शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

Satara news: फळबागा नसताना भरला विमा; भरपाई लाटण्याचा डाव, १४२ बोगस प्रकरणे

By नितीन काळेल | Published: April 20, 2023 6:10 PM

ज्या शेतकऱ्यांनी बाग नसतानाही विमा भरला, त्यांच्यावर काय कारवाई होणार?

नितीन काळेलसातारा : फळबाग नसतानाही आंबिया बहरात विमा भरून भरपाई लाटण्याचा डाव जिल्ह्यात उघडकीस आला असून, यासंदर्भाने तपासणीही पूर्ण झाली आहे. यामध्ये ५९९ शेतकऱ्यांनी विमा भरला होता. त्यातील १४२ जण बोगस असल्याचे समोर आल्याची माहिती हाती आली आहे.अतिवृष्टी, दुष्काळ, नैसर्गिक आपत्तीत फळबागांचे नुकसान झाल्यास भरपाई मिळण्यासाठी पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातही पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. २०२१च्या मृग बहरापासून २०२२-२३ च्या आंबिया बहरापर्यंत ९ हजार ८८३ शेतकऱ्यांनी या विमा योजनेत सहभाग घेतला आहे. तर फळबागा नसतानाही विमा लाभ घेतलेली अनेक प्रकरणे राज्यात उघडकीस आली आहेत. त्यामुळे याची तपासणी करण्यात येत आहे.सातारा जिल्ह्यातही फळबागांचा विमा उतरविलेल्या क्षेत्राची तपासणी प्रक्रिया झाली. आंबिया बहरातील ही तपासणी होती. यातून कितीजणांनी कागदावरच फळबागांचा विमा भरला ते समोर आलेले आहे. अशांची संख्या १४२ इतकी आहे, तर यासाठी ५९९ जणांनी विमा भरला होता, असे कृषी विभागातील सुत्रांनी सांगितले.

कारवाई होणार का ?फळबाग विमा ज्या शेतकऱ्यांनी भरला आहे, त्या शेतकऱ्यांची तपासणी झाली आहे. शेतकऱ्याकडे खरंच फळबाग आहे का ? किती क्षेत्र आहे, किती विमा भरला, याची माहिती घेण्यात आली. ज्या शेतकऱ्यांनी बाग नसतानाही विमा भरला, त्यांच्यावर काय कारवाई होणार, हे स्पष्ट नाही.

मृग बहरासाठी पाच हजार शेतकरी सहभागी...

गेल्या वर्षी मृग बहरात फळपीक विमा रक्कम भरणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या ४ हजार ७८४ इतकी आहे. त्यांनी २ हजार ३७२ हेक्टरसाठी विमा काढला होता. त्यासाठी ३० कोटी ८४ लाख इतकी विमा संरक्षित रक्कम होती, तर १ कोटी ५४ लाख २० हजार रुपये हप्त्यापोटी भरले होते. आंबियानंतर मृग बहरातील तपासणी होणार आहे का ? याबाबत अद्याप निश्चित काही झालेले नाही.

आंबिया बहरात २५१ हेक्टर क्षेत्र...रब्बीमधील २०२२-२३ वर्षात आंबिया बहरात विम्यात ५९९ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. तर २५१ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित होते. त्यासाठी ३३ लाख ८७ हजार ६४४ रुपये विमा हप्ता रक्कम शेतकऱ्यांनी भरली आहे.

पाच फळबागांसाठी योजना...

सातारा जिल्ह्यात फळपीक विमा योजना पाच फळांसाठी आहे. यामध्ये द्राक्ष, आंबा, केळी, स्ट्राॅबेरी आणि डाळिंब यांचा समावेश आहे.

तपासणीत तिघांचा समावेश...आंबिया बहरातील बोगस फळपीक विमा शोधण्याचे काम पूर्ण झाले आहे. यासाठी संबंधित विमा कंपनी प्रतिनिधी, तलाठी आणि कृषी सहायकांचा समावेश करण्यात आला होता. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ही तपासणी करण्यात आली.

१४२ बोगस; शासनाकडे प्रस्ताव...

जिल्ह्यातील आंबिया बहरातील फळबागांचा विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांच्या क्षेत्राची तपासणी झाली आहे. त्यातून १४२ बोगस प्रकरणे आढळली. याचा प्रस्ताव आता शासनाकडे पाठविण्यात आलेला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी