शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

पावसानं शिवार भिजवलं; काळ्या मातीच्या कुशीत बियाणं रुजवलं!

By नितीन काळेल | Updated: June 13, 2024 18:58 IST

साडे चार हजार हेक्टवर पेरणी; भात लागणीस प्रारंभ; बाजरी, मक्याची पेर

सातारा : जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस वेळेत सुरू झाल्याने खरीप हंगामातील पेरणीस सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात साडे चार हजार हेक्टरवर पेर झाली आहे. बाजरी, मका या पिकांचा प्रामुख्याने पेरणीत समावेश आहे. काही भागात भाताची लागणही सुरू झाली आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामातील सर्वसाधारण क्षेत्र हे २ लाख ८८ हजार ४९३ हेक्टर निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये सोयाबीनचे सर्वाधिक ७४ हजार ८०० हेक्टर क्षेत्र आहे. बाजरीचे ६० हजार ७३४ हेक्टर, भात ४३ हजार ९७८ हेक्टर, भुईमूग २९ हजार ४३५, खरीप ज्वारीचे ११ हजार १५२ हेक्टर तसेच मका १५हजार १९०, तर तूर, मूग, उडदाचे क्षेत्र कमी राहते. जिल्ह्यात यावर्षी पावसाला वेळेत सुरुवात झाली आहे. तसेच आतापर्यंत सर्वदूर पाऊस झाला आहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणी खरीप पेरणीसाठी वापसा आलेला नाही. त्यामुळे पेरणी खोळंबली आहे. तरीही शेतकऱ्यांनी माळरानावरील आणि वापसा आलेल्या रानात पेरणीस सुरुवात केली आहे.

खरीप हंगामातील पेरणी आतापर्यंत दीड टक्के झाली आहे. ४ हजार ३२९ हेक्टरवर पेर पूर्ण आहे. यामध्ये १ हजार ७८४ हेक्टरवर भात लागण झाली आहे. सातारा, पाटण, कऱ्हाड, वाई तालुक्यात लागणीला वेग आला आहे. बाजरीची ५ टक्के पेरणी झाली आहे. बाजरीचे सर्वाधिक क्षेत्र माण तालुक्यात ३१ हजार हेक्टरवर राहण्याचा अंदाज आहे. सध्या जिल्ह्यातील माणमध्येच पेर सुरू आहे. खटाव, फलटण, खंडाळा आणि कोरेगाव तालुक्यात सुरुवात झालेली नाही. ज्वारी आणि मका पिकाच्या पेरणीलाही सुरुवात झाली आहे. पण, पाऊस पडत असल्याने पेरणीला वेग आलेला नाही.

जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. यामुळे यंदाही क्षेत्र अधिक राहण्याचा अंदाज आहे. सध्या जिल्ह्यात ९६८ हेक्टरवर सोयाबीन पेरणी झाली. टक्केवारीत हे प्रमाण एक इतकेच आहे. तर सोयाबीनची सातारा, पाटण, कऱ्हाड, कोरेगाव या तालुक्यातच पेर सुरू असल्याचे दिसून येत आहे. भुईमुगाची पेरणी दोन टक्के क्षेत्रावर झाली आहे. पाटण तालुक्यात ७०६ हेक्टरवर सध्या भुईमूग पेरणी पूर्ण झाली आहे.

खरीपचे सर्वाधिक क्षेत्र पाटणमध्ये ४६ हजार हेक्टर

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात खरीप हंगामात पेरणी होते. सर्वाधिक क्षेत्र हे पाटण तालुक्यात ४६ हजार ३६७ हेक्टर राहण्याचा अंदाज आहे. यानंतर खटाव तालुक्यात ४५ हजार ८९६ हेक्टर, माण ३९ हजार ६०६, कऱ्हाड ३८ हजार ५७७, सातारा तालुका ३१ हजार ६५२, वाई १७ हजार २४२, जावळी १८ हजार २२०, कोरेगाव २० हजार ७६४, खंडाळा तालुका १० हजार ५६ आणि महाबळेश्वर तालुक्यात ४ हजार २२६ हेक्टर क्षेत्र राहण्याचा अंदाज आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी