शहरं
Join us  
Trending Stories
1
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
2
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
3
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
4
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
5
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
6
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
7
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
8
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
9
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
10
भीतीदायक ‘फ्युचर’ अन् तोट्यातले ‘ऑप्शन्स’, तोट्याची गुंतवणूक तरी तिकडेच का वळतात पावले?
11
सॉफ्टवेअरद्वारे आगीची दुर्घटना तत्काळ कळणार; ११ शासकीय रुग्णालयांत लवकरच अद्ययावत यंत्रणा
12
अक्षयच्या एन्काउंटरबाबत सत्य लवकरच उघड होईल; ॲड. अमित कटारनवरे यांचा दावा
13
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करा; मुंबईतील वकिलाची सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका 
14
रुग्णालयात औषधांचा तुटवडा, रुग्णांचे आरोग्य रामभरोसे; थकबाकी ४० लाखांवर,
15
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
16
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
17
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
18
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
19
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
20
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!

साताऱ्यात रिक्षांचे मीटर डाऊन !

By admin | Published: April 02, 2017 3:37 PM

ठरवून होतो प्रवास : चालकांबरोबर प्रवाशांचीही डिजिटल मीटरला नापसंती

आॅनलाईन लोकमतसातारा : प्रवासी रिक्षांसाठी नव्याने बसविलेल्या इलेक्ट्रॉनिक डिजिटल मीटरमध्ये अनेक त्रुटी असल्याने चालकांबरोबर प्रवाशांचाही या मीटरवर विश्वास बसत नाही. शहरात फिरणाऱ्या सर्वच रिक्षांचे मीटर सध्या बंद अवस्थेत आहेत. यामुळे प्रवासीही रिक्षात बसण्यापूर्वी अमुक ठिकाणी किती घेणार? असा प्रश्न विचारून रक्कम ठरवत आहेत. प्रवासी रिक्षांसाठी नवीन डिजिटल मीटर सक्ती केल्यामुळे रिक्षा व्यावसायिकांनी पदरमोड करत ही मीटर बसविली. तरीही शहरातील रस्त्यांची अवस्था पाहता खड्ड्यात वाहने आदळले की हे मीटर बंद होत आहे. अनेक वेळा चुकीची खाचखळग्यांच्या रस्त्यामुळे मीटर बंद चालू होऊन रिडिंग चुकीचे दाखविते. तर काहीवेळा बॅटरी चार्ज नसल्याने मीटर सुरू होत नाही तर अनेकवेळा मधूनच पहिल्यापासून रीडिंगला सुरुवात होते.यामुळे चालकाबरोबर प्रवाशांची वारंवार हमरी-तुमरी होते. मीटर सुरू केले तरी प्रवासी भाडे ठरवूनच प्रवास करत असल्याने मीटरपायी हजारो रुपये गुंतून पडल्याचे रिक्षा व्यावसायिकांनी सांगितले. नव्याने बसविण्यात आलेले मीटरचा पहिला टप्पा दीड किलोमीटरचा आहे. याचाही फटका रिक्षा व्यावसायिकांना बसत आहे. तर प्रवासी देखील शहरातून प्रवास करण्यासाठी प्रतिप्रवासी पैसे आकारत आहेत. त्यामुळे सध्या शहरातील बहुतांशी भागात शहरी प्रवासी सीटप्रमाणे प्रवास क रण्याचे प्रमाण वाढले असल्याने मीटरची आवश्यता लागत नाही. शहरी प्रवासी पद्धतीमुळे रिक्षाचा प्रवासी वर्ग वाढला असून, यातून व्यावसायिक व प्रवाशांमधील तक्रारीही कमी झाल्या असल्याचा रिक्षाचालकांना अनुभव आहे. जुन्या मीटरची मागणीनवीन मीटरचा पहिला टप्पा दीड किलोमीटरचा आहे. साताऱ्याचे रस्ते पाहता एवढा टप्पा होत नाही. त्यामुळे जुन्या मीटरप्रमाणे १ किलोमीटरचा पहिला टप्पा करावा, अशी मागणी काही रिक्षाचालकांनी केली आहे. पुण्यात सिग्नल अधिक असल्याने तेथे चालू मीटरमध्ये रिक्षा थांबून राहतात. त्यामुळे पुण्याला नवीन मीटर व्यावसायिकांना परवडतात, असेही मत काही चालकांनी व्यक्त केले.