शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

सातारा : ज्यांच्याकडे पाणी मागितले त्यांच्या तोंडचे पाणी पळण्याची वेळ : पूनम महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 14:18 IST

दुष्काळी तालुक्यातील पाणीप्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी राज्य सरकारने जास्तीत जास्त निधी दिला. गेली अनेक वर्षे ज्यांना पाणी मागितले आता त्यांच्या तोंडचे पाणी पळवण्याची ताकद आपल्या हातात आली आहे, असे आवाहन येथील दुष्काळी जनतेला भारतीय जनता युवा मोचार्चे राष्ट्रीय अध्यक्षा खासदार पूनम महाजन यांनी केले.

ठळक मुद्देज्यांच्याकडे पाणी मागितले त्यांच्या तोंडचे पाणी पळण्याची वेळ : पूनम महाजन म्हसवड येथील युवा संवाद यात्रेच्या सभेत विरोधकांवर हल्लाबोल

म्हसवड : दुष्काळी तालुक्यातील पाणीप्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी राज्य सरकारने जास्तीत जास्त निधी दिला. गेली अनेक वर्षे ज्यांना पाणी मागितले आता त्यांच्या तोंडचे पाणी पळवण्याची ताकद आपल्या हातात आली आहे, असे आवाहन येथील दुष्काळी जनतेला भारतीय जनता युवा मोचार्चे राष्ट्रीय अध्यक्षा खासदार पूनम महाजन यांनी केले.भारतीय जनता पक्षाच्या वतीने म्हसवड येथील बाजार पटांगणावर झालेल्या युवा संवाद यात्रेच्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. यावेळी भारतीय जनता युवा मोचार्चे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर, महाराष्ट्र प्रभारी अतुल कुमारजी, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, प्रदेश सहप्रभारी अलोक देगस, सहप्रभारी भावेशजी, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हा उपाध्यक्ष व निमंत्रक अनिल देसाई, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, तालुकाध्यक्ष बाळासाहेब मासाळ, प्रा. विश्वंभर बाबर, अण्णासाहेब टाकणे उपस्थित होते.महाजन म्हणाल्या, या विधानसभा मतदार संघातील लोकांनी नेहमीच हाताची व घड्याळाची दोस्ती केली आहे. तरीही कित्येक वर्षे येथील गावांना, शेतीला पाणी मिळू शकले नाही. चूल फुंकून-फुंकून बेजार झालेल्या येथील महिलांना गॅस मिळाला नाही. भाजपची सत्ता येताच देशातील साडेतीन कोटी गॅस सिलिंडर घराघरातील महिलांना मोफत दिला. शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात केंद्रीय अर्थसंकत्पात प्रथमत: ऐतिहासिक अशी भरीव तरतूद केलेली आहे.सर्व धर्म समभाव म्हणता तर मग अजूनही तुमचे कार्यकर्ते जिथं गाव पेटतं तिथं रॉकेल ओतायला का जाताहेत? असा प्रतिप्रश्नही उपस्थित करून महाजन म्हणाल्या, आम्ही कर्जमाफी गरीब छोट्या शेतकऱ्यांची केली. ती मोठ्या धेंडांना मिळाली नाही म्हणून कर्जमाफीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी माण-खटावमधील रखडलेल्या पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी नऊशे कोटींचा निधी मंजूर आहे.अनिल देसाई म्हणाले, भाजपने केंद्र व राज्यातून दिलेल्या निधीतून माण तालुक्याच्या पूर्व भागातील वरकुटे-मलवडी परिसरातील सोळा गावांचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी सुटण्यासाठी नऊ कोटींचा निधी दिला. माणगंगा व येरळा नदी बारमाही वाहती करण्यासाठी आठशे कोटींचा निधी दिला आहे. माण तालुक्यात दोन राज्यमागार्ची कामे सुरू झाली आहेत.आमदार योगेश टिळेकर यांचेही भाषण झाले 

टॅग्स :Poonam Mahajanपूनम महाजनSatara areaसातारा परिसर