शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
2
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
3
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
4
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
5
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
6
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
7
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
9
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
10
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
11
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
13
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
14
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
15
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
16
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
17
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
18
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
19
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
20
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच

आंब्रुळकरवाडीत पाण्याची तीव्र टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 4:36 AM

ढेबेवाडी विभागात तीन धरणे आहेत. मात्र, पठारी भाग मोठा आहे. त्यामुळे डोंगर माथ्यावर असलेल्या गावांना कमी-अधिक प्रमाणात पाणीटंचाईच्या झळा ...

ढेबेवाडी विभागात तीन धरणे आहेत. मात्र, पठारी भाग मोठा आहे. त्यामुळे डोंगर माथ्यावर असलेल्या गावांना कमी-अधिक प्रमाणात पाणीटंचाईच्या झळा बसतात. डोंगर माथ्यावर झालेली प्रचंड वृक्षतोड, घटलेले पर्जन्यमान व पठारावर जलसंधारणाचा अभाव यामुळे भूगर्भातील घटलेली पाण्याची पातळी हे आजचे चित्र आहे. डोंगरातले नैसर्गिक पाण्याचे स्तोत्र नष्ट होऊ लागले आहेत. त्यामुळे अनेक गावांमध्ये उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

आंब्रुळकरवाडी ही भोसगाव ग्रामपंचायीतअंतर्गत येत असून भोसगावच्या पश्चिमेला डोंगर माथ्यावर पाचशे लोकसंख्या असलेल्या या वाडीत उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच दरवर्षी भीषण पाणी टंचाई निर्माण होते. भोसगावला मुबलक पाणी उपलब्ध आहे. मात्र, डोंगर माथ्यावर टंचाई आहे. सध्या शंभर कुटुंबांची दोन-तीन घागरी पाण्यासाठी विहिरीवर झुंबड उडत आहे, तर पशुधन वाचविण्यासाठी पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागते.

- चौकट

कायमस्वरूपी उपाययोजना करा!

आंब्रुळकरवाडीला प्रत्येक वर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. टंचाई निर्माण झाल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना करण्यात येते. उन्हाळा संपल्यानंतर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशी परिस्थिती असते. तात्पुरत्या उपाययोजना करण्यापेक्षा पाण्याच्या उपलब्धतेसाठी येथे कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

- कोट

भोसगाव ग्रामपंचायती अंतर्गत आंब्रुळकरवाडी डोंगर माथ्यावर आहे. येथील दळणवळणाचा प्रश्न सोडविला आहे. पाण्याचा प्रश्न कायमचा निकालात काढण्यासाठी काय करावे लागेल, याबाबत विचार सुरू आहे.

- प्रतापराव देसाई

उपसभापती, पाटण पंचायत समिती