शहरं
Join us  
Trending Stories
1
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
3
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
4
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
5
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
6
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
7
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
8
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
9
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
10
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
11
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
12
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
13
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
14
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते
15
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
16
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
17
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
18
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
19
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
20
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?

शाहूनगरचे मूलभूत प्रश्न मार्गी लावल्याचे समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 4:35 AM

सातारा : शाहूनगरसह त्रिशंकू भागाचा नुकताच सातारा शहराच्या हद्दवाढीत समावेश झाला आहे. येथील पाणी व्यवस्था, वीज तसेच नाले स्वच्छतेची ...

सातारा : शाहूनगरसह त्रिशंकू भागाचा नुकताच सातारा शहराच्या हद्दवाढीत समावेश झाला आहे. येथील पाणी व्यवस्था, वीज तसेच नाले स्वच्छतेची कामे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी प्राधान्याने मार्गी लावण्याचे काम हाती घेतले आहे. त्यांच्या माध्यमातून इतर प्रश्नही तातडीने मार्गी लागतील, असे मत उद्योजक सागर भोसले यांनी व्यक्त केले.

शाहूनगर तसेच चार भिंती परिसराची तातडीने स्वच्छता केल्याबद्दल उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांचा शाहूनगर येथील नागरिकांनी सत्कार केला. याप्रसंगी ते बोलत होते. सागर भोसले पुढे म्हणाले, शाहूनगर व त्रिशंकू भागाचा हद्दवाढीत समावेश झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. येथील अनेक मूलभूत प्रश्न आता हळूहळू मार्गी लागतील व नागरिकांना पालिकेकडून सर्व सोयी-सुविधा उपलब्ध होतील.

शाहूनगर भागात डोंगरावरून येणाऱ्या पाण्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी जात होते. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या चरींमध्ये दगड, माती, कचरा असल्यामुळे चरी मुजल्या होत्या. याची माहिती उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांना दिल्यानंतर त्यांनी तातडीने स्वत: उपस्थित राहून, एक जेसीबी व सहा कर्मचाऱ्यांच्या मदतीने शाहूनगर व चारभिंती येथील चरी मोकळ्या करण्याबरोबरच या परिसराची स्वच्छतादेखील केली. येथील मूलभूत प्रश्न तातडीने मार्गी लावल्याने नागरिकांमधूनही समाधान व्यक्त करण्यात आले.

फोटो : २१ मनोज शेंडे

उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांचा उद्योजक सागर भोसले व शाहूनगर येथील नागरिकांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.