शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live: राज्यात एक दिवसाचा दुखवटा; NCPA मध्ये घेता येणार रतन टाटा यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
2
कर्मचाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी विमान उडवायला तयार झाले होते रतन टाटा, नेमकं काय घडलं होतं? पुण्यातला आहे किस्सा
3
निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत गटबाजी; मुख्यमंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू?
4
Ratan Tata Net Worth: आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेले रतन टाटा; दानच ९००० कोटींवर केलेले...
5
'ताज' बाहेरचे 'ते' कुत्रे आज पुन्हा पोरके झाले...टाटांनी मिळवून दिली होती हक्काची जागा!
6
Congo Fever : राजस्थानमध्ये खतरनाक आजाराची एन्ट्री; कांगो तापाने महिलेचा मृत्यू, सरकारने जारी केला अलर्ट
7
Ratan Tata : रतन टाटांनी देशासाठी एवढे केले, जे कुणालाही जमणार नाही; सच्चा देशभक्ताच्या या दहा गोष्टी...
8
'फक्त कंपनीला नाव नाही तर देशाला कीर्ती दिली..'; रतन टाटांच्या निधनानंतर दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
9
"हे टाटाच्या डीएनएमध्ये आहे...!" रतन टाटा यांची इच्छा, चेअरमन पद; लोकांना देत होते केवळ एकच सल्ला!
10
रतन टाटा यांच्या प्रेमात होती 'ही' बॉलिवूड अभिनेत्री, निधनानंतर शेअर केली भावुक पोस्ट, म्हणते- "तुम्ही गेलात पण..."
11
Donald Trump : "मोदी महान आहेत, ते वडिलांसमान वाटतात"; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं पंतप्रधानांचं भरभरून कौतुक
12
Ratan Tata : रतन टाटांवर सरस्वती आणि लक्ष्मीचा वरदहस्त कायम असण्यामागे होते 'हे' कारण!
13
रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर; कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत
14
असा माणूस पुन्हा होणे नाही! रतन टाटांच्या निधनानंतर रितेश देशमुखने ट्वीट करत वाहिली श्रद्धांजली
15
Ratan Tata News : "थँक यू फॉर..." आणि 'ती' ठरली रतन टाटांची अखेरची पोस्ट
16
Ratan Tata Successor: रतन टाटांचा उत्तराधिकारी कोण होणार? अब्जावधींचे साम्राज्य कोण सांभाळणार, ही नावे चर्चेत...
17
"मी का त्याची आठवण काढेन", सलमान खानचं नाव ऐकताच असं का म्हणाली युलिया वंतूर?
18
Ratan Tata : दानशूर! त्सुनामी असो किंवा कोरोनाचा उद्रेक... प्रत्येक संकटात मदत करण्यात रतन टाटा आघाडीवर
19
"एखाद्याला निरोप देताना आपण सहज “टा-टा” म्हणतो, पण तुम्हाला...", रतन टाटा यांच्या निधनानंतर कुशल बद्रिकेची पोस्ट
20
"माझ्यातली पोकळी भरुन काढण्याच्या प्रयत्नात..."; टाटांसह सावली सारख्या असणाऱ्या शंतनूची भावूक पोस्ट

Satara: पुसेसावळीची दंगल अन् समाजभान

By दीपक शिंदे | Published: September 23, 2023 12:41 PM

दीपक शिंदे, मुख्य उपसंपादक, सातारा आक्षेपार्ह पोस्टच्या कारणावरून पुसेसावळीत दंगल उसळली. त्यात एका निरपराध्याचा बळी गेला. अनेकजण जखमी होऊन ...

दीपक शिंदे, मुख्य उपसंपादक, साताराआक्षेपार्ह पोस्टच्या कारणावरून पुसेसावळीत दंगल उसळली. त्यात एका निरपराध्याचा बळी गेला. अनेकजण जखमी होऊन जायबंदी झाले. घरांची तोडफोड आणि वाहनांची जाळपोळ झाली. पुसेसावळीतील घटनेचे पडसाद जिल्हा आणि राज्यभर उमटले. पण, ही दंगल राजकारण्यांनी फारशी गांभीर्याने घेतलीच नाही असे जाणवले. दंगलीनंतर आठ दिवस कोणी पुसेसावळीकडे फिरकलेच नाही. जसे काही होतेय ते होऊ दे, आपल्याला काय त्याचे, अशा प्रकारची भावना दिसली. पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी मात्र, रोज त्या परिसरात जाऊन शांततेचे आवाहन करत होते. समाजातील संपत चाललेल्या माणुसकीचा हा दृश्य परिणाम तर नाही ना, असे वाटू लागले आहे.माणसा-माणसांमध्ये प्रेमभाव वाढावा यासाठी जातीव्यवस्था संपवून सर्व समाज एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. जातीव्यवस्था आता फार लोकांच्या मनात राहिलेली नाही. पण, काहींच्या डोक्यात आहे. त्यातूनच अनेकांची डोकी फिरवण्याचे काम काही महाभाग करत आहेत. विसरत चाललेले जात आणि धर्माचे मायाजाल पुन्हा टाकण्याचा काहींचा प्रयत्न यशस्वी होऊ लागला आहे. एखाद्याला लक्ष्य करुन त्याचा बीमोड करण्याची भावना वाढू लागली आहे. आतापर्यंत सुपारी देऊन आणि शस्त्रांच्या सहाय्याने एकमेकांवर हल्ले केले जात होते.

पण, आता सुपारी दिली जाते पण, ती सोशल माध्यमांची सुपारी असते. मोबाइल हे माध्यम आणि सोशल मीडिया हा त्यातील शस्त्र झाला आहे. या शस्त्राचा चुकीच्या पद्धतीने वापर करुन एकमेकांवर हल्ले करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न होत आहे. डोकी भडकवून जीवघेण्या इतपत भावना भडकविल्या जात आहेत. त्या थांबविण्यासाठी राज्यातील सत्ताधारीही कमी पडत आहेत.एखाद्या ठिकाणी दंगल उसळल्यानंतर तिथल्या लोकप्रतिनिधीने ताबडतोब उपस्थित राहून लोकांना आवाहन करण्याची आवश्यकता होती. पण, पुसेसावळी ज्या मतदारसंघात येते त्या मतदारसंघाचे आमदार दहा दिवसांनंतर मतदारसंघात गेले. पालकमंत्र्यांचीही तीच अवस्था. केवळ खासदार उदयनराजे भोसले यांच्यासारखा खासदार दंगल झाल्यानंतर काही तासांतच पुसेसावळीत पोहोचून लोकांना शांततेचे आवाहन करुन आले. इतरांमध्ये तेवढे धाडस नव्हते का?

का होत असलेल्या प्रकाराशी काही देणेघेणेच नव्हते. दंगलीत ज्यांच्या घरांचे नुकसान झाले, ज्यांच्या गाड्या जाळल्या गेल्या त्यांना किती नुकसानभरपाई मिळाली? त्यांना कोणी दिलासा दिला का? दंगलीत काही झाले तरी चालते का? ज्या निरपराध युवकाचा बळी गेला त्याच्या कुटुंबीयांना कोणी मदत केली का ? अजून तरी कोणी मदत केल्याचे ऐकिवात नाही. कोणी कशाला सरकारनेही अजून किती मदत देणार हे जाहीर केलेले नाही. देणार की नाही हे सुद्धा स्पष्ट नाही. एवढी अनास्था दाखविल्यानंतर कुटुंबीयांनी न्यायाची काय अपेक्षा करायची.अनास्थेच्या या प्रकारात काही सामाजिक संघटना आक्रमक झाल्या. पण, त्यांनीही मोर्चासारखे हत्यार उगारायचे ठरविले. त्यातून पुन्हा ताणतणाव अधिकच वाढणार म्हटल्यावर त्यांच्यावरही बंदी आणली. पण, खऱ्या अर्थाने दंगलीच्या घटनेवर जर उपाय करायचा असेल तर त्यातील दंगलग्रस्तांना मदत करण्याची आवश्यकता आहे. जी कोणीही आतापर्यंत केली नाही. केवळ शाब्दिक आश्वासनावर विसंबून चूल चालणार नाही. त्यासाठी वेगवेगळ्या स्तरातून मदतीची गरज आहे. तरच त्यांना यातून बाहेर पडण्यासाठी सहकार्य होईल.

कोणतीही गोष्टी पुढे पाठविण्यापूर्वी करा विचार ( थिंक )आपल्या हातात असलेल्या मोबाइलवर शेकडो गोष्टी येत असतात. त्यातली आपण काही पाहतो, काही पाहत नाही आणि काही पाहून पुढे पाठवितो. पुढे पाठविताना काही गोष्टींचा विचार होणे आवश्यक आहे. आपण पुढे पाठवत असलेली गोष्ट खरी आहे का, त्यात सत्यता किती आहे, दुसरी गोष्ट समाजासाठी हानिकारक तर नाही ना ? तिसरी बाब त्यातून आपण कोणती माहिती प्रसारित करीत आहोत ? चौथी बाब त्यातून नकारात्मक भावना तर समाजात पसरणार नाहीत ना आणि पाचवी बाब त्यातून आपण पाठवत असलेल्या व्यक्तीला किंवा समाजाला काही चांगले ज्ञान मिळेल का ? या सर्वांचा विचार करा आणि मगच एखादी पोस्ट पुढे पाठवा.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर