शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

सातारा नगरपंचायतीत नगराध्यक्ष पदांसाठी राहणार चढाओढ

By admin | Published: October 19, 2016 11:43 PM

नगरपंचायतचे प्रथम नागरिक होण्याची सुप्त इच्छा अनेक जणांना आहे.

उंब्रज : नेहमीपेक्षा यंदा चांगला पाऊस झाला... नदी, नाले, ओढे भरून वाहत होते... कऱ्हाड तालुक्यातील सांबरवाडी तलावही काठोकाठ भरला; पण तलावाला लागलेल्या गळतीमुळे काही दिवसांत तो रिकामा झाला. शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पाणी वाहून गेले; पण प्रशासनाने डोळ्यावर पट्टी बांधल्याने चिमण्यांची तहान भागेल एवढेही पाणी राहिलेले नाही. यामुळे संताप व्यक्त होत आहे.सांबरवाडी येथील तलावाच्या बंधाऱ्याला गळती लागली होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने यापूर्वी आवाज उठविला होता. तरीही प्रशासनाने गांभीर्य न घेतल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. येथील शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत लाखो लिटर पाणी वाहून जात होते. हे पाणी तातडीने अडवावे, म्हणून येथील शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींकडे धाव घेतली होती. तसेच शासकीय अधिकाऱ्यांना भेटून परिस्थिती सांगितली होती; पण कोणीच दखल घेतली गेली नाही. अडलेल्या पाण्याच्या जीवावर विहिरींना पाणी वाढणार आणि बारमाही शेती बागायत होणार हे स्वप्न पाहणाऱ्या येथील शेतकऱ्यांची स्वप्ने गळतीच्या पाण्यातूनच वाहून गेली. ‘सरकारी काम आणि चार महिने थांब,’ अशी म्हण ग्रामीण भागात वापरली जाते; पण आता थांबायचे किती? हा प्रश्न शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे. कृष्णा नदीपासून सहा ते सात किलोमीटर अंतरावरील हे गाव. कृष्णा नदीकाठची सर्व गावे बागायती. उपसा जलसिंचन योजनेमुळे हा परिसर हिरवागार झालेला. पण, अशा योजनांचा लाभ या गावाला नाही. हे गाव या योजनते नावापुरते दिसते; पण या योजनेचे पाणी काही वेळेत मिळत नाही. पिके करपून जातात. यामुळे येथील अनेक शेतकऱ्यांनी बागायती शेती बंद केली असल्याचे येथील शेतक ऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे हा परिसर जिरायतीच राहिला. या तलावात पाणी अडले तर सांबरवाडीसह अंधारवाडी, हिंगनोळे, कोरीवळे या गावांच्या बहुतांशी शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघू शकतो. यासाठी लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, सत्ताधारी पक्षांचे पदाधिकारी यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले तर पुढील वर्षी तरी हा परिसर हिरवागार होऊ शकेल. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही योजना यशस्वी होऊ शकेल. अन्यथा राजकारणातील अडवा आणि जिरवा हे सूत्र वापरून बंधाऱ्याची गळती न काढल्यास या परिसरातील शेतकरी ही योग्य वेळी नक्कीच अडवतील आणि संबंधितांची जिरवतील हे मात्र नक्की. (प्रतिनिधी)तलावात थोडे पाणी असताना काही अधिकारी तलावाच्या ठिकाणी आले होते. ‘आम्ही आराखडा तयार करतो, लवकरच दुरुस्ती करू,’ असे सांगून गेले. ते त्यांचे इस्टिमेट अन् दुरुस्तीही तिकडेच. परत कोण फिरकलेच नाही. आता तर तलाव कोरडाच झाला आहे; पण पुढील वर्षी पाणीसाठा होण्यासाठी तरी प्रयत्न होणे अपेक्षित आहे. त्यासाठी दुरुस्ती करणे गरजेचे आहे. केवळ कागदी घोडे न नाचवता कृतीची आवश्यकता आहे. तरच पुढील वर्षी तरी पाणी साठा होईल.- दीपक साबळे, शेतकरी, सांबरवाडीप्रशासनाचे डोळे कधी उघडणारपाणी बचतीचा संदेश शासन पातळीवर दिला जात असताना जलसंधारणाच्या कामात ग्रामस्थ झोकून देऊन कामे करत आहेत. सांबळवाडी तलावातील गळतीबद्दल सांगूनही प्रशासन लक्ष देत नाही.