शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

साताऱ्याच्या राजकारणावरील शरद पवारांचा प्रभाव संपेल - केंद्रीय राज्यमंत्री सोम प्रकाश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 12:19 PM

काँग्रेस नेस्तानबूत झाली असून इतर प्रादेशिक पक्षही संपतील आणि भाजपचा प्रभाव वाढत जाईल

सातारा : राजकारण बदलत आहे, त्याप्रमाणे राजकारणावरील व्यक्तींचे प्रभावही बदलत जातात. सातारा जिल्ह्यावरील खासदार शरद पवार यांचाही प्रभाव संपून जाईल. तसेच काँग्रेस नेस्तानबूत झाली असून इतर प्रादेशिक पक्षही संपतील आणि भाजपचा प्रभाव वाढत जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी केले.साताऱ्यात पत्रकारांशी ते बोलत होते. त्यानंतर त्यांचा उंब्रज येथेही मेळावा झाला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, डॉ. अतुल भोसले, धैर्यशील कदम आदी उपस्थित होते.मंत्री सोम प्रकाश म्हणाले, भाजप सरकारचा असलेला प्रभाव आणि येणाऱ्या निवडणुकांसाठी काय तयारी करावी लागेल, याची माहिती घेतली आहे. यावरून जिल्ह्यातील भाजपचा प्रभाव वाढत चालला असून यापूर्वी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हटला जाणारा सातारा आता शरद पवारांच्या प्रभावापासून लांब जाईल. भाजपला येथे चांगली संधी असून पक्षाच्या वाढीसाठी सर्वांचीच मदत होण्याची आवश्यकता आहे. आगामी काळात भारतात ३२ मोठी औद्योगिक केंद्रे निर्माण केली जाणार आहेत. त्यातील तीन महाराष्ट्रात आणि एक साताऱ्यात आहे.उंब्रज येथील मेळाव्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे म्हणाले, तत्कालीन सहकारमंत्री दमबाजीचे राजकारण करीत होते. सत्तेचा दुरुपयोग केला जात होता. अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांना जेलमध्ये बसविण्याचे काम केले असल्याचा आरोप करून, येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीत सातारा जिल्ह्याचा खासदार भाजपचा असणार असल्याचे त्यांनी सांगितले.

साताऱ्याच्या लोकसभेच्या उमेदवाराबाबत मौन

सातारा लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवार निश्चित केला आहे का, तसेच खासदार उदयनराजे यांना संधी दिली जाणार का, असे विचारले असता मंत्री सोम प्रकाश यांनी सध्या सुरू असलेला दौरा पक्षवाढ आणि पक्ष बळकटीकरणाच्या दृष्टीने आहे. लोकसभा निवडणुकीला उमेदवार कोण असेल हे पार्लमेंटरी बॉडी ठरवणार आहे, असे स्पष्ट केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा