शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाली तिसरी महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
5
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
6
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
7
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
8
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
9
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
10
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
11
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
12
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
13
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
14
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
15
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
16
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
17
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
18
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
19
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
20
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु

साताऱ्यातील पारा ४२ अंशांवर!

By admin | Published: April 17, 2017 11:13 PM

असह्य उकाडा : कडक उन्हामुळे उष्माघाताच्या प्रमाणात वाढ

सातारा : सूर्यनारायणाचे आग ओकण्याचे प्रमाण काही केल्या कमी होत नाही. सोमवारी तर कहर झाला असून, तापमानाने ४२ अंश सेल्सिअसची पातळी गाठली आहे. काही कामानिमित्ताने घराबाहेर पडलेल्यांना उष्माघाताचा त्रास सहन करावा लागत आहे. ‘थंडा-थंडा, कूल-कूल’ म्हणून ओळख असलेल्या सातारा जिल्ह्याचीही ‘हॉट’ सिटीत गणना होते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मार्च महिन्यापासूनच उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. गेल्या आठवड्यापासून चाळीस अंश सेल्सिअसच्या घरात तापमान होते. त्यामुळे जिल्हा चांगलाच तापला आहे. तापमानाच्या पाऱ्याने सोमवारी उच्चांकी पातळी गाठली. तापमापीवर सरासरी ४२ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. असह्य उकाड्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेत शहरातील सर्वच मुख्य रस्ते ओस पडत आहेत. महाविद्यालयीन तरुणी, नोकरदार महिला कामानिमित्त बाहेर जात असताना डोक्याला स्कार्प, स्टोल, सनकोट घालूनच बाहेर पडत आहेत. तसेच पुरुष मंडळीही डोक्यावर टोपी, तोंडाला रुमाल बांधूनच जावे लागत आहेत. (प्रतिनिधी)