शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात मान्सून ६५ टक्केच बरसला, दुष्काळ गंभीर बनला

By नितीन काळेल | Updated: November 20, 2023 18:55 IST

परतीच्या पावसाचीही हुलकावणी; प्रशासनाचे नियोजन, दुष्काळी तालुके हवालदिल

सातारा : जिल्ह्याला मान्सूनने दगा दिल्याने पावसाळ्याच्या चार महिन्यात अवघा ६५ टक्के पाऊस बरसला. त्यामुळे यंदा तब्बल ३०६ मिलीमीटर पावसाची तूट आहे. त्यातच सर्वच तालुक्यातही कमी पर्जन्यमान झाले असून परतीच्या पावसानेही हुलकावणी दिली. त्यामुळे दुष्काळी भागात पाझर तलाव, ओढे कोरडे आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे नियोजन सुरू असून जनता हवालदिल झालेली आहे.सातारा जिल्ह्यातील शेती पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे जून महिन्यात मान्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांचे गणित सुरू होते. यंदा मात्र, हवामान विभागाने चांगला पाऊस पडेल असा अंदाज वर्तविलेला. पण, सातारा जिल्ह्यासाठी तरी हा अंदाज खोटा ठरलेला आहे. कारण, जूनपासून सप्टेंबरपर्यंतच्या पावसाळ्याच्या चार महिन्यात पावसाने सतत दगा दिला. मोठा पाऊस नसल्याने पावसाळ्याच्या चार महिन्यात जिल्ह्यात फक्त ६५.०४ टक्केच पर्जन्यमानाची नोंद झाली.

जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात सरासरी ८८६.०२ मिलीमीटर पाऊस होणे अपेक्षित असते. यंदा ३० सप्टेंबरअखेर फक्त ५७९.६ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली होती. याचाच अऱ्थ यावर्षी तब्बल ३०६ मिलीमीटर पावसाची तूट आहे. त्याचबरोबर सर्वच तालुक्यात कमी पावसाची नोंद झाली. यंदा कोणत्याही तालुक्यात १०० टक्के पाऊस झालेला नाही. यामध्ये सर्वात कमी पाऊस कोरेगाव तालुक्यात ४८ टक्केच झाला. तर सर्वाधिक पाऊस सातारा तालुक्यात ७६ टक्क्यांपर्यंत पडला आहे. त्यामुळे इतर तालुक्यातील पावसाची स्थिती समजून येते.

दुष्काळी तालुके हवालदिल..दुष्काळी माण, खटाव, फलटण, कोरेगाव आणि खंडाळा तालुक्यात पावसाने डोळे वटारलेले दिसून आले. यामुळे या तालुक्यात चिंताजनक स्थिती आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यांत कोरेगाव तालुक्यात ४८.०१ टक्के पाऊस झाला. तर माणमध्ये ६१.५, खटाव ६८.६, फलटण ४९.१, खंडाळा तालुक्यात ५२.५ टक्के पाऊस पडला आहे. यामुळे चारा टंचाई जाणवणार आहे. त्याचबरोबर माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर होणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरdroughtदुष्काळRainपाऊस