शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

पाणी टंचाईची दाहकता वाढू लागली, सातारकरांचा टॅंकरची वाट बघण्यात जातो दिवस

By नितीन काळेल | Published: June 15, 2023 12:30 PM

माण तालुक्यात तर भीषणता अधिक

सातारा : मान्सूनचा पाऊस लांबला.. उन्हाळी पाऊसही कमी झाले.. त्यामुळे जिल्ह्यातील टंचाईची दाहकता वाढू लागली आहे. माण तालुक्यात तर भीषणता अधिक आहे. त्यामुळे घागरभर पाण्यासाठीही लोक पायपीट करत आहेत. त्यातच टॅंकरने पाणीपुरवठा होत असलातरी अपुरा आहे. तर टॅंकरची वाट पाहण्यामुळे पै-पाहुणेही दुरावले असून पशुधनाची तर पाण्याअभावी परवड सुरू असल्याचे वास्तव समारे येत आहे.जिल्ह्यात मागील चार वर्षांत टंचाई जाणवली नव्हती. याला कारण जलसंधारणाची कामे. त्यातच पाऊसही वेळेत सुरु व्हायचा. वळीवही बरसून धरणीमाता तृप्त करायचा. पण, यंदा हवामान विभागाचा अंदाज खरा होताना दिसून येत आहे. पावसाचे प्रमाण कमी राहणार असून सध्यातर मान्सूनने ओढ दिली आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत सतत वाढ होत चालली आहे. जून मध्यावर आलातरी लोकांची तहान भागविण्यासाठी टॅंकर धुरळा उडवत पळत आहे.सध्यस्थितीत जिल्ह्यातील फलटण आणि खंडाळा सोडले तर ९ तालुक्यांत टॅंकरने पाणीपुरवठा सुरु आहे. यामध्ये माणमध्ये तर उन्हाच्या चटक्याबरोबरच पाणीटंचाईची दाहकता लोकांना गलबलून सोडत आहे. यामुळे प्रशासन टॅंकर सुरू करत असलेतरी पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे लोकांना विकतही पाणी घेण्याची वेळ आली आहे.

माणमध्ये टंचाईची स्थिती भयानाक आहे. २८ गावे आणि १६१ वाड्यांना टॅंकरचाच आधार आहे. तालुक्याच्या चाैफेर भागात टंचाई आहे. सध्या २० टॅंकरने पाणीपुरवठा सुरू असलातरी यापुढे टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढणार आहे. या टंचाईग्रस्त गावांत माणसी आणि जनावरांच्या संख्येप्रमाणे पाणीपुरवठा केला जात आहे. भाटकी गावातही गेल्या १५ दिवसांपासून टॅंकरने पाणीपुरवठा केला जातोय. पण, पाणी कमी पडत आहे. त्यामुळे लोकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे.या गावातील लोकांना पाणी देताना सार्वजनिक विहिरीत टॅंकरचे पाणी सोडले जाते. त्यानंतर नळाद्वारे पाणी मिळते. पण, हे पाणी चार दिवसांतून एकदा येते. तर वाड्यांसाठी टॅंकर जागेवर जात असलातरी दिवसभर लोकांना वाट पहावी लागते. त्यामुळे कधी टॅंकर येतोय याची वाट पाहण्याने पाहुणे तसेच एखाद्या कामासाठीही घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. भाटकीप्रमाणे माण तालुक्यातील अनेक गावांची स्थिती अशी झाली आहे. यासाठी प्रशासनाने वेगाने उपाययोजना राबवाव्यात अशीच मागणी होत आहे.

सध्या माणसांना आणि जनावरांसाठी शासनामार्फत टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पण, हे पाणी अपुरे पडत आहे. त्यामुळे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. जनावरांनाही चारा सोलापूर जिल्ह्यातून आणवा लागतोय. शासनाने जनावरांसाठी चारा छावण्या लवकर सुरू कराव्यात अशी आमची विनंती आहे. - दत्तात्रय शिर्के, सामाजिक कार्यकर्ते भाटकी, ता. माण

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी