर पाऊस झालेला. 

२००५ वर्षासारखी आतापर्यंतच्या १४ वर्षात कधीच पर्जन्यवृष्टी झालेली नाही. कारण त्यानंतर २००६ ला जिल्ह्यात सरासरी १९५० मिलीमीटर पावसाची नोंद झालेली. तर २००७ ला १५१०, २००८ मध्ये ११६९, २००९ ला ११३६, २०१० ला १२९७, २०११ मध्ये १२८३, २०१३ ला ११२९, २०१४ मध्ये १२१६, २०१६ साली १२३७, २०१७ मध्ये ११८२ आणि २०१८ साली ११३२ मिलीमीटर पाऊस झाला होता.   २०१५ ला कमी पाऊस...गेल्या १४ वर्षांत फक्त २०१२ आणि १५ सालीच पाऊस कमी झालेला. १२ साली ९३१ तर १५ ला अवघा ७७५ मिलीमीटर पाऊस झालेला. त्यावेळी जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती होती.   

टॅग्स :Satara Floodसातारा पूरWaterपाणी