शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
4
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
5
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
6
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
7
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
8
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
9
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
10
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
11
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
12
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
13
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
14
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
15
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
17
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
18
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
19
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
20
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका

पाऊस आला धावून; टँकरची संख्या २१८ वरून आली ३२ वर! ४३ गावे अन् १६३ वाड्यांनाच पुरवठा

By नितीन काळेल | Published: June 25, 2024 7:48 PM

Satara News: जून महिन्यात वेळेमध्ये दाखल झालेल्या मान्सूनने दमदार हजेरी लावल्याने टंचाईची स्थिती कमी झाली आहे. टँकरची संख्याही २१८ वरून ३२ पर्यंत खाली आली आहे, तर सध्या ४३ गावे आणि १६३ वाड्यांनाच पाणीपुरवठा केला जात असून, फलटण, कऱ्हाड, खंडाळा तालुक्यातील टँकर बंद झाले आहेत.

- नितीन काळेलसातारा - जून महिन्यात वेळेमध्ये दाखल झालेल्या मान्सूनने दमदार हजेरी लावल्याने टंचाईची स्थिती कमी झाली आहे. टँकरची संख्याही २१८ वरून ३२ पर्यंत खाली आली आहे, तर सध्या ४३ गावे आणि १६३ वाड्यांनाच पाणीपुरवठा केला जात असून, फलटण, कऱ्हाड, खंडाळा तालुक्यातील टँकर बंद झाले आहेत.

जिल्ह्यात गेल्या वर्षी अपुरे पर्जन्यमान झाले होते. त्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली, तसेच टंचाईही वाढली होती. यासाठी गेल्या वर्षी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यापासूनच अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता, तर मार्चनंतर टंचाईची दाहकता अधिक वाढली. यामुळे अडीच लाख नागरिकांना टँकरच्याच पाण्याचा आधार होता. मात्र, जून महिन्यात वेळेत मान्सून दाखल झाला, तसेच बहुतांशी भागात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे टँकरची संख्या कमी झाली आहे.

जिल्ह्यात ७ जून रोजी २१८ गावे आणि ७१७ वाड्यावस्त्यांना टँकरने, तसेच विहिरी, बोअरवेल अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात येत होता. यासाठी २१८ टँकरचा धुरळा पाणीपुरवठा करण्यासाठी उडत होता. मात्र, याचदरम्यान पावसाला सुरुवात झाल्यानंतर टँकरची संख्या कमी झाली. सध्या ४३ गावे आणि १६३ वाड्यांची तहान टँकर आणि अधिग्रहण केलेल्या विहिरींवर अवलंबून आहे. माण तालुक्यात टंचाई कमी झाली असली तरी सध्या २२ गावे आणि १५३ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येतोय. १६ टँकरवर ५१ हजार नागरिकांची तहान भागत आहे. तालुक्यातील पांगरी, मोही, शेवरी, राणंद, भाटकी, वरकुटे म्हसवड, कारखेल, संभूखेड, हवालदारवाडी, रांजणी, हिंगणी, पळशी, पिंपरी, जाशी, भालवडी, पर्यंती, इंजबाव, परकंदी आदी गावांत टँकरने पाणीपुरवठा होतोय, तर खटाव तालुक्यात फक्त ६ गावे आणि ४ वाड्यांसाठी टँकर सुरू आहे. मोळ, मांजरवाडी, नवलेवाडी, गारुडी, गारळेवाडी येथे टँकर सुरू आहेत. फलटण तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने टंचाई निवारण झाले. त्यामुळे टँकर बंद झाले. कोरेगाव तालुक्यात ९ गावांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे. १६ हजार नागरिक आणि १० हजार पशुधन टँकरवर अवलंबून आहे. कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात टंचाई अजून कायम आहे.

खंडाळा तालुक्यात टँकर बंद झाले; पण वाई तालुक्यात अजूनही ५ गावे आणि ६ वाड्यांसाठी टँकर सुरू आहेत. ३ टँकरवर ५ हजार नागरिक आणि ३ हजार ७११ जनावरांना पाणीपुरवठा केला जात आहे. पाटण तालुक्यात टँकर सुरू नाही. जावळीत एकाच गावाला पाणीपुरवठा सुरू आहे. महाबळेश्वर, सातारा आणि कऱ्हाड तालुक्यात एकही टँकर सुरू नाही.

टॅग्स :water shortageपाणीकपातSatara areaसातारा परिसर