शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
3
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
4
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
5
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
6
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
7
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
8
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
9
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
10
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
11
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
12
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
13
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
14
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
15
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
16
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
17
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
18
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
19
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
20
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

साताऱ्यात पाणी टंचाईच्या काऊंटडाऊनला सुरुवात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2019 11:19 PM

पेट्री : सातारा शहरात पाणीटंचाईचे ढग जमा होऊ लागले असून, आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय पालिकेने घेतला ...

पेट्री : सातारा शहरात पाणीटंचाईचे ढग जमा होऊ लागले असून, आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. शहराला पाणीपुरवठा करत असलेल्या कास तलावात केवळ सात फूट चार इंच पाणीसाठा शिल्लक आहे. तलावाचा दुसरा व्हॉल्व्हही उघडा पडला असल्याने पाणीटंचाईचे काऊंटडाऊन सुरू झाल्याचे मानले जात आहे.सातारा शहराला पाणीपुरवठा करणाºया कास तलावाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस कमालीची घट होत आहे. पाणी पातळी मोठ्या प्रमाणावर खालावू लागली आहे. तलावाचा दुसरा व्हॉल्व्ह उघडा पडला असून, शेवटच्या तिसºया व्हॉल्व्हमधून पाणीपुरवठा सुरू आहे. सद्य:स्थितीला तलावात केवळ सात फूट चार इंच पाणीसाठा शिल्लक आहे. यंदा अवकाळी पावसाने ओढ दिली व उन्हाची तीव्रता जास्त असल्याने गतवर्षीच्या तुलनेत यंदा तलावात दोन फुटाने पाणीसाठा कमी आहे. वरुणराजा वेळेत बरसला नाही तर सातारकरांची तहान भागविणे जिकिरीचे होणार आहे.साताºयाला कास तलावातील तीन व्हॉल्व्हद्वारे पाणीपुरवठा केला जातो. यापैकी पहिला व्हॉल्व्ह चार महिन्यांपूर्वीच उघडा पडला होता. त्यानंतर दुसरा व्हॉल्व्हही उघडा पडला आहे. या दुसºया व्हॉल्व्हद्वारे कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने सर्वात खाली अंतिम तिसºया व्हॉल्व्हद्वारे गेल्या दहा दिवसांपासून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. या तिसºया व्हॉल्व्हवरील संरक्षकजाळी पूर्णपणे उघडी पडली आहे.शहराला होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे तलावातील पाणीपातळी दररोज सव्वा ते दीड इंचाने कमी होत आहे. पात्रातील जमिनीही उघडी पडल्याचे चित्र दिसत आहे. दिवसभर वातावरणात उष्णता अधिक तीव्रतेने भासत असून, दिवसेंदिवस पाणी पातळी खालावतच चालली आहे. तलावातील मुरून वाया जाणारे पाणी दिवस-रात्र दोन मोटारींच्या साह्याने उपसा करून पुन्हा पाटात सोडले जात आहे.